शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
3
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
4
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
5
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
6
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
7
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
8
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
9
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
10
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
11
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
12
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
13
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
14
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
15
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
16
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
17
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
18
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
19
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
20
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...

रायगड जिल्ह्यात नद्यांनी ओलांडली पातळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2018 04:09 IST

गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. महाड शहर आणि परिसरात सावित्री नदीचे पाणी घुसल्याने पुराची परिस्थिती निर्माण झाली.

अलिबाग - गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. महाड शहर आणि परिसरात सावित्री नदीचे पाणी घुसल्याने पुराची परिस्थिती निर्माण झाली. शनिवारी महाड येथे ४८ मि.मी. तर पोलादपूर येथे ८५मि.मी. तर महाबळेश्वर येथे झालेल्या २०१ मि.मी. पावसाने सावित्री नदीला पूर आला.दरम्यान, येत्या २४ तासांत हवामान खात्याने अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. शनिवारी सायंकाळनंतर भरती असल्याने तोपर्यंत पुराचे पाणी न ओसरल्यास महाडमधील परिस्थिती चिंताजनक होऊ शकत असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर पोलीस आणि आपत्ती निवारण यंत्रणा जिल्ह्यात हाय अलर्टवर ठेवण्यात आले आहे. संभाव्य भूस्खलनग्रस्त गावांत गरज भासल्यास नागरिकांचे स्थलांतर करण्याची तयारी प्रशासनाने ठेवली आहे.रायगड जिल्ह्यात अतिवृष्टी इशारा देण्यात आला आहे. या काळात समुद्र खवळलेला राहील, तसेच दरडग्रस्त व नदी किनाऱ्यावरील गावांना सावधगिरीचा इशारा देण्यात आला आहे. जिल्हा आपत्कालीन कार्य केंद्राच्या वतीने जिल्ह्यात सर्व आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्षांना सतर्क राहण्याचे कळविण्यात आले आहे. अतिवृष्टीमुळे झाड पडणे, पाणी थांबणे, माती खचणे आदी घटना घडू शकतात. अशा परिस्थितीत बचाव पथक, बचाव साहित्य, रु ग्णवाहिका, रुग्णालये आदी सुविधा तत्पर व सतर्क ठेवा. जुन्या व धोकादायक पुलांवरील वाहतुकीवर नियंत्रण ठेवावे. पुलांवरून पाणी वाहत असल्यास रहदारी पूर्णपणे थांबवावी. सखल भागातून पाण्याचा निचरा व्हावा यासाठी नैसर्गिक प्रवाहातील अडथळे दूर करावे, वादळामुळे झाड पडल्यास रहदारी सुरळीत होण्यासाठी तत्काळ उपाययोजना कराव्यात आदी सूचना नियंत्रण कक्षाला दिल्या आहेत.जिल्ह्यातील कुंडलिका, अंबा, पाताळगंगा, सावित्री नद्यांच्या खोºयात मोठ्या प्रमाणावर पाऊस सुरू आहे. येत्या २४ तासांतही अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे.

टॅग्स :RainपाऊसfloodपूरRaigadरायगड