शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
2
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
3
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शहा यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
4
काय म्हणता! इंटर्नला मिळालं महिन्याला १२.५ लाखांचं पॅकेज; अमेरिका, युरोप नाही तर मुंबईत आहे कंपनी, नाव काय?
5
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
6
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
7
डेबिट कार्ड फी, मिनिमम बॅलन्स नसल्यास दंड आणि लेट पेमेंट चार्जेपासून होणार मुक्तता; RBI बँकांवर लगाम लावण्याच्या तयारीत
8
मुलाच्या शाळेतच वडिलांनी सोडला जीव, अर्जावर सही करताना खुर्चीवरून कोसळले आणि...  
9
हाफिज सईदच्या भेटीनंतर पंतप्रधानांनी आभार मानले; दहशतवादी यासीन मलिकच्या शपथपत्रातील अनेक दाव्यांमुळे खळबळ
10
सोडून गेलेले परत आले तरी उमेदवारी नाही, उद्धव ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांसाठी मार्गदर्शक सूचना जाहीर
11
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
12
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
13
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
14
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार
15
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
16
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
17
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
18
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
19
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
20
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला

रायगड जिल्ह्यात नद्यांनी ओलांडली पातळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2018 04:09 IST

गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. महाड शहर आणि परिसरात सावित्री नदीचे पाणी घुसल्याने पुराची परिस्थिती निर्माण झाली.

अलिबाग - गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. महाड शहर आणि परिसरात सावित्री नदीचे पाणी घुसल्याने पुराची परिस्थिती निर्माण झाली. शनिवारी महाड येथे ४८ मि.मी. तर पोलादपूर येथे ८५मि.मी. तर महाबळेश्वर येथे झालेल्या २०१ मि.मी. पावसाने सावित्री नदीला पूर आला.दरम्यान, येत्या २४ तासांत हवामान खात्याने अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. शनिवारी सायंकाळनंतर भरती असल्याने तोपर्यंत पुराचे पाणी न ओसरल्यास महाडमधील परिस्थिती चिंताजनक होऊ शकत असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर पोलीस आणि आपत्ती निवारण यंत्रणा जिल्ह्यात हाय अलर्टवर ठेवण्यात आले आहे. संभाव्य भूस्खलनग्रस्त गावांत गरज भासल्यास नागरिकांचे स्थलांतर करण्याची तयारी प्रशासनाने ठेवली आहे.रायगड जिल्ह्यात अतिवृष्टी इशारा देण्यात आला आहे. या काळात समुद्र खवळलेला राहील, तसेच दरडग्रस्त व नदी किनाऱ्यावरील गावांना सावधगिरीचा इशारा देण्यात आला आहे. जिल्हा आपत्कालीन कार्य केंद्राच्या वतीने जिल्ह्यात सर्व आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्षांना सतर्क राहण्याचे कळविण्यात आले आहे. अतिवृष्टीमुळे झाड पडणे, पाणी थांबणे, माती खचणे आदी घटना घडू शकतात. अशा परिस्थितीत बचाव पथक, बचाव साहित्य, रु ग्णवाहिका, रुग्णालये आदी सुविधा तत्पर व सतर्क ठेवा. जुन्या व धोकादायक पुलांवरील वाहतुकीवर नियंत्रण ठेवावे. पुलांवरून पाणी वाहत असल्यास रहदारी पूर्णपणे थांबवावी. सखल भागातून पाण्याचा निचरा व्हावा यासाठी नैसर्गिक प्रवाहातील अडथळे दूर करावे, वादळामुळे झाड पडल्यास रहदारी सुरळीत होण्यासाठी तत्काळ उपाययोजना कराव्यात आदी सूचना नियंत्रण कक्षाला दिल्या आहेत.जिल्ह्यातील कुंडलिका, अंबा, पाताळगंगा, सावित्री नद्यांच्या खोºयात मोठ्या प्रमाणावर पाऊस सुरू आहे. येत्या २४ तासांतही अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे.

टॅग्स :RainपाऊसfloodपूरRaigadरायगड