शहरं
Join us  
Trending Stories
1
GST: जीएसटी कपातीच्या बैठकीत मोठे राजकारण रंगले; विरोधी राज्यांचे अर्थमंत्री अडून बसले, गोष्ट मतदानापर्यंत गेलेली...
2
मोठा गाजावाजा करत मुंबईकडे कूच करणार त्याआधीच वैभव खेडेकरांचा भाजपा पक्षप्रवेश स्थगित; कारण काय?
3
नाशिक मंडळ : अल्प उत्पन्न गटासाठी म्हाडाची ४७८ घरे
4
पुरामुळे भारत-पाकिस्तान सीमेचे मोठे नुकसान; ११० किमीच्या कुंपणाची पडझड, बीएसएफच्या ९० चौक्या पाण्यात
5
PM मोदींच्या मणिपूर दौऱ्यापूर्वी मोठे यश; राज्य आणि केंद्राने कुकी समूहाशी केला शांतता करार
6
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये उद्ध्वस्त झालेल्या नूर खान एअरबेसच्या दुरुस्तीचे काम सुरू; भारताने ब्राह्मोस टाकून उद्ध्वस्त केले होते
7
फार्महाऊसवर सीक्रेट बैठक, असीम मुनीरचा तगडा प्लॅन; पुढील १० वर्ष पाकिस्तानवर करणार 'राज्य'
8
बस फक्त पेट्रोल, डिझेल तेवढे जीएसटीमध्ये आणायचे राहिले...; तिजोरीत फक्त २० रुपयेच आले असते...
9
शिक्षक दिनानिमित्त मराठी Messages, Quotes, Whatsapp Status आणि Greetings शेअर करुन द्या लाडक्या शिक्षकांना शुभेच्छा!
10
"विकास हा संतुलितपणे हवा"; व्हायरल व्हिडीओनंतर सर्वोच्च न्यायालयाने टोचले कान, केंद्राला नोटीस
11
मुंबई उपनगरात ईद-ए-मिलाद निमित्त सुट्टीच्या तारखेत बदल, ५ सप्टेंबरची सुट्टी कधी? जाणून घ्या
12
Delhi Flood: खवळलेल्या यमुनेचं भयावह रुप, पुराचं पाणी मंत्रालयाच्या उंबरठ्यावर, फोटो पहा
13
“हैदराबाद गॅझेटला सरकार अनुकूल, तेलंगणाप्रमाणे ४२ टक्के आरक्षण देणार का?”: हर्षवर्धन सपकाळ
14
GST च्या उत्साहानंतर बाजारात नफावसुली! सेन्सेक्स-निफ्टी उच्च पातळीवरून खाली, सर्वाधिक घसरण कुठे?
15
देवाची प्रत्यक्ष भेट! उपेंद्र लिमये यांना भेटले सुपरस्टार रजनीकांत, थलायवाला पाहून अभिनेत्याचा आनंद गगनात मावेना
16
खराब सर्व्हिस, समस्या...! बजाज चेतक पाचव्या नंबरवर फेकली गेली! ऑगस्टमध्ये स्कूटर खपविताना आले नाकीनऊ...
17
US Open 2025: अमेरिकन ओपन स्पर्धेत भारतीयाचा जलवा! जेतेपदाच्या अगदी जवळ पोहचलाय; आता फक्त...
18
पीएम किसानचा २१ वा हप्ता अडकणार? 'ही' चूक तात्काळ दुरुस्त करा, अन्यथा २००० रुपये मिळणार नाहीत!
19
१८ तास असेल राम मंदिर बंद, ‘या’ दिवशी अयोध्येत अजिबात जाऊ नका; रामलला विश्रांती घेणार?
20
हुंड्याने घेतला आणखी एक बळी! २८ वर्षांच्या पूजाश्रीने संपवलं जीवन, पतीला अटक, काय-काय घडलं?

कंटेनरमध्ये राहणाऱ्यांना मार्चअखेर घराचा ताबा, तळिये दरडग्रस्तांच्या पुनर्वसनाचे काम प्रगतिपथावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2023 09:38 IST

Home News: दरडग्रस्त तळिये गावाचे पुनर्वसनाचे काम सुरू असून म्हाडाच्या पथकाने या कामांची पाहणी करून आढावा घेतला. २०० घरांपैकी १७० घरांचे बांधकाम हाती घेण्यात आले असून ९० घरांच्या फुटिंगचे काम झाले आहे.

महाड : दरडग्रस्त तळिये गावाचे पुनर्वसनाचे काम सुरू असून म्हाडाच्या पथकाने या कामांची पाहणी करून आढावा घेतला. २०० घरांपैकी १७० घरांचे बांधकाम हाती घेण्यात आले असून ९० घरांच्या फुटिंगचे काम झाले आहे. ३२ घरांचे स्ट्रक्चर उभारण्यात आले आहे. सध्या कंटेनरमध्ये राहत असलेल्या २५ कुटुंबीयांना मार्चअखेर नवीन घराचा ताबा देण्याचा प्रयत्न असेल तर २०० घरांचे बांधकाम एप्रिल २०२३ पर्यंत पूर्ण होईल, असे आश्वासन  म्हाडाचे कार्यकारी अभियंता धीरज जैन यांनी दिले आहे. 

तालुक्यातील तळिये गावावर २२ व २३ जुलै २०२१ च्या अतिवृष्टीमध्ये दरड कोसळून ६६ घरे गाडली गेली होती. त्यात ८७ जणांचा मृत्यू झाला होता. दरडग्रस्त तळिये गावाच्या पुनर्वसनात घरे बांधून देण्याचे काम म्हाडाने अर्थातच कोकण गृह निर्माण व क्षेत्र विकास महामंडळाने घेतले आहे, तर पायाभूत सुविधा पुरवण्याची जबाबदारी शासनाने जिल्हा परिषदेकडे आहे.

तळिये गावाच्या पुनर्वसनासाठी शासनामार्फत १७.६४ हेक्टर जमीन संपादित करण्यात आली. संपादित केलेल्या जागेमध्ये २३१ घरकुल बनवण्याचे काम ऑगस्ट २०२१ पासून म्हाडाने हाती घेतले. यासाठी ट्रान्सकॉन डेव्हलपर प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला कामाची कार्यादेश देण्यात आला आहे. उर्वरित ३० घरकुलांसाठी शासनामार्फत जागेचा शोध सुरू असून जागा संपादित केल्यानंतर ही घरकुलेही म्हाडामार्फत बांधली जाणार आहेत.

तळिये येथे म्हाडामार्फत बांधण्यात येणाऱ्या घरकुलाची पाहणी करण्यासाठी शुक्रवारी म्हाडाचे कार्यकारी अभियंता धीरज जैन, मुख्य जनसंपर्क अधिकारी वैशाली गडपाले, सहायक अभियंता राज अर्नालिका, जनसंपर्क अधिकारी हेमंत पाटील यांनी दौरा केला.

- नव्याने बांधण्यात येणारे घरकुल हे ६०० चौरस फुटांचे असून यामध्ये दोन बेडरूम, एक हॉल, किचन, संडास बाथरूम व चारही बाजूंनी ४ फूट पडवी, असे स्वरूप असणार आहे. - एका घरकुलांसाठी २० लाखांचे बजेट असून संपूर्ण प्रोजेक्टसाठी ७७ कोटींची प्रशासकीय मान्यता आहे. आयआयटी पवईकडून घरकुलाचे स्ट्रक्चर व त्यांचे मजबुतीकरण प्रमाणित करण्यात आले आहे. - ग्रामीण भागातील जनतेला मॉडर्न लाइफ देण्याचा प्रयत्न या घरकुलातून करण्यात आला आहे.  घरकुलाच्या मेंटेनन्सची ५ वर्षे जबाबदारी संबंधित ठेकेदाराने घ्यायची आहे. कमीत कमी ५० वर्षे टिकेल असे हे वॉटर व फायर प्रूफ बांधकाम आहे, असे जैन यांनी सांगितले.

टॅग्स :Homeसुंदर गृहनियोजनRaigadरायगड