शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

रेवस - रेडी सागरी महामार्गाचे काम सप्टेंबरमध्ये सुरु करणार - सुनिल तटकरे 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2020 22:30 IST

रेवस-रेडी सागरी महामार्गाचे स्वप्न तत्कालीन मुख्यमंत्री बॅ. ए. आर. अंतुले यांनी पाहिले होते.

ठळक मुद्दे रेवस, करंजा, अलिबाग, नांदगाव, मुरुड, दिघी, दिवेआगर, शेखाडीमार्गे रेडी या भागातून सागरी महामार्ग जाणार आहे.

- आविष्कार देसाई

अलिबाग : रेवस - रेडी सागरी महामार्गाचे काम नोव्हेंबर महिन्यात सुरु होणार आहे. सरकारने चार हजार 500 कोटी रुपयांच्या खर्चाला मान्यता दिली आहे, अशी माहिती खासदार सुनिल तटकरे यांनी येथे दिली. अलिबाग येथील पत्रकार परिषदेते ते बोलत होते. रेवस-रेडी सागरी महामार्गाचे स्वप्न तत्कालीन मुख्यमंत्री बॅ. ए. आर. अंतुले यांनी पाहिले होते.

राज्य कोरोनाच्या संकटातून जात असताना आर्थिक घडी विस्कटली आहे. मात्र सदर प्रकल्प पूर्ण झाल्यास कोकणातील पर्यटन उद्योगाला नवीन आयाम प्राप्त होणार आहेत. त्यामुळे राज्य सरकारने याला मान्यता दिली आहे, असे तटकरे यांनी सांगितले. रेवस-रेडी प्रकल्प दोन वर्षात पूर्ण करायचा आहे. त्यासाठी डिपीआर तयार करण्याचे काम एका एजन्सीला देण्यात आले आहे.

कामाच्या निविदा एका महिन्यात निघतील साधारणपणे सप्टेंबरमध्ये प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणे अपेक्षित असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. रेवस, करंजा, अलिबाग, नांदगाव, मुरुड, दिघी, दिवेआगर, शेखाडीमार्गे रेडी या भागातून सागरी महामार्ग जाणार आहे. त्यामुळे तेथील पयर्टन विकासाला नवीन आयाम प्राप्त होणार असल्याने आर्थिक भरभराट होण्यास मदत मिळेल, असे तटकरे यांनी स्पष्ट केले.

जिल्ह्यात कठोर उपाय योजना करणारराज्यासह रायगड जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग सातत्याने वाढतच आहे. यासंबंधी तातडीने उपाय योजना करणे आवश्यक आहे. याबाबत शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री आदिती तटकरे यांच्या अध्यक्षतेखाली विशेष बैठक होणार आहे. त्या बैठकीत सर्व पक्षीय आमदार उपस्थित राहणार आहेत. कोरोना वाढता आकडा हा चिंताजनक आहे. त्यामुळे आता कठोर उपाय योजना करण्यावाचून पर्याय नाही, असेही तटकरे यांनी स्पष्ट केले. कठोर उपाय योजना करताना राज्य आणि केंद्र सरकारकडे कोणत्या बाबींचा पाठपुरावा करायचा याबाबतही बैठकीत विचार विनिमय होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

टॅग्स :sunil tatkareसुनील तटकरेalibaugअलिबाग