शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

चाकरमान्यांनो, गणपतीसाठी आता बिनधास्त जा बोटीने; उद्यापासून रेवस-भाऊचा धक्का सेवा सुरू!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2024 09:03 IST

हवामानाचा अंदाज घेऊन आणि जसजशी प्रवासीसंख्येत वाढ होईल तशी लाँचेसच्या फेऱ्या वाढविण्यात येणार आहेत. 

लोकमत न्यूज नेटवर्क, उरण : पावसाळी हंगामात गेल्या तीन महिन्यांपासून बंद असलेली रेवस-भाऊचा धक्का या सागरी जलमार्गावरील बोटसेवा दि. १ सप्टेंबरपासून सुरू करण्यात येणार आहे. तसेच उरण-भाऊचा धक्कादरम्यान वाढविण्यात आलेल्या तिकीटदरात १५ रुपयांची कपात केली आहे. यामुळे गणपतीसाठी काेकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना दिलासा मिळणार आहे. 

दरवर्षी पावसाळी हंगामात भाऊचा धक्का-उरण या मार्गावरील प्रवासी तिकीटदरात वाढ केली जाते. त्यामुळे दि. २६ मेपासून भाऊचा धक्का-उरण या सागरी मार्गावरील तिकीट दरात ८० रुपयांवरून १०५ अशी १५ रुपयांनी वाढ केली होती. पावसाळी हंगामानंतर १ सप्टेंबरपासून उन्हाळी हंगामासाठी तिकीट दरात १५ रुपये कपात केली आहे. १ सप्टेंबरपासून या मार्गावरील तिकीट दर प्रौढांसाठी ८०, तर लहानांसाठी ३९ रुपये आकारण्यात येणार आहे.

वारंवार बदलणारे वादळी व खराब हवामान, पाऊस, समुद्रातील उंच लाटामुळे खबरदारीची उपाययोजना म्हणून पावसाळी हंगामासाठी दरवर्षी रेवस-भाऊचा धक्का या सागरी जलमार्गावरील प्रवासी वाहतूक जून ते ऑगस्ट अशी बंद ठेवण्यात येते. ही प्रवासी बोटसेवाही १ सप्टेंबरपासून सुरू होणार आहे.  

हवामानाचा अंदाज घेऊन आणि जसजशी प्रवासीसंख्येत वाढ होईल तशी लाँचेसच्या फेऱ्या वाढविण्यात येणार आहेत. - जमीर बामणे, सचिव, मुंबई जलवाहतूक संस्था

टॅग्स :Ganpati Festivalगणेश चतुर्थी २०२४Ganesh Mahotsavगणेशोत्सव