शहरं
Join us  
Trending Stories
1
'मंत्री झाला म्हणजे जास्त कळते, असा गैरसमज करून घेऊ नये', जयंत पाटील मंत्री सावकारेंवर भडकले, 'हजामती' शब्दावरून चकमक
2
'ममता बॅनर्जींना अटक करा'; मेस्सी स्टेडिअम गोंधळावर आसामचे मुख्यमंत्री हिमंता सरमा यांची थेट मागणी
3
टेक इंडस्ट्री हादरली! AI मुळे २०२५ मध्ये १.२० लाख नोकऱ्या संपुष्टात; कर्मचारी कपातीत कोणती कंपनी पुढे?
4
डाव्यांच्या गडाला हादरे! माजी आयपीएस आर. श्रीलेखा तिरुवनंतपुरमच्या महापौर होण्याची शक्यता, केरळमध्ये भाजपला मोठे यश  
5
इंडिगोचे संकट वाढले! ८२९ प्रवासी सामुहिक खटला दाखल करणार, एअरलाईन्सवर नामुष्की...
6
हवा बिघडली अन् वारे फिरले; धुराने कोंडला मुंबईकरांचा श्वास! धूळ, धुके, धुराच्या संयुक्त मिश्रणाने प्रदूषणात वाढ
7
'१९ डिसेंबरला देशात सर्वात मोठा राजकीय भूकंप होणार, भारताचा पंतप्रधान मराठी माणूस बनणार', पृथ्वीराज चव्हाणांचे भाकीत!
8
जॉन सीनाने शेवटचा सामना 'मुद्दाम' गमावला? गुंथरकडून पराभव, रिंगला किस करून घेतला WWE चा निरोप...
9
काँग्रेसचं पुनरागमन, भाजपाचा चंचुप्रवेश आणि डाव्यांना धक्का, केरळमधील राजकीय हवा बदलतेय?
10
'या' छोट्या देशाचा चीन-भारतासारख्या बलाढ्या देशांना धोबीपछाड! फंड उभारण्यात आशियात १ नंबरला
11
सुदानमध्ये संयुक्त राष्ट्राच्या तळावर क्रूर ड्रोन हल्ला; ६ बांगलादेशी पीसकीपर्स ठार, ८ गंभीर जखमी; युनो महासचिवकडून तीव्र निषेध
12
जॅकपॉट अन् खजिना...! महाराष्ट्राच्या शेजारील राज्यात सापडले सोने, लिथिअम आयनचे साठे; खोऱ्याने पैसा ओढणार...
13
तारीख ठरली, वेळ बदलली? 'या' दिवशी सुरु होणार 'बिग बॉस मराठी ६'; पाहा प्रोमो
14
चोरी केल्यानंतर ते शिर्डी गाठायचे, साईबाबांच्या चरणी 'दान' ठेवायचे! काळाचौकी पोलिसांची २४ तासांत कारवाई; दोन तरुण चोर जेरबंद
15
खोकला, घशात खवखव; मुंबईकरांचे आरोग्य बिघडले; वातावरणातील बदलामुळे रुग्ण संख्येत मोठी वाढ
16
गायत्री दातारच्या आयुष्यात हिरोची एन्ट्री! अभिनेत्रीने गुपचूप केला साखरपुडा, फोटो समोर
17
वर्सोवा-भाईंदर कोस्टल प्रकल्पासाठी ४५ हजार खारफुटी तोडणार; हायकोर्टाचा हिरवा झेंडा
18
अमेरिकेतील ब्राउन युनिव्हर्सिटीत अंतिम परीक्षांदरम्यान गोळीबार; २ मृत, ८ गंभीर जखमी, हल्लेखोर पसार
19
पतीकडूनच सर्पदंश करवून पत्नीची हत्या, ब्रेन हॅमरेजने मृत्यू झाल्याचा बनाव; तिघांना अटक
20
मुंबईच्या फनेल झोनमधील इमारतींच्या पुनर्विकासासाठी 'हाउसिंग फॉर ऑल' योजना
Daily Top 2Weekly Top 5

चार जिल्ह्यांतील ६४ खासगी खारभूमी योजनांचे नूतनीकरण, भातशेती बहरण्याचे संकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2017 07:00 IST

ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या चार जिल्ह्यांतील एकूण ६४ खासगी खारभूमी योजनांची संपूर्ण नूतनीकरणाची कामे हाती घेऊ न एकूण ६ हजार ३३५ हेक्टर क्षेत्र पुन:प्रापित करण्याचे नियोजन राज्य शासनाच्या खारलॅण्ड विभागाच्या माध्यमातून करण्यात आले

- जयंत धुळपअलिबाग : ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या चार जिल्ह्यांतील एकूण ६४ खासगी खारभूमी योजनांची संपूर्ण नूतनीकरणाची कामे हाती घेऊ न एकूण ६ हजार ३३५ हेक्टर क्षेत्र पुन:प्रापित करण्याचे नियोजन राज्य शासनाच्या खारलॅण्ड विभागाच्या माध्यमातून करण्यात आले आहे. परिणामी कोकणात पुन्हा एकदा भातशेती बहरून येण्याचे संकेत प्राप्त झाले आहेत.खारभूमी योजनांचा इतिहास हा फार जुना आहे. पूर्वी समुद्रग्रस्त जमिनीच्या संरक्षणासाठी बांधण्यात आलेल्या बांधांची व उघाड्यांची देखभाल त्यावेळचे शेतकरी स्वखर्चाने करीत होते. १९४८ साली त्यावेळच्या मुंबई राज्याच्या शासनाने ‘मुंबई खारभूमी अधिनियम १९४८’ हा अधिनियम संमत करून त्या भूमीला व त्यावर अवलंबून असलेल्या सामान्य जनतेला मोठा दिलासा दिला. या अधिनियमाने शासनांतर्गत भूभागाच्या संरक्षणास बांधाची जबाबदारी शासनाने अंशत: उचलण्याचे मान्य करून अस्तित्वात असलेल्या तसेच नवीन करण्यात येणाºया खारभूमी बांध बांधण्यासाठी येणाºया खर्चात भागीदार होण्याचे स्वीकारले. तसेच या खारभूमी बंधारा संरक्षक बांधांची संरक्षण व्यवस्था ही या अधिनियमाने नियमित केली. यासाठी स्वतंत्र खारभूमी बोर्डामार्फत व्यवस्थापन पहाण्यात येवू लागली. यामध्ये ‘५० टक्के शासन व ५० टक्के लोकवर्गणी’ असा खर्च करण्यात येवूलागला.जे लाभधारक शेतकरी ‘५० टक्के शासन व ५० टक्के लोकवर्गणी’ या योजनेमध्ये सामील झाले व त्यांनी खारभूमी बंधाºयाच्या संरक्षणासाठी येणाºया खर्चाची ५० टक्के रक्कम भरली अशा योजनांच्या खारभूमी योजनांची कामे तत्कालीन खारलॅण्ड बोर्डाने केली. जे शेतकरी व लाभधारक लोकवर्गणीद्वारे खारभूमी काम करण्यास तयार झाले नाहीत, त्या शेतकºयांनी बांधलेल्या योजनांना खासगी खारभूमी योजना संबोधण्यात येते.अशा ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या चार जिल्ह्यांत एकूण ६४ खासगी खारभूमी योजनांची संपूर्ण नूतनीकरणाची कामे हाती घेऊ न एकूण ६ हजार ३३५ हेक्टर क्षेत्र पुन:प्रापित करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.रोहयोजनेतून खासगी योजनांच्या दुरुस्तीचा प्रस्ताव१खासगी योजनेच्या दुरुस्तीचा खर्च लाभधारक शेतकरी स्वत: करीत होते. खासगी योजनांची ही कामे शासनामार्फत व्हावी अशी मागणी लाभधारक शेतकºयांची आहे. खासगी योजनांच्या नादुरुस्त बांधामधून खारे पाणी शिरून ते लगतच्या शासकीय खारभूमी योजनेत घुसून शासकीय खारभूमी योजनांच्या पिकाखाली असलेल्या क्षेत्राला धोका पोहचत आहे.२काही अंशी शासकीय खारभूमी योजनांच्या बांधांना खांडी पडून (बांध फुटून) त्यामुळे शासकीय खारभूमी योजनांच्या देखभाल दुरूस्ती खर्चात वाढ होत आहे. शासन पत्रान्वये शासनाने खाजगी खारभूमी योजना शासनाने ताब्यात घेवू नये तथापि खासगी खारभूमी योजनांची दुरुस्तीची कामे रोजगार हमी योजनेअंतर्गत जिल्हाधिकाºयांची मंजुरी प्राप्त करून घेवून करण्यास हरकत नाही, असा निर्णय शासनाने घेतला होता, परंतु त्याचा फायदा होवू शकला नाही. परिणामी खासगी खारभूमी योजना शासनाच्या ताब्यात घेण्याचा विचार श्रमिक मुक्ती दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ.भारत पाटणकर यांनी शासनापुढे मांडला.

टॅग्स :FarmerशेतकरीRaigadरायगड