शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

चाकरमान्यांनो, गणपतीसाठी आता बिनधास्त जा बोटीने; उद्यापासून रेवस-भाऊचा धक्का सेवा सुरू!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2024 09:03 IST

हवामानाचा अंदाज घेऊन आणि जसजशी प्रवासीसंख्येत वाढ होईल तशी लाँचेसच्या फेऱ्या वाढविण्यात येणार आहेत. 

लोकमत न्यूज नेटवर्क, उरण : पावसाळी हंगामात गेल्या तीन महिन्यांपासून बंद असलेली रेवस-भाऊचा धक्का या सागरी जलमार्गावरील बोटसेवा दि. १ सप्टेंबरपासून सुरू करण्यात येणार आहे. तसेच उरण-भाऊचा धक्कादरम्यान वाढविण्यात आलेल्या तिकीटदरात १५ रुपयांची कपात केली आहे. यामुळे गणपतीसाठी काेकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना दिलासा मिळणार आहे. 

दरवर्षी पावसाळी हंगामात भाऊचा धक्का-उरण या मार्गावरील प्रवासी तिकीटदरात वाढ केली जाते. त्यामुळे दि. २६ मेपासून भाऊचा धक्का-उरण या सागरी मार्गावरील तिकीट दरात ८० रुपयांवरून १०५ अशी १५ रुपयांनी वाढ केली होती. पावसाळी हंगामानंतर १ सप्टेंबरपासून उन्हाळी हंगामासाठी तिकीट दरात १५ रुपये कपात केली आहे. १ सप्टेंबरपासून या मार्गावरील तिकीट दर प्रौढांसाठी ८०, तर लहानांसाठी ३९ रुपये आकारण्यात येणार आहे.

वारंवार बदलणारे वादळी व खराब हवामान, पाऊस, समुद्रातील उंच लाटामुळे खबरदारीची उपाययोजना म्हणून पावसाळी हंगामासाठी दरवर्षी रेवस-भाऊचा धक्का या सागरी जलमार्गावरील प्रवासी वाहतूक जून ते ऑगस्ट अशी बंद ठेवण्यात येते. ही प्रवासी बोटसेवाही १ सप्टेंबरपासून सुरू होणार आहे.  

हवामानाचा अंदाज घेऊन आणि जसजशी प्रवासीसंख्येत वाढ होईल तशी लाँचेसच्या फेऱ्या वाढविण्यात येणार आहेत. - जमीर बामणे, सचिव, मुंबई जलवाहतूक संस्था

टॅग्स :Ganpati Festivalगणेश चतुर्थी २०२४Ganesh Mahotsavगणेशोत्सव