शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
2
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
3
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
4
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
5
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
6
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
7
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
8
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
9
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
10
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
11
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
12
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
13
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
14
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!
15
निवडणुका जवळ आल्यावर आमच्यावर आरोप होतात; आता आमची बदनामी झाली, अजित पवारांची खंत
16
Digital Gold SEBI: डिजिटल गोल्ड खरेदी असाल, तर थांबा! ऑनलाईन सोने खरेदी करणाऱ्यांना सेबीचा सावधगिरीचा इशारा
17
शशी थरूर यांनी अडवाणींचे कौतुक केले, नेहरू आणि इंदिरा गांधींबद्दल धक्कादायक विधान केले
18
FD सुरक्षित, पण श्रीमंत होण्यासाठी पुरेश नाही! जास्त परतावा हवा असल्यास 'हे' ५ पर्याय बेस्ट
19
...अन् ड्रग माफियाच्या घरात पैसे मोजायला बसले पोलिसवाले; सगळ्या १०, २०, ५० च्याच नोटा, २२ तास लागले
20
Video: 6,6,6,6,6,6,6...भारतीय क्रिकेटरनं रचला नवा इतिहास; अवघ्या ११ चेंडूत सर्वात जलद अर्धशतक

खंडित वीजपुरवठ्यामुळे हाल; धाटाव एमआयडीसीतील उद्योगांवरही परिणाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2018 03:51 IST

औद्योगिक वसाहत असलेल्या धाटावमधील ग्रामीण भागात वारंवार वीजपुरवठा खंडित होत आहे. त्यामुळे परिसरातील रहिवाशांमधून संताप व्यक्त होत आहे.

धाटाव : औद्योगिक वसाहत असलेल्या धाटावमधील ग्रामीण भागात वारंवार वीजपुरवठा खंडित होत आहे. त्यामुळे परिसरातील रहिवाशांमधून संताप व्यक्त होत आहे.शाळा सुरू होऊन जवळपास महिना-दीड महिना झाला आहे. या काळात दररोज सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत वीजपुरवठा खंडित असल्याने विद्यार्थी, तसेच पालक त्रस्त आहेत. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे, तसेच कामगार वर्गाबरोबर लहान-मोठ्या व्यावसायिकांनाही खंडित वीजपुरवठ्यामुळे अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे.रोह्यात धाटाव विभागातील किल्ला, वाशी, लांढर, बोरघर, तळाघर, रोठखुर्द, उडदवणे, मालसई यासारख्या ग्रामीण भागात वारंवार तर काही ठिकाणी तब्बल चार ते पाच तास वीज गायब होत आहे. याबाबत वीज वितरणकडे विचारणा केली असता, कोणतेही ठोस कारण दिले जात नाही. केवळ उडवाउडवीची उत्तरे दिली जात असल्याचे परिसरातील नागरिकांचे म्हणणे आहे.या गंभीर समस्येबाबत धाटाव येथील सहायक अभियंता कार्यालय तर रोहा कार्यकारी अभियंता घायतडक यांना ग्रामस्थांच्या वतीने वीजपुरवठा सुरळीत व्हावा याबाबत निवेदन देण्यात आले.महिनाभरात वीजपुरवठा खंडित होण्याबरोबरच विजेचा दाब कमी जास्त होत असल्याने इलेक्ट्रिक, इलेक्ट्रॉनिक उपकरणे नादुरु स्त होणे, सहायक अभियंता धाटाव कार्यालयातील दूरध्वनी जाणीवपूर्वक बंद ठेवणे, गंजलेले पोल बदलणे, वीज बिल अंतिम दिनांकापूर्वी देणे, वायरमनच्या दैनंदिन ड्युटीबाबतीत शेड्युल पत्रक लावणे, धाटाव येथे सहायक अभियंता पद रिक्त असल्याच्याही तक्र ारी या वेळी मांडण्यात आल्या.तालुक्यात चार सहायक अभियंता पद रिक्त असल्याने उर्वरित अभियंत्यांना अतिरिक्त चार्ज देण्यात आले आहे. रिक्त पदे भरण्यासाठी वरिष्ठांना विनंती केली असल्याचे या वेळी सांगण्यात आले. शासनाच्या दीनदयाळ योजनेअंतर्गत पोल बदलणे व वाढीव पोल मागणी प्रस्तावित आहे. मात्र, कंत्राटदार नेमूनही काम होत नसल्याचे लक्षात आल्यावर आठवडाभरात उपविभागीय अभियंता वानखेडे यांच्यामार्फत सर्व्हे करून अत्यावश्यक पोल तातडीने बदलण्यात येतील, असे सांगण्यात आले. याशिवाय एकच तक्र ार दूरध्वनी क्र मांक उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.चौकमधील विजेचा लपंडाव न थांबविल्यास आंदोलनवावोशी : चौक गावात अनेक दिवसांपासून वीजपुरवठा खंडित होण्याच्या प्रमाणात वाढ झाल्याने नागरिक त्रस्त आहेत. वितरण विभागाने विजेचा खेळखंडोबा त्वरित न थांबवल्यास आंदोलन करण्यात येईल, असा इशारा चौक गावचे माजी उपसरपंच गणेश कदम यांनी दिला आहे. मुंबई-पुणे महामार्गावर असलेल्या चौक गावात अनेक दिवस विजेचा लपंडाव सुरू आहे. रात्री-अपरात्री वीजपुरवठा बंद होत असल्याने गावात चोरीच्या घटनांमध्येही वाढ झाली आहे. वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याने छोट्या-मोठ्या उद्योगांवरही परिणाम होऊ लागला असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

टॅग्स :Raigadरायगड