शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

३० वर्षांची नुकसानभरपाई द्या

By admin | Updated: June 30, 2017 02:57 IST

रायगड जिल्ह्यातील खारेपाट विभागातील सुमारे तीन हजार हेक्टर शेती ३० वर्षे नापीक राहिल्याने १८ लाख क्विंटल भाताचे आणि माशांचे उत्पादन होऊ शकले नाही.

लोकमत न्यूज नेटवर्कअलिबाग : रायगड जिल्ह्यातील खारेपाट विभागातील सुमारे तीन हजार हेक्टर शेती ३० वर्षे नापीक राहिल्याने १८ लाख क्विंटल भाताचे आणि माशांचे उत्पादन होऊ शकले नाही. त्याचप्रमाणे ४५ लाख दिवसांचा रोजगारही बुडाला आहे. शेतकऱ्यांना कर्जमुक्ती बरोबरच प्रतिएकरी ५० हजार रुपये प्रमाणे ३० वर्षांची १५ लाख रुपये नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी श्रमिक मुक्ती दलाने केली आहे. सरकारकडून प्रतिसाद न आल्यास, याच आशयाची एक हजार पत्रे ९ आॅगस्टच्या क्रांती दिनी पाठवण्यात येतील, असा इशाराही श्रमिक मुक्ती दलाने दिला आहे.याबाबतचे निवदेन त्यांनी नुकतेच मुख्यमंत्र्यांना दिले.भरती-ओहोटीचा मध्य शोधून पूर्वजांनी अलिबाग तालुक्यातील धरमतर खाडीच्या पश्चिमेस समुद्राचे पाणी अडवून शेती तयार केली. याला आता ५०० वर्षांपेक्षा अधिक काळ लोटला आहे. त्या शेतीला निक्षारीकरणाची वैज्ञानिक पद्धत शोधून काढली. शेतीच्या माध्यमातून एकरी २० क्विंटल भात आणि एकरी ५२ शेतमजुरांना रोजगार निर्माण केला होता. भातासह त्याच पाण्यावर माशांचे उत्पादन घेतले जात होते. या दुबार पीकशेतीचा शोध आमच्याच पूर्वजांनी लावला होता, असे निवेदनात नमूद केले आहे.१९७९ साली खारलॅण्ड कायदा अस्तित्वात येण्याआधी गावकीच्या माध्यमातून खारबंदिस्तीची कामे श्रमदानातून केली जात होती. त्यानंतर ही कामे खारभूमी (जलसंपदा विभाग) करू लागले. कंत्राटदार कामाची बिले काढत आहेत. मात्र, खारबंदिस्ती फक्त कागदावरच उभारली जात असल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे.खारलॅण्डच्या या धोरणामुळे अलिबाग तालुक्यातील सात हजार हेक्टर खारभूमीच्या क्षेत्रापैकी तीन हजार ३६ हेक्टरपेक्षा जास्त सुपीक क्षेत्र खारबंदिस्ती न केल्याने नापीक झाले आहे. १९८२ सालापासून हे दुष्टचक्र सुरू आहे. ३० वर्षांमध्ये १८ लाख क्विंटल भाताचे आणि माशांचे उत्पादन होऊ शकलेले नाही. त्याचप्रमाणे ४५ लाख दिवसांचा रोजगारही बुडाला आहे, याबाबतची माहिती तत्कालीन कोकण आयुक्त प्रभाकर देशमुख यांना कळताच त्यांना धक्काच बसला होता, असेही भगत यांनी सांगितले.खारभूमी नापीक जमिनीची आकडेवारी सरकारला मिळावी. यासाठी रायगडचे पालकमंत्री प्रकाश मेहता यांनी रायगडच्या जिल्हाधिकाऱ्यांना २०१६मध्ये आदेश दिले होते. त्यावर अद्यापही कार्यवाही झालेली नाही.सुपीक जमिनी नापीक करून त्या भांडवलदारांच्या घशात कशा घालता येतील. यासाठी खारलॅण्ड विभाग प्रयत्नशील असल्याचा आरोप श्रमिक मुक्ती दलाचे नंदन पाटील यांनी केला आहे.