शहरं
Join us  
Trending Stories
1
“विठ्ठला...! सरकारला कर्जमाफी देण्याची सद्बुद्धी दे...”; आषाढी एकादशीला बच्चू कडूंची पोस्ट
2
'देशात गरीब वाढत चाललेत आणि काही श्रीमंताच्या हातात संपत्ती चाललीये'; नितीन गडकरींनी व्यक्त केली चिंता
3
2028 च्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत उतरणार 'America Party'? इलॉन मस्क यांनी वेगळीच हिंट दिली!
4
संपत्तीवरून वाद झाला, काकीनेच पुतण्याचा गेम केला! तरुणाचा दुर्दैवी मृत्यू 
5
अमेरिकेचा मोठा निर्णय! १ ऑगस्टपासून १०० देशांवर लादणार नवीन शुल्क, भारतावर काय परिणाम?
6
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते वडाळा येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात पूजा
7
Tata च्या Harrier EV ला ग्राहकांचा प्रचंड प्रतिसाद; काही तासांत हजारो युनिट्सची विक्री...
8
"मी यूपीचा, पण महाराष्ट्रासाठी रक्त सांडलं, तेव्हा तुमचे...?"; भाषा वादावरून 26/11 च्या 'नायका'चा राज ठाकरेंना थेट सवाल
9
"निवृत्त होऊन ८ मिहिने झाले, तरी माजी CJI चंद्रचूड यांनी सोडला नाही बंगला"; सर्वोच्च न्यायालयाचं सरकारला पत्र
10
'ऑपरेशन सिंदूर'मुळे घाबरलेला पाकिस्तान आता चीनकडून घेणार 'केजे-५००'! कसं आहे 'हे' नवं विमान?
11
तेरा वर्षीय मुलाने तुळशीच्या पानावर साकारले विठ्ठल! पाहा माऊलीचं सुंदर रूप
12
टेक्सासमध्ये महापूर! ५१ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता; ट्रम्प यांच्या 'त्या' निर्णयामुळे संकट ओढावलं?
13
"राज ठाकरेंनी शिवसेना सोडली तो दिवस आठवला...", मराठी अभिनेत्याची पोस्ट चर्चेत
14
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना अनुकूल, इच्छापूर्ती शक्य; मन प्रसन्न करणारा धनलाभाचा काळ!
15
दिल्ली हादरली! एकाच घरात सापडले ३ तरुणांचे मृतदेह; एकाची प्रकृती गंभीर, कारण काय?
16
१०, १५ किंवा २० वर्षे काम केल्यानंतर तुमच्या PF खात्यात किती पैसे जमा होतील? चला गणित समजून घ्या
17
"भाऊ एक झाले की शहराला बळ येतं...", प्रसिद्ध मराठी लेखकाची ठाकरे बंधूंसाठी पोस्ट
18
"बॉयफ्रेंडला सांगून तुला संपवेन", पत्नी रोज देत होती धमकी; छळाला कंटाळलेल्या पतीने उचलले टोकाचे पाऊल
19
लिव्हरला सूज, हाताला सलाईन; रुग्णालयात उपचार सुरू असतानाही चिमुकल्याने तुळशीच्या पानावर साकारले विठूरायाचे चित्र 
20
"मला राजकारणात पडायचं नाही...", हिंदी सक्ती वादावर शरद केळकरची प्रतिक्रिया

रायगड जिल्ह्यात नद्यांनी ओलांडली पातळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2018 04:09 IST

गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. महाड शहर आणि परिसरात सावित्री नदीचे पाणी घुसल्याने पुराची परिस्थिती निर्माण झाली.

अलिबाग - गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. महाड शहर आणि परिसरात सावित्री नदीचे पाणी घुसल्याने पुराची परिस्थिती निर्माण झाली. शनिवारी महाड येथे ४८ मि.मी. तर पोलादपूर येथे ८५मि.मी. तर महाबळेश्वर येथे झालेल्या २०१ मि.मी. पावसाने सावित्री नदीला पूर आला.दरम्यान, येत्या २४ तासांत हवामान खात्याने अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. शनिवारी सायंकाळनंतर भरती असल्याने तोपर्यंत पुराचे पाणी न ओसरल्यास महाडमधील परिस्थिती चिंताजनक होऊ शकत असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर पोलीस आणि आपत्ती निवारण यंत्रणा जिल्ह्यात हाय अलर्टवर ठेवण्यात आले आहे. संभाव्य भूस्खलनग्रस्त गावांत गरज भासल्यास नागरिकांचे स्थलांतर करण्याची तयारी प्रशासनाने ठेवली आहे.रायगड जिल्ह्यात अतिवृष्टी इशारा देण्यात आला आहे. या काळात समुद्र खवळलेला राहील, तसेच दरडग्रस्त व नदी किनाऱ्यावरील गावांना सावधगिरीचा इशारा देण्यात आला आहे. जिल्हा आपत्कालीन कार्य केंद्राच्या वतीने जिल्ह्यात सर्व आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्षांना सतर्क राहण्याचे कळविण्यात आले आहे. अतिवृष्टीमुळे झाड पडणे, पाणी थांबणे, माती खचणे आदी घटना घडू शकतात. अशा परिस्थितीत बचाव पथक, बचाव साहित्य, रु ग्णवाहिका, रुग्णालये आदी सुविधा तत्पर व सतर्क ठेवा. जुन्या व धोकादायक पुलांवरील वाहतुकीवर नियंत्रण ठेवावे. पुलांवरून पाणी वाहत असल्यास रहदारी पूर्णपणे थांबवावी. सखल भागातून पाण्याचा निचरा व्हावा यासाठी नैसर्गिक प्रवाहातील अडथळे दूर करावे, वादळामुळे झाड पडल्यास रहदारी सुरळीत होण्यासाठी तत्काळ उपाययोजना कराव्यात आदी सूचना नियंत्रण कक्षाला दिल्या आहेत.जिल्ह्यातील कुंडलिका, अंबा, पाताळगंगा, सावित्री नद्यांच्या खोºयात मोठ्या प्रमाणावर पाऊस सुरू आहे. येत्या २४ तासांतही अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे.

टॅग्स :RainपाऊसfloodपूरRaigadरायगड