शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

कंटेनरमध्ये राहणाऱ्यांना मार्चअखेर घराचा ताबा, तळिये दरडग्रस्तांच्या पुनर्वसनाचे काम प्रगतिपथावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2023 09:38 IST

Home News: दरडग्रस्त तळिये गावाचे पुनर्वसनाचे काम सुरू असून म्हाडाच्या पथकाने या कामांची पाहणी करून आढावा घेतला. २०० घरांपैकी १७० घरांचे बांधकाम हाती घेण्यात आले असून ९० घरांच्या फुटिंगचे काम झाले आहे.

महाड : दरडग्रस्त तळिये गावाचे पुनर्वसनाचे काम सुरू असून म्हाडाच्या पथकाने या कामांची पाहणी करून आढावा घेतला. २०० घरांपैकी १७० घरांचे बांधकाम हाती घेण्यात आले असून ९० घरांच्या फुटिंगचे काम झाले आहे. ३२ घरांचे स्ट्रक्चर उभारण्यात आले आहे. सध्या कंटेनरमध्ये राहत असलेल्या २५ कुटुंबीयांना मार्चअखेर नवीन घराचा ताबा देण्याचा प्रयत्न असेल तर २०० घरांचे बांधकाम एप्रिल २०२३ पर्यंत पूर्ण होईल, असे आश्वासन  म्हाडाचे कार्यकारी अभियंता धीरज जैन यांनी दिले आहे. 

तालुक्यातील तळिये गावावर २२ व २३ जुलै २०२१ च्या अतिवृष्टीमध्ये दरड कोसळून ६६ घरे गाडली गेली होती. त्यात ८७ जणांचा मृत्यू झाला होता. दरडग्रस्त तळिये गावाच्या पुनर्वसनात घरे बांधून देण्याचे काम म्हाडाने अर्थातच कोकण गृह निर्माण व क्षेत्र विकास महामंडळाने घेतले आहे, तर पायाभूत सुविधा पुरवण्याची जबाबदारी शासनाने जिल्हा परिषदेकडे आहे.

तळिये गावाच्या पुनर्वसनासाठी शासनामार्फत १७.६४ हेक्टर जमीन संपादित करण्यात आली. संपादित केलेल्या जागेमध्ये २३१ घरकुल बनवण्याचे काम ऑगस्ट २०२१ पासून म्हाडाने हाती घेतले. यासाठी ट्रान्सकॉन डेव्हलपर प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला कामाची कार्यादेश देण्यात आला आहे. उर्वरित ३० घरकुलांसाठी शासनामार्फत जागेचा शोध सुरू असून जागा संपादित केल्यानंतर ही घरकुलेही म्हाडामार्फत बांधली जाणार आहेत.

तळिये येथे म्हाडामार्फत बांधण्यात येणाऱ्या घरकुलाची पाहणी करण्यासाठी शुक्रवारी म्हाडाचे कार्यकारी अभियंता धीरज जैन, मुख्य जनसंपर्क अधिकारी वैशाली गडपाले, सहायक अभियंता राज अर्नालिका, जनसंपर्क अधिकारी हेमंत पाटील यांनी दौरा केला.

- नव्याने बांधण्यात येणारे घरकुल हे ६०० चौरस फुटांचे असून यामध्ये दोन बेडरूम, एक हॉल, किचन, संडास बाथरूम व चारही बाजूंनी ४ फूट पडवी, असे स्वरूप असणार आहे. - एका घरकुलांसाठी २० लाखांचे बजेट असून संपूर्ण प्रोजेक्टसाठी ७७ कोटींची प्रशासकीय मान्यता आहे. आयआयटी पवईकडून घरकुलाचे स्ट्रक्चर व त्यांचे मजबुतीकरण प्रमाणित करण्यात आले आहे. - ग्रामीण भागातील जनतेला मॉडर्न लाइफ देण्याचा प्रयत्न या घरकुलातून करण्यात आला आहे.  घरकुलाच्या मेंटेनन्सची ५ वर्षे जबाबदारी संबंधित ठेकेदाराने घ्यायची आहे. कमीत कमी ५० वर्षे टिकेल असे हे वॉटर व फायर प्रूफ बांधकाम आहे, असे जैन यांनी सांगितले.

टॅग्स :Homeसुंदर गृहनियोजनRaigadरायगड