शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
2
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
3
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
4
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
5
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
6
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर
7
प्रभागरचना, आरक्षणावरील निकालांच्या अधीन असेल स्थानिक संस्था निवडणूक- उच्च न्यायालय
8
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
9
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
10
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
11
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
12
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
13
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
14
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
15
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
16
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
17
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
18
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
19
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
20
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली

नांगलवाडी येथे अवजड वाहनांमुळे अपघाताचा धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2020 23:58 IST

रस्त्याच्या दुतर्फा उभ्या असणाऱ्या वाहनांवर महाड एमआयडीसी वाहतूक पोलिसांच्या कारवाईची गरज

दासगाव : महाड औद्योगीक वसाहतीचे प्रवेशद्वार असलेल्या नांगलवाडी गावाजवळ मुंबई-गोवा महामार्गावर रस्त्याच्या दुतर्फा अवजड वाहने उभी केली जात असल्याने महामार्गावरील वाहनांना आणि औद्योगिक क्षेत्रात ये-जा करणाऱ्या वाहनचालकांना त्रास होत आहे. महाड एआयडीसी वाहतूक पोलिसांनी याबाबत कारवाई आणि कार्यवाही करण्याची गरज निर्माण झाली आहे.

महाड एमआयडीसीमध्ये प्रवेश होत असलेल्या नांगलवाडी फाट्यावर मुंबई- गोवा महामार्गावर रस्त्यालगत दुतर्फा वाहने उभी केली जात आहेत. रस्त्याच्या दुतर्फा अवजड वाहनांची पार्किंग केली जात असल्याने महामार्गावरील वाहने आणि एमआयडीसीमध्ये ये-जा करणाºया वाहनांना याचा त्रास सहन करावा लागत आहे.

महामार्ग दुपदरीकरणाचे काम सुरू असल्याने येथील व्यावसायिकांनी आपली वाहने महामार्गालगत लावणे सुरू केले आहे. शिवाय वाहन दुरुस्तीसाठी आणली जाणारी वाहनेदेखील याच ठिकाणी थांबविली जात आहेत. यामध्ये बहुतांश अवजड वाहने ही रासायनाने भरलेली असतात. मुंबई-गोवा महामार्गावर सातत्याने वर्दळ सुरू असतानाच ही वाहने रस्त्यावर येत असल्याने अपघाताचा धोका निर्माण झाला आहे.

महाड औद्योगिक क्षेत्रात प्रवेश करण्यासाठी येथूनच सुरुवात होते. या ठिकाणी नांगलवाडी गाव असल्याने नागरिकांचीदेखील वर्दळ सुरू असते. महामार्गालगत नडगाव आणि नांगलवाडी गावांच्या शाळा असल्याने लहान विद्यार्थीदेखील या ठिकाणी पायी चालत जात असताना या विद्यार्थ्यांनादेखील या वाहनांचा त्रास होत आहे. ही अवजड वाहने महामार्गाच्या साइडपट्टीवरच लावली जात असल्याने विद्यार्थ्यांना रस्त्यावरून चालावे लागत आहे. यामुळे विद्यार्थ्यांच्या जीवितालादेखील धोका निर्माण झाला आहे. या ठिकाणी यापूर्वीदेखील अनेकदा अपघाताच्या घटना घडल्या आहेत. यामुळे येथील वाहतूक महामार्गापासून हटविण्याची मागणी होत आहे.

मुंबई -गोवा महामार्गावरील वाहने आणि महाड औद्योगिक क्षेत्रातील वाहने याच ठिकाणाहून ये-जा करत आहेत. एमआयडीसीमधील कामगार देखील येथूनच आपली वाहने घेऊन जातात. महाडमधून जाणाºया छोट्या रिक्षादेखील एमआयडीसीत जाताना येथूनच जात असतात. या सर्वांना या उभ्या अवजड वाहनांचा त्रास होत आहे. अवजड वाहने महामार्गावर खुशाल उभी केली जात असल्याने अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. अवजड वाहने महामार्गापासून लांब सुरक्षित ठिकाणी उभी केली जावीत, अशी मागणी नागरिक, वाहनचालक करत आहेत.

टॅग्स :Raigadरायगडroad safetyरस्ते सुरक्षाMaharashtraमहाराष्ट्र