शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

कंटेनरमध्ये कोट्यवधींचे सोने, न्हावाशेवा सीमाशुल्क विभागाची जप्तीची कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2017 07:04 IST

जेएनपीटी बंदरात परदेशातून एसी घेऊन आलेल्या कंटेनरमधून १५ किलो सोने जप्त करण्यात आले. त्याची किंमत पाच कोटींच्या आसपास आहे. न्हावाशेवा कस्टम विभागाने ही कारवाई केली.

उरण : जेएनपीटी बंदरात परदेशातून एसी घेऊन आलेल्या कंटेनरमधून १५ किलो सोने जप्त करण्यात आले. त्याची किंमत पाच कोटींच्या आसपास आहे. न्हावाशेवा कस्टम विभागाने ही कारवाई केली. या प्रकाराने पुन्हा एकदा उरणचे जेएनपीटी बंदर तस्करांसाठीचा अड्डा ठरत असल्याची बाब अधोरेखित झाली आहे.हा कंटेनर नवघर गावाजवळ जीडीएल नावाच्या गोदामात तपासला असता, त्यात एसीच्या बॉक्समध्ये सोने लपविले असल्याचे समोर आले. ही कारवाई करीत असताना गोदामातील सर्व कामगारांना येण्यास मज्जाव केला होता. तर गोदामाच्या गेटवरून पत्रकारांनाही गोदामात जाण्यापासून रोखण्यात आले होते. मात्र, कामगारांकडून मिळालेल्या माहितीनुसार रिफर कंटेनरमध्ये असलेल्या खोक्यामध्ये हा माल मिळाला असल्याची माहिती मिळाली.उरण जेएनपीटी बंदर हे सातत्याने तस्करी प्रकरणांमुळे गाजत आले आहे. यापूर्वी या बंदरातून दुबईला जाणाºया कंटेनरमध्ये रक्तचंदन असल्याचे समोर आले आहे.कोप्रोलीच्या एका गोदामात ग्रीसमध्ये रिव्हॉल्व्हर आणण्यात आले होते. तर मध्यंतरी एका गोदामात लाकडी फर्निचरमध्ये नशेची पावडरही पकडण्यात आली होती. या सर्व पार्श्वभूमीवर बंदरातील स्कॅनिंग मशिनची संख्या वाढविण्याची मागणी सातत्याने होत आहे.१५ किलो सोनेयाबाबत न्हावाशेवा सीमाशुल्क अधिकाºयांकडून सांगण्यात आले की, १५ किलो सोने सापडले आहे. याबाबत अद्याप कुणालाही अटक करण्यात आलेली नाही. मात्र, या प्रकरणी सखोलचौकशी सुरू करण्यात आली आहे. याची किंमत पाच कोटींच्या आसपास आहे.जीडीएल नावाच्या गोदामात सिंगापूरमधून एसी घेऊन आलेल्या या कंटेनरमध्ये लपवून आणलेले १५ किलो सोने हस्तगत करण्यात आले.

टॅग्स :Crimeगुन्हा