शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
2
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
3
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
4
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
5
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
6
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
7
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
8
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
9
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
10
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
11
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
12
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
13
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
14
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
15
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
16
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
17
मस्तच! नवरात्रात कन्या पूजनानंतर मुलींना द्या 'ही' यूजफुल गिफ्ट्स; आनंदाने उजळतील चिमुकल्यांचे चेहरे
18
फुलांचा गजरा माळून गेली आणि फसली, ऑस्ट्रेलियात भारतीय अभिनेत्रीवर कारवाई, नेमकं कारण काय?  
19
जीएसटीनंतर Activa आणि Jupiter किती झाली किंमत? पहा सर्व कंपन्यांच्या स्कूटर्स... 
20
कतारनंतर आता तुर्कीवर हल्ला करणार इस्रायल? हमासशी आहे थेट कनेक्शन!

३० वर्षांची नुकसानभरपाई द्या

By admin | Updated: June 30, 2017 02:57 IST

रायगड जिल्ह्यातील खारेपाट विभागातील सुमारे तीन हजार हेक्टर शेती ३० वर्षे नापीक राहिल्याने १८ लाख क्विंटल भाताचे आणि माशांचे उत्पादन होऊ शकले नाही.

लोकमत न्यूज नेटवर्कअलिबाग : रायगड जिल्ह्यातील खारेपाट विभागातील सुमारे तीन हजार हेक्टर शेती ३० वर्षे नापीक राहिल्याने १८ लाख क्विंटल भाताचे आणि माशांचे उत्पादन होऊ शकले नाही. त्याचप्रमाणे ४५ लाख दिवसांचा रोजगारही बुडाला आहे. शेतकऱ्यांना कर्जमुक्ती बरोबरच प्रतिएकरी ५० हजार रुपये प्रमाणे ३० वर्षांची १५ लाख रुपये नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी श्रमिक मुक्ती दलाने केली आहे. सरकारकडून प्रतिसाद न आल्यास, याच आशयाची एक हजार पत्रे ९ आॅगस्टच्या क्रांती दिनी पाठवण्यात येतील, असा इशाराही श्रमिक मुक्ती दलाने दिला आहे.याबाबतचे निवदेन त्यांनी नुकतेच मुख्यमंत्र्यांना दिले.भरती-ओहोटीचा मध्य शोधून पूर्वजांनी अलिबाग तालुक्यातील धरमतर खाडीच्या पश्चिमेस समुद्राचे पाणी अडवून शेती तयार केली. याला आता ५०० वर्षांपेक्षा अधिक काळ लोटला आहे. त्या शेतीला निक्षारीकरणाची वैज्ञानिक पद्धत शोधून काढली. शेतीच्या माध्यमातून एकरी २० क्विंटल भात आणि एकरी ५२ शेतमजुरांना रोजगार निर्माण केला होता. भातासह त्याच पाण्यावर माशांचे उत्पादन घेतले जात होते. या दुबार पीकशेतीचा शोध आमच्याच पूर्वजांनी लावला होता, असे निवेदनात नमूद केले आहे.१९७९ साली खारलॅण्ड कायदा अस्तित्वात येण्याआधी गावकीच्या माध्यमातून खारबंदिस्तीची कामे श्रमदानातून केली जात होती. त्यानंतर ही कामे खारभूमी (जलसंपदा विभाग) करू लागले. कंत्राटदार कामाची बिले काढत आहेत. मात्र, खारबंदिस्ती फक्त कागदावरच उभारली जात असल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे.खारलॅण्डच्या या धोरणामुळे अलिबाग तालुक्यातील सात हजार हेक्टर खारभूमीच्या क्षेत्रापैकी तीन हजार ३६ हेक्टरपेक्षा जास्त सुपीक क्षेत्र खारबंदिस्ती न केल्याने नापीक झाले आहे. १९८२ सालापासून हे दुष्टचक्र सुरू आहे. ३० वर्षांमध्ये १८ लाख क्विंटल भाताचे आणि माशांचे उत्पादन होऊ शकलेले नाही. त्याचप्रमाणे ४५ लाख दिवसांचा रोजगारही बुडाला आहे, याबाबतची माहिती तत्कालीन कोकण आयुक्त प्रभाकर देशमुख यांना कळताच त्यांना धक्काच बसला होता, असेही भगत यांनी सांगितले.खारभूमी नापीक जमिनीची आकडेवारी सरकारला मिळावी. यासाठी रायगडचे पालकमंत्री प्रकाश मेहता यांनी रायगडच्या जिल्हाधिकाऱ्यांना २०१६मध्ये आदेश दिले होते. त्यावर अद्यापही कार्यवाही झालेली नाही.सुपीक जमिनी नापीक करून त्या भांडवलदारांच्या घशात कशा घालता येतील. यासाठी खारलॅण्ड विभाग प्रयत्नशील असल्याचा आरोप श्रमिक मुक्ती दलाचे नंदन पाटील यांनी केला आहे.