शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
2
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
3
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
4
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
5
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
6
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
7
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
8
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
9
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
10
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
11
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
12
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
13
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
14
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
15
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
16
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
17
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
18
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
19
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
20
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव

दिव्यांगांना सक्षम करणे समाजाची जबाबदारी- नितीन गडकरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2018 02:01 IST

देशात दिव्यांगांची संख्या जवळपास पाच टक्के असून, त्यांना सक्षम करणे समाजाची जबाबदारी असल्याचे प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पेण येथे केले.

वडखळ : देशात दिव्यांगांची संख्या जवळपास पाच टक्के असून, त्यांना सक्षम करणे समाजाची जबाबदारी असल्याचे प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पेण येथे केले.पेण येथील एम्पथी फाउंडेशन मुंबई यांनी बांधलेली नूतन इमारत सुहित जीवन ट्रस्टच्या सुमंगल गतिमंद (बौद्धिक अक्षमता) मुलांची शाळेचे उद्घाटन व ए.डब्ल्यू.एम.एच. महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू करण्यात येणाऱ्या शीघ्र हस्तक्षेप केंद्राचे उद्घाटन नितीन गडकरी यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी रायगड जिल्हा पालकमंत्री रवींद्र चव्हाण, आमदार धैर्यशील पाटील, माजी मंत्री रवि पाटील, रायगड जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा अदिती तटकरे, एम्पथी फाउंडेशनचे रमेश दमाणी सुहित जीवन ट्रस्टच्या अध्यक्षा सुरेखा पाटील आदी मान्यवरांसह विद्यार्थी व नागरिक उपस्थित होते.दिव्यांगांना समाजाचे समर्थन मिळाले पाहिजे त्यांना योग्य प्रकारे प्रशिक्षण मिळाले तरच ते आत्मविश्वासाने जगू शकतील, समाजातील सदृढ लोकांनी त्यांच्याबाबत सहनशीलतेचे भान ठेवून त्यांना मदत करणे कर्तव्य मानले पाहिजे, असे विचार गडकरी यांनी मांडले.या वेळी सुहित जीवन ट्रस्टच्या अध्यक्षा सुरेखा पाटील यांचे कार्य उल्लेखनीय असून, जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्टच्या तर्फे या शाळेला एक कोटी रु पयांचा मदतनिधी देत असल्याचे गडकरी यांनी जाहीर केले. कार्यक्रमात शाळेतील विद्यार्थ्यांनी बनविलेल्या राख्या विद्यार्थिनींनी नितीन गडकरी, पालकमंत्री रवींद्र चव्हाण व उपस्थित मान्यवरांना बांधल्या.

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरीRaigadरायगड