शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

रिफायनरी प्रकल्प रायगड जिल्ह्यात येणारच नाही; प्रकल्पाबाबत चर्चांना उधाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2019 23:51 IST

रत्नागिरीत समर्थनार्थ मोर्चा 

मुरुड/अलिबाग : बहुचर्चित रिफायनरी प्रकल्पासाठी रत्नागिरीतील काही संघटनांनी मोर्चा काढून समर्थन दर्शवल्याने आता हा प्रकल्प रायगडमध्ये येणार नाही, हे जवळपास निश्चित झाले आहे. हा प्रकल्प रायगडमध्ये होणार या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी काही दिवसांपूर्वी विधानसभेत माहिती दिली होती; परंतु हा प्रकल्प नेमका होणार कुठे, याबाबत अजूनही संभ्रम कायम आहे.

प्रकल्पासाठी रायगड जिल्ह्यातील अलिबाग, मुरुड, रोहा, श्रीवर्धन येथील जमीन संपादित करण्याबाबतही परिसरात चर्चा होती. रायगड जिल्ह्यात प्रकल्प आल्यास रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. तसेच पडीक जमिनीला चांगला भाव मिळेल, अशी अशा अनेक जण बाळगून होते.

सध्या रायगड जिल्ह्यात शेकडो एकर जमीन ओसाड आहे. या ठिकाणी शेती करणे परवडत नाही. खार जमिनीमध्ये मेहनत करूनही पीक मिळेलच याची शाश्वती नाही. रोजगाराची साधने कमी आहेत, ज्यांची शेती आहे त्यांना धड उत्पन्न मिळत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचा या प्रकल्पास फारसा विरोध नाही. मात्र, जे लोकप्रतिनिधी शेतकऱ्यांच्या जीवावर निवडून येतात, कोट्यवधींची मालमत्ता जमवतात, त्यांच्याकडून प्रकल्पास विरोध होत आहे. अशा नेते मंडळींपासून दूर राहून प्रकल्पांना प्रोत्साहन द्यावे आणि जिल्ह्याच्या औद्योगिकरणात सहभागी व्हावे, असा एक सूर जिल्ह्यात उमटू लागला आहे.

प्रकल्पासाठी ज्यांच्या जमीन संपादिक करण्यात येणार आहेत, त्यांना किंवा त्यांच्या मुलांना प्रामुख्याने नोकरीत सामावून घ्यावे, जमिनीला योग्य भाव मिळावा, नोकरीत स्थानिकांना प्राधान्य मिळावे, अशी अपेक्षा स्थानिकांकडून व्यक्त करण्यात येत आहेत.सुरुवातीला कोकणातील रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ग्रामस्थांनी या प्रकल्पास विरोध दर्शवला होता. त्यामुळे येथील भूसंपादन प्रक्रियाही थांबविण्यात आली होती. मात्र, शनिवारी रत्नागिरीत प्रकल्पाच्या समर्थनार्थ मोर्चा काढण्यात आला. हा प्रकल्प कोकणात झाल्यास, या ठिकाणी परप्रांतीयांची संख्या वाढेल आणि कोकणी माणूस दुय्यम स्थानावर जाईल. रासायनिक झोन तयार झाल्यास, समुद्रकिनारे आपली नैसर्गिक सौंदर्य, विविधता गमावतील. जवळपास १६ गावातील बागायती, घरे, मंदिरे, झरे, ओढे, तलाव भुईसपाट होतील. बागायतींवर वाईट परिणाम होतील. आंबा-काजू-कोकम, माड आदी उत्पन्नाची साधने नष्ट होतील, शिवाय जल, वायुप्रदूषणाच्या समस्याही वाढण्याची शक्यता आहे. इतकेच नव्हे तर जैवविविधता नष्ट होईल. मच्छीमार समाज देशोधडीला लागेल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. एकूणच निसर्गसौंदर्याने नटलेले कोकण आपली ओळखच गमावून बसेल.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रिफायनरी प्रकल्प रायगडमध्ये होणार असे सांगितले, तेव्हा जिल्ह्यातील एकही आमदाराने, वा विरोधकांनी याबाबत शब्दही काढला नाही. त्यामुळे प्रकल्प फायद्याचा की तोट्याचा, याबाबत संभ्रम आहे.

रायगडच्या विकासासाठी प्रकल्प झालाच पाहिजे. प्रकल्पामुळे येथील बेरोजगारी कमी होऊन तरुणांच्या हाताला काम मिळेल; परंतु पर्यावरणाचे निकष पायदळी न तुडवता आणि जमिनीला योग्य दर दिला पाहिजे, तरच प्रकल्पाला पाठिंबा आहे. - सुरेश मगर, माजी तालुका अध्यक्ष, काँग्रेस

नाणारवासीयांना प्रकल्प नको आहे, सरकारने अधिसूचनाही रद्द केली आहे, रायगडात प्रकल्प झाला तर त्याचे स्वागतच आहे. मात्र, शेतकºयांना योग्य मोबदला दिला पाहिजे, प्रदूषणच्या बाबतीत सतर्क राहिले पाहिजे. - राजेंद्र जाधव, सामाजिक कार्यकर्ते

शेतकºयांच्या जमिनीला योग्य भाव आणि तरुणांना काम दिले पाहिजे. सतत प्रकल्पाला विरोध करून रायगडच्या जनतेचा विकास रखडला आहे. प्रदूषण करणारे प्रकल्प नकोत, प्रकल्प आल्याने आर्थिक स्थैर्य लाभेल. - नितीन परब, माजी शिक्षण सभापती, रोहा

विकासासाठी प्रकल्प आवश्यक आहे; परंतु रायगडकरांचा विकास शाश्वत असला पाहिजे, त्यांच्या जमिनीला चांगला दर, त्यांचे योग्य पुनर्वसन झाले पाहिजे, त्यांना प्रकल्पामध्ये नोकरी मिळाली पाहिजे, त्यासाठी त्यांना प्रशिक्षण दिले पाहिजे, राजकारण्यांचा विकास न होता जनतेचा विकास झाला पाहिजे, म्हणून प्रकल्प व्हावा. - डॉ. सचिन पाटील, अलिबाग, मल्याण

टॅग्स :Raigadरायगड