शहरं
Join us  
Trending Stories
1
भीषण अपघात! चित्रदुर्गात ट्रकशी धडक झाल्यानंतर स्लीपर बसला आग, १७ जणांचा मृत्यू
2
'आता हिशोब सरळ आहे'; राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येताच भाजपने मांडलं मतांचे गणित, आकडेवारीत कोण वरचढ?
3
तुम्ही आम्हाला मतदान केले, तरच...; सहायक आयुक्तांना व्यासपीठावर बसवून मंत्री राणे यांची प्रचारसभा
4
मेहुण्याचा जाच आणि भावाचा राग! दारू पाजली अन् सपासप केले वार; वादाचं कारण ऐकून होईल संताप
5
एक दोन नाही...! पंधरा राज्यांमध्ये बहिणी झाल्या लाडक्या; त्या कुठे कुठे करतात खर्च...
6
तामिळनाडू हादरलं! कडलूरमध्ये भीषण अपघात; भरधाव बसने दोन कारना चिरडले, ९ जणांचा मृत्यू
7
'धुरंधर'च्या FA9LA गाण्यावर स्वत:च्याच लग्नात नाचला मराठी अभिनेता, सगळे बघतच राहिले, व्हिडीओ व्हायरल
8
महास्फोट! एपस्टीनच्या 'त्या' १० लाख कागदपत्रांमध्ये दडलंय काय? नेमकं सत्य काय? जगभरात खळबळ!
9
वर्षानुवर्षांची स्क्रिप्ट बदला, विकासावर बोला, हजार रुपये मिळवा : देवेंद्र फडणवीस
10
हमास प्रमुख इस्माईल हानियाला हत्येच्या काही वेळ आधीच गडकरी भेटलेले...; पहाटे ४ वाजता हॉटेलवर अधिकारी आले...
11
तारिक रहमान परतण्यापूर्वी बांगलादेशात पुन्हा हिंसाचार उफाळला; ढाका बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू
12
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
13
संपादकीय: निवडणूक कामात शिक्षकच का? समोर दहावी, बारावीच्या परीक्षाही...
14
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २५ डिसेंबर २०२५: आनंदाची बातमी मिळेल, कुटुंबातील वातावरण सुखावह राहील!
15
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
16
‘निवडून आलो, तर पक्ष बदलणार नाही’, असे लिहून देता का?
17
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
18
मोठा धक्का! बीकेसीतील बुलेट ट्रेन स्थानकाचे काम तात्काळ थांबवण्याची नाेटीस
19
देशातील हवाई वाहतूक क्षेत्रात आणखी दोन नव्या कंपन्यांची एन्ट्री; हिंद एअर, फ्लाईएक्स्प्रेसला केंद्र सरकारकडून मंजुरी
20
‘त्या’ कुटुंबाची जबाबदारी बांगलादेश सरकारने स्वीकारली
Daily Top 2Weekly Top 5

परतीच्या पावसाने भातशेतीचे नुकसान

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2019 00:00 IST

शेतकरी हवालदिल; खारअंबोलीत पंचनामे करण्याची मागणी

आगरदांडा : मुरुड तालुक्यातील खारअंबोली परिसरातील परतीच्या पावसामुळे कापलेल्या भातशेतीला अंकुर आल्याने शेतकऱ्याचे हजारो रुपयांचे नुकसान झाले आहे. यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत.

कापणीयोग्य झालेले पीक शेतात आडवे पडल्याने शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. मुरुडमध्ये कृषी विभगात अनेक शेतकºयांनी पंचनामे करा, अशी मागणी करूनसुद्धा शासन लक्ष देत नसल्याने शेकडो शेतकºयांना एकत्र करून मोठा मोर्चा काढण्याचा इशारा खारअंबोली ग्रामपंचायतीचे माजी सरपंच मनोज कमाने यांनी दिला आहे.

खारअंबोली परिसरातील जोसरंजन, उंडरगाव, खतिबखार या परिसरात भाताची कापणी होऊन भाताला पाण्यात भिजल्याने मोड येऊन रोपे तयार झाली आहेत. आता भात कापणी हंगाम सुरू होत असताना पावसाचे संकट पुन्हा समोर ठाकल्याने येथील शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. मुरुड तालुक्यात मागील आठवड्यात अनेक ठिकाणी परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावली. दिवसा कडकडीत ऊन आणि सायंकाळी अचानक आभाळ भरून येऊन जोरदार वाºयासह पावसाच्या सरी कोसळत आहेत.

विजेच्या कडकडाटासह जोरदार पाऊस पडत असल्यामुळे परतीच्या या पावसाचा भातशेतीवर मात्र प्रतिकूल परिणाम झाला आहे. कापणीयोग्य पीक शेतात आडवे झाल्याने शेतकºयाचे हजारो रुपयांचे नुकसान झाले आहे. या संदर्भात कुषी अधिकारी व तहसीलदार यांना शेतकºयांनी माहिती देऊनसुद्धा दुर्लक्ष करीत आहेत. आजतागात कोणत्याही अधिकाºयाने या भागाला भेट न दिल्याने अंबोली परिसरातील शेतकरी रस्त्यावर उतरेल, असा इशारा मनोज कमाने यांनी दिला आहे.

टॅग्स :Farmerशेतकरी