शहरं
Join us  
Trending Stories
1
दुबे यांनी मुंबईत येऊन दाखवावे, समुद्रात बुडवून बुडवून मारू; राज ठाकरेंचे भाजप खासदाराला प्रत्यूत्तर 
2
आजचे राशीभविष्य, १९ जुलै २०२५: यश प्राप्तीसाठी कठोर परिश्रम करावे लागतील
3
मुख्यमंत्री संतापले : लाेक म्हणतात आमदार माजले, आपण लाथाबुक्क्यांतून संदेश देणार आहोत का?
4
मराठा आरक्षण : अंतिम सुनावणीस सुरुवात, अंतरिम स्थगिती देण्याची याचिकाकर्त्यांची मागणी
5
आयपीएस सुपेकरांवर कारवाई का नाही? वैशाली हगवणे आत्महत्या, पोलिसांवर कडक ताशेरे
6
मंत्र्यांच्या आईच्या नावावर डान्सबार; अनिल परब यांचा आरोप
7
कर्जमाफीचे आश्वासन पूर्ण करूच, शेतकऱ्यांसाठी कधी हात आखडता घेतला नाही : मुख्यमंत्री
8
मी तसे बोलायला नको होते; सभागृहात आणि बाहेर केलेल्या विधानांवरून आमदारांचा माफीनामा
9
‘विधिमंडळ प्रवेश पास ५ ते १० हजारांत विकले जातात’; आमदारांच्या आरोपाने खळबळ
10
पडळकरांकडून दिलगिरी व्यक्त; जे घडले ते वाईटच : आव्हाड
11
शेतकऱ्यांसाठी अलर्ट : टॅरिफमुळे अमेरिकेची कृषी उत्पादने भारतात आल्यास गंभीर परिणाम 
12
ऑटो ट्रान्सलेशनमुळे गोंधळ!; ‘मेटा’च्या अनुवाद तंत्राने मुख्यमंत्री सिद्धरामय्यांनाच ठरवले ‘मृत’
13
माजी मुख्यमंत्र्यांच्या मुलाला मद्य घोटाळ्यात ईडीची अटक; छत्तीसगडमध्ये चैतन्य बघेल यांना कोठडी
14
आव्हाड घुसले पोलिस कारखाली, ओढून काढावे लागले बाहेर
15
महाराष्ट्र, केंद्र सरकारला सुप्रीम कोर्टाचे खडे बोल ; विशेष न्यायालय स्थापना प्रस्तावासाठी शेवटची संधी
16
ड्युक्स कंपनीने तपासणीसाठी कसोटी चेंडू परत मागितले; भारत-इंग्लंड कसोटी मालिकेत चर्चेचा विषय
17
बीसीसीआय मालमाल झाली! ₹ ९,६४१ कोटींची केली रेकॉर्ड ब्रेकिंग कमाई
18
भारतीय महिला संघ लॉर्ड्स वनडे जिंकण्यास सज्ज; इंग्लंडविरुद्ध दुसरा सामना आज
19
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
20
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं

केंबुर्लीकरांची तहान भागवण्याचा संकल्प

By admin | Updated: May 22, 2016 02:12 IST

सध्या महाड तालुक्यातील अनेक गावांमध्ये भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. मुंबई - गोवा महामार्गालगत असणारा केंबुर्ली या गावात अशाच प्रकारे पाणी टंचाईची झळ बसली आहे

दासगाव : सध्या महाड तालुक्यातील अनेक गावांमध्ये भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. मुंबई - गोवा महामार्गालगत असणारा केंबुर्ली या गावात अशाच प्रकारे पाणी टंचाईची झळ बसली आहे. जनता पाण्याकरिता वणवण करीत आहे. अशा परिस्थितीत याच गावातील किफायत कासीम घोले हा गावासाठी आदर्श बनला असून स्वखर्चाने एका टेम्पोवर हजार लिटरची टाकी बसवून दिवसरात्र गावातील प्रत्येक वाडीवर गेली पंधरा दिवसापासून स्वत: उभे राहून मोफत पाणी वाटप करत आहे.वडील कासीम अब्दला घोले बांधकाम व्यवसायिक आणि किफायत कासीम घोले याने बी.कॉम शिक्षण घेतल्यानंतर तालुक्यातील टोळ या गावी किराणा मालाचे दुकान चालवतो. गावात भिषण पाणी टंचाई आहे, आपल्याला लोकांच्या पाण्याची समस्या दूर करण्यासाठी काहीतरी करायचे आहे या दृष्टीकान मनामध्ये बाळगत त्याने एक छोटासा टेंपो विकत घेतला. त्यामध्ये हजार लिटरची टाकी बसवली. यासाठी त्याने आपल्या खिशातून जवळपास साडेतीन लाख रुपये खर्च केले. गेली पंधरा दिवस केंबुर्ली गावात संपूर्ण वाडीवाडीवर तो स्वत: उभे राहून या टेम्पोच्या सहाय्याने पाणी वाटप पुण्याईचे काम करत आहे. केंबुर्ली पासून १५ किमी अंतरावर असलेल्या दाभोळहून तो दरदिवस पाच ते सहा पाण्याच्या फेऱ्या मारतो. गाडीला लागणारे डिझेल तसेच पाणी भरण्याकरिता तसेच वाटपासाठी लागणारा कामगारांचा खर्च स्वत: करतो. दरदिवशी त्याला या पाण्यासाठी जवळपास हजार रुपये खर्च असून अहोरात्र गावाच्या सेवेसाठी तो झटत आहे.