शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

रेवस - रेडी सागरी महामार्गाचे काम सप्टेंबरमध्ये सुरु करणार - सुनिल तटकरे 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2020 22:30 IST

रेवस-रेडी सागरी महामार्गाचे स्वप्न तत्कालीन मुख्यमंत्री बॅ. ए. आर. अंतुले यांनी पाहिले होते.

ठळक मुद्दे रेवस, करंजा, अलिबाग, नांदगाव, मुरुड, दिघी, दिवेआगर, शेखाडीमार्गे रेडी या भागातून सागरी महामार्ग जाणार आहे.

- आविष्कार देसाई

अलिबाग : रेवस - रेडी सागरी महामार्गाचे काम नोव्हेंबर महिन्यात सुरु होणार आहे. सरकारने चार हजार 500 कोटी रुपयांच्या खर्चाला मान्यता दिली आहे, अशी माहिती खासदार सुनिल तटकरे यांनी येथे दिली. अलिबाग येथील पत्रकार परिषदेते ते बोलत होते. रेवस-रेडी सागरी महामार्गाचे स्वप्न तत्कालीन मुख्यमंत्री बॅ. ए. आर. अंतुले यांनी पाहिले होते.

राज्य कोरोनाच्या संकटातून जात असताना आर्थिक घडी विस्कटली आहे. मात्र सदर प्रकल्प पूर्ण झाल्यास कोकणातील पर्यटन उद्योगाला नवीन आयाम प्राप्त होणार आहेत. त्यामुळे राज्य सरकारने याला मान्यता दिली आहे, असे तटकरे यांनी सांगितले. रेवस-रेडी प्रकल्प दोन वर्षात पूर्ण करायचा आहे. त्यासाठी डिपीआर तयार करण्याचे काम एका एजन्सीला देण्यात आले आहे.

कामाच्या निविदा एका महिन्यात निघतील साधारणपणे सप्टेंबरमध्ये प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणे अपेक्षित असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. रेवस, करंजा, अलिबाग, नांदगाव, मुरुड, दिघी, दिवेआगर, शेखाडीमार्गे रेडी या भागातून सागरी महामार्ग जाणार आहे. त्यामुळे तेथील पयर्टन विकासाला नवीन आयाम प्राप्त होणार असल्याने आर्थिक भरभराट होण्यास मदत मिळेल, असे तटकरे यांनी स्पष्ट केले.

जिल्ह्यात कठोर उपाय योजना करणारराज्यासह रायगड जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग सातत्याने वाढतच आहे. यासंबंधी तातडीने उपाय योजना करणे आवश्यक आहे. याबाबत शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री आदिती तटकरे यांच्या अध्यक्षतेखाली विशेष बैठक होणार आहे. त्या बैठकीत सर्व पक्षीय आमदार उपस्थित राहणार आहेत. कोरोना वाढता आकडा हा चिंताजनक आहे. त्यामुळे आता कठोर उपाय योजना करण्यावाचून पर्याय नाही, असेही तटकरे यांनी स्पष्ट केले. कठोर उपाय योजना करताना राज्य आणि केंद्र सरकारकडे कोणत्या बाबींचा पाठपुरावा करायचा याबाबतही बैठकीत विचार विनिमय होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

टॅग्स :sunil tatkareसुनील तटकरेalibaugअलिबाग