शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
4
प्रवाशांना मार्गदर्शक सूचना द्या, रेल्वे नोडल अधिकारी नेमा, यंत्रणांना निर्देश
5
आजचा अग्रलेख: मारेकऱ्यांच्या मुसक्या आवळा!
6
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
7
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
8
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
9
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
10
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
11
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
12
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
13
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
14
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
15
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
16
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
17
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
18
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
19
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद

म्हसळा, श्रीवर्धनमध्ये रस्त्यांची चाळण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2019 03:34 IST

ग्रामीण भागात दुरवस्था : नागरिक त्रस्त, पर्यटनावर विपरीत परिणाम, एसटीची वाहतूक बंद होण्याच्या मार्गावर

अरुण जंगम

म्हसळा : अथांग समुद्रकिनारा, कौलारू घरे व नारळ सुपारीच्या बागा यामुळे कोकणचं सौंदर्य टिकू न आहे. म्हसळा व श्रीवर्धन या दोन्ही तालुक्यात पर्यटन व्यवसायाला चालना मिळाली आहे, परंतु ग्रामीण भागातील रस्ते पर्यटन विकासात अडथळा ठरत आहेत. रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे एसटी, रिक्षा कोणतीच वाहने ग्रामीण भागातील रस्त्यावरून प्रवास करण्यास तयार नाहीत. यामुळे स्थानिकांसह पर्यटकांनाही त्रास सहन करावा लागत आहे.

पर्यटनाच्या विकासासाठी रस्ते विकास आवश्यक आहे, परंतु ग्रामीण भागातील रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. म्हसळा तालुका हा दुर्गम आहे. तालुक्यामध्ये असलेली गावे ही तालुक्याच्या ठिकाणापासून दूर व डोंगरात वसलेली आहेत. या गावातील नागरिकांना बाजारहाट करणे त्याचप्रमाणे शासकीय कामांकरिता म्हसळा तालुक्यातच यावे लागते. यासाठी एसटी हे एकमेव साधन असल्याने या गावांतील नागरिक एसटी बसवरच अवलंबून आहेत, मात्र मागील काही वर्षापासून तालुक्यातील काही भागातील रस्त्यांची चाळण झाल्याने बसशिवाय पर्यायी साधन म्हणून रिक्षाचालक देखील या भागाकडे येण्यास नकार देत आहेत. काही भागात रस्त्यांची झालेली हालत पाहून एसटी महामंडळ देखील बसेस पाठविण्यास टाळाटाळ करीत आहे.म्हसळा तालुक्यातील कोळवट, रातीवणे, भापट ,चिरगाव, सांगवड, कोंदरी गावांच्या रस्त्याची परिस्थिती बिकट आहे. म्हसळा-कोळवट १५ किमी चे अंतर आहे. कोळवट ग्रुप ग्रामपंचायतीमध्ये कोळवट, भापट, रातीवणे या गावांचा समावेश आहे. कोळवट ग्रामपंचायतीची लोकसंख्या ११५० च्या जवळपास आहे. चिरगाव ते कोलवट ९ किमी रस्त्याची परिस्थिती दयनीय आहे. १९८४ व १९९८ या वर्षी चिरगाव ते कोळवट रस्त्याचे काम झाले होते. मुख्य रस्त्यावर फक्त दगड व माती निदर्शनांस येत आहे. म्हसळा ते सांगवड १४ किमीचे अंतर आहे. म्हसळा ते केल्टे रस्ता सुस्थितीत आहे, परंतु केल्टे ते सांगवड रस्ता पूर्णपणे खड्डेमय झाला आहे. माजी मुख्यमंत्री ए. आर. अंतुले यांनी हा रस्ता तयार केला, त्यानंतर आजतागायत दुरु स्ती करण्यात आलेले नाही. म्हसळा, गाणी फाटा, पानवा, कोंदरी, तळवडे, कोळे व साखरोणे मार्गावर कोळे ते साखरोणे चार किलोमीटर रस्त्याची पूर्णपणे वाताहत झाली आहे. त्यामुळे चालणारी एसटी वाहतूक बंद होण्याचा धोका निर्माण झाला आहे.श्रीवर्धन तालुक्यातील कोलमांडला, कारविणे, गडबवाडी, मोहिते वाडी, वांजळे व आडी या गावातील रस्ते खड्डेमय झाले आहेत. साधारणत: प्रत्येक रस्ता हा १६ फूटरु ंदीचा आहे. या रस्त्यावर प्रवासी वाहतूक चालते इतर वाहतुकीचे प्रमाण अतिशय अल्प आहे. तरी सुद्धा येथील रस्त्याची चाळण झालेली पहावयास मिळत आहे. कोलमांडला, कारविणे रस्त्याची दुरवस्था झाली आहे. कारविणेची लोकसंख्या ५९० च्या जवळपास आहे. गावातील विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिकांना या रस्त्यामुळे असंख्य अडचणीस सामोरे जावे लागत आहे. बोर्लीपंचतनपासून अवघ्या सहा किलोमीटर अंतरावर वांजळे गाव आहे, येथे मदगड किल्ला आहे. यामुळे येथील पर्यटक व शालेय विद्यार्थी सहलीसाठी मदगडची निवड करतात, परंतु बोर्लीपंचतन ते वांजळे रस्त्याची चाळण झाली आहे. त्यामुळे त्याचा विपरीत परिणाम पर्यटनावर होत आहे.रस्ता दुरुस्त न झाल्यास निवडणुकीवर बहिष्कारच्म्हसळा तालुक्यातील डोंगराळ व दुर्गम भागात ताम्हणे करंबेवाडी, ताम्हणे करंबे, रातीवणे, कोलवट, भापट ही सहा गावे वसलेली आहेत, त्या गावाला दळणवळण करण्यासाठी प्रवासाचे साधन म्हणजे कोलवट रस्ता आहे, मात्र गेल्या १४ वर्षांपासून हा रस्ता नादुरु स्त आहे. अनेक वेळा या गावातील ग्रामस्थांनी विविध पक्षाला रस्ता करण्यासाठी साकडे घातले. लेखी निवेदने, प्रस्ताव दिले, परंतु रस्ता आज आहे तसाच आहे.च्त्यामुळे आगामी निवडणुकांआधी जर रस्त्याचे काम केले नाही, तर निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. कोलवट गावाअंतर्गत सहा गावांनी पंचक्र ोशी कमिटी स्थापन करून रखडलेला रस्ता पूर्ण करण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा केला, मात्र कोणीही याची दखल घेतली नाही. या रस्त्यावरून प्रवास करायचा म्हणजे तारेवरची कसरत आहे.च्पावसाच्या दिवसात नादुरु स्त रस्त्यामुळे महामंडळ एसटी बसच्या फेऱ्या बंद करते. त्यामुळे ग्रामस्थांना दुप्पट किंमत मोजून खासगी वाहनाने प्रवास करावा लागतो. या सर्व प्रकरणाला कंटाळून पंचक्र ोशीची पहिली सभा घेऊन कमिटी स्थापन करून आगामी काळात जो राजकीय पक्ष रस्ता करेल, त्याच पक्षाला पंचक्र ोशीत स्थान दिले जाईल . नाही तर येणाºया निवडणुकीवर सहा गावे बहिष्कार टाकतील, असा एकमुखी ठराव घेण्यात आला.कोळवट रस्त्याचे काम अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. राजकारणी फक्त निवडणुकीच्या काळात आश्वासने देतात. स्थानिकांमध्ये प्रशासन व राजकारणी मंडळींविषयी प्रचंड नाराजी आहे.- गोविंद तान्हू मोरे,तंटामुक्त गाव अध्यक्ष, कोळवटग्रामीण भागातील आडी, कारविणे, कोळवट, साखरोणे व सांगवड रस्त्याची अवस्था बिकट झाली आहे त्यामुळे अपघात होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. तरी बांधकाम विभागाने लवकरात लवकर लक्ष द्यावे.- संदीप गुरव, एसटी चालक,श्रीवर्धन आगारहे सर्व मार्ग जिल्हा परिषदेच्या अंतर्गत येत असल्याने या सर्व मार्गांची देखभाल दुरुस्ती जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाकडे आहे, हा रस्ता हस्तांतरित न झाल्याने सार्वजनिक बांधकाम विभाग काही करू शकत नाही.- शामसाव शेट्टे, शाखा अभियंता,सार्वजनिक बांधकाम विभाग, श्रीवर्धन 

टॅग्स :Raigadरायगड