शहरं
Join us  
Trending Stories
1
भर सभागृहात निशिकांत दुबे आणि वर्षा गायकवाड यांच्यात तू- तू मै मै!
2
भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण; तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड
3
नागपुरात चोरट्यांचा आतंक; दिवसाढवळ्या कारची काच फोडून २५ लाख पळवले!
4
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
6
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
7
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
8
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
9
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
10
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
11
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
12
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
13
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
14
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
15
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
16
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
17
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
18
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
19
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
20
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?

बदलत्या वातावरणाचा आंबा उत्पादनाला धोका

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2020 00:26 IST

गेल्या काही दिवसांपासून वातावरणातील सातत्याने होत असलेल्या बदलामुळे आंबा उत्पादन धोक्यात आले आहे.

सिकंदर अनवारेदासगाव : गेल्या काही दिवसांपासून वातावरणातील सातत्याने होत असलेल्या बदलामुळे आंबा उत्पादन धोक्यात आले आहे. या बदलामुळे आलेल्या मोहोरावर कीड निर्माण होण्याची शक्यता आहे. यामुळे शेतकऱ्यांनी विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. त्याचबरोबर नियमित औषधांची फवारणी करावी, असे आवाहन महाड कृषी उप विभागीय अधिकारी डॉ. प्रफुल्ल बनसोडे यांनी केले आहे.महाड, पोलादपूर, म्हसळा, श्रीवर्धन या चारही तालुक्यांतील हवामान आंब्याला पोषक आहे. संपूर्ण रायगड जिल्ह्यांमध्ये ९ हजार ७७५ हेक्टर क्षेत्रामध्ये आंब्याचे उत्पन्न घेण्यात येते. महाड तालुक्यात ७२५ हेक्टर, पोलादपूरमध्ये १५१.३५ हेक्टर, म्हसळामध्ये १,८७९ हेक्टर तर श्रीवर्धनमध्ये चार हजार ६६५.३५ हेक्टर क्षेत्रांमध्ये आंब्याचे उत्पादन घेतले जाते. या क्षेत्रात सातत्याने वातावरणात बदल होत आहे. या सध्याच्या बदलामुळे शेतकऱ्यांनी सावध राहाण्याची आवश्यकता आहे. ज्या वेळी मोहोर दिसू लागतो, त्या वेळी पहिली फवारणी पोपटी रंगाच्या पालवीवर करावी. या फवारणीमुळे पावसाळ्यानंतर कोवळ्या फुटीवर येणाºया तुडतुड्यांपासून संरक्षण होते. तुडतुड्यामुळे पानावर चिकटा पडल्याने झाडाला मुंग्या येण्याची शक्यता असते. या फवारणीमुळे मुंग्यांपासूनही संरक्षण होते असे कृषी पर्यवेक्षक रमेश वाघमारे आणि कृषी सहायक किरण कोकरे यांनी सांगितले.>‘भुरी’चा प्रादुर्भावगेल्या काही दिवसांपासून हवामानातील सतत होणाºया बदलामुळे आंब्यावरील मोहरावर भुरी रोगाचा प्रादुर्भाव जाणवू लागत असला, तरी महाड पोलादपूर तालुक्यामध्ये याचे प्रमाण अत्यल्प असल्याने वेळीच काळजी घेण्याची आवश्यकता आहे. महाड, पोलादपूर तालुक्यांतील शेतकºयांनी आंबा पिकाप्रमाणे शेती विषयक अन्य काही अडचणी असल्यास कृषी पर्यवेक्षक रमेश वाघमारे, कृषी सहायक किरण कोकरे यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन उप विभागीय कृषी अधिकारी डॉ. प्रफल्ल बनसोडे यांनी केले आहे.