शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
3
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
4
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
5
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
6
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
7
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
8
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
9
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
10
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
11
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
12
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
13
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
14
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
15
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
16
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
17
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
18
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
19
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
20
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या

रश्मी ठाकरेंनी घेतलेल्या कोर्लई जागेत बंगला घोटाळा, सीओंनी मान्य केल्याचा सोमय्यांचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2022 14:01 IST

फसवणूक करणाऱ्यावर तक्रार करणार

राजेश भोस्तेकर

रायगड/अलिबाग : मुरुड तालुक्यातील कोर्लई गावात माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांनी घेतलेल्या जागेवर १९ बंगले होते आणि त्यामध्ये घोटाळा झाला असल्याचे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी मान्य केले आहे, असे भाजप नेते किरीट सोमय्या यांनी म्हटले. मात्र, कोर्लई ग्रामपंचायत ग्रामसेवक यांनी दिलेल्या अहवालानुसार सोमय्या म्हणत असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ किरण पाटील यांनी स्पष्ट केले. या प्रकरणाबाबत अद्याप अहवाल शासनाकडे पाठवला नसल्याचेही पाटील यांनी म्हटले आहे. तर बंगले बाबत कागदोपत्री बदल केल्याबाबत फसवणुकीचा गुन्हा दाखल करावा असे किरीट सोमय्या यांनी म्हटले आहे. घोटाळ्याबाबत शासन, जिल्हा परिषद, ग्राम विकास विभाग की मी गुन्हा दखल करावा याबाबत दोन दिवसात ठरवू असेही सोमय्या यांनी म्हटले आहे. 

कोर्लई गावात रश्मी ठाकरे आणि मनीषा वायकर यांच्या नावे मालमत्ता आहे. या मालमत्तेत घोटाळा झाला असल्याचे भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आरोप केला आहे. याबाबत सोमवारी १२ डिसेंबर रोजी किरीट सोमय्या यांनी अलिबाग येथे रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ किरण पाटील यांची भेट घेतली. दोघांच्यात अर्धा तास चर्चा झाली. त्यानंतर किरीट सोमय्या यांनी माध्यमांशी संवाद साधून प्रतिक्रिया दिली. 

रश्मी ठाकरे यांनी अन्वय नाईक यांच्याकडून कोर्लई येथे मालमत्ता घेतली आहे. या मालमत्तेत नाईक यांनी बंगले बांधले होते. असा आरोप सोमय्या यांनी केला आहे. या बंगल्याचे असेसमेंट ही बनविण्यात आले असून कर ग्रामपंचायतीला भरत होते. त्यानंतर नाईक यांनी ही जागा रश्मी ठाकरे आणि मनीषा वायकर यांना विकली होती. त्यावेळी जागेत १९ बंगले असल्याचा उल्लेख होता. या बंगल्याचा करही ठाकरे यांनी भरलेले आहे. मात्र त्यानंतर हे बंगले नसल्याचा अहवाल ग्रामपंचायतीने दिला आहे. त्यामुळे बंगल्यात घोटाळा झाल्याचा आरोप सोमय्या यांनी केला आहे. 

सोमवारी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ किरण पाटील यांची भेट घेऊन या प्रकरणाबाबत चर्चा केली. या बंगल्याबाबत घोटाळा झाला असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी मान्य केले आहे. तर उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदी असताना दबाव आणून बंगले उडविले असल्याने त्यांनी फसवणूक केली आहे. फसवणूक करणाऱ्या विरोधात पोलीस तक्रार दाखल करावी. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे याच्यासोबत चर्चा झाली असून त्याच्याकडे अहवाल आला आहे. याबाबत शिंदे फडणवीस सरकारने निर्णय घ्यायचा आहे. ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनाही भेटणार आहे. या घोटाळा बाबत शासन, जिल्हा परिषद, ग्रामविकास की मी तक्रार दाखल करावी याबाबत दोन दिवसात निर्णय घेणार असल्याचे किरीट सोमय्या यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 

टॅग्स :Kirit Somaiyaकिरीट सोमय्याRaigadरायगडalibaugअलिबाग