शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
3
SL vs BAN : काटावर पास झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
4
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
5
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
6
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
7
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
8
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
9
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
10
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
11
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
12
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
13
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
14
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
15
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
16
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
17
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
18
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
19
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
20
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...

रश्मी ठाकरेंनी घेतलेल्या कोर्लई जागेत बंगला घोटाळा, सीओंनी मान्य केल्याचा सोमय्यांचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2022 14:01 IST

फसवणूक करणाऱ्यावर तक्रार करणार

राजेश भोस्तेकर

रायगड/अलिबाग : मुरुड तालुक्यातील कोर्लई गावात माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांनी घेतलेल्या जागेवर १९ बंगले होते आणि त्यामध्ये घोटाळा झाला असल्याचे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी मान्य केले आहे, असे भाजप नेते किरीट सोमय्या यांनी म्हटले. मात्र, कोर्लई ग्रामपंचायत ग्रामसेवक यांनी दिलेल्या अहवालानुसार सोमय्या म्हणत असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ किरण पाटील यांनी स्पष्ट केले. या प्रकरणाबाबत अद्याप अहवाल शासनाकडे पाठवला नसल्याचेही पाटील यांनी म्हटले आहे. तर बंगले बाबत कागदोपत्री बदल केल्याबाबत फसवणुकीचा गुन्हा दाखल करावा असे किरीट सोमय्या यांनी म्हटले आहे. घोटाळ्याबाबत शासन, जिल्हा परिषद, ग्राम विकास विभाग की मी गुन्हा दखल करावा याबाबत दोन दिवसात ठरवू असेही सोमय्या यांनी म्हटले आहे. 

कोर्लई गावात रश्मी ठाकरे आणि मनीषा वायकर यांच्या नावे मालमत्ता आहे. या मालमत्तेत घोटाळा झाला असल्याचे भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आरोप केला आहे. याबाबत सोमवारी १२ डिसेंबर रोजी किरीट सोमय्या यांनी अलिबाग येथे रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ किरण पाटील यांची भेट घेतली. दोघांच्यात अर्धा तास चर्चा झाली. त्यानंतर किरीट सोमय्या यांनी माध्यमांशी संवाद साधून प्रतिक्रिया दिली. 

रश्मी ठाकरे यांनी अन्वय नाईक यांच्याकडून कोर्लई येथे मालमत्ता घेतली आहे. या मालमत्तेत नाईक यांनी बंगले बांधले होते. असा आरोप सोमय्या यांनी केला आहे. या बंगल्याचे असेसमेंट ही बनविण्यात आले असून कर ग्रामपंचायतीला भरत होते. त्यानंतर नाईक यांनी ही जागा रश्मी ठाकरे आणि मनीषा वायकर यांना विकली होती. त्यावेळी जागेत १९ बंगले असल्याचा उल्लेख होता. या बंगल्याचा करही ठाकरे यांनी भरलेले आहे. मात्र त्यानंतर हे बंगले नसल्याचा अहवाल ग्रामपंचायतीने दिला आहे. त्यामुळे बंगल्यात घोटाळा झाल्याचा आरोप सोमय्या यांनी केला आहे. 

सोमवारी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ किरण पाटील यांची भेट घेऊन या प्रकरणाबाबत चर्चा केली. या बंगल्याबाबत घोटाळा झाला असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी मान्य केले आहे. तर उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदी असताना दबाव आणून बंगले उडविले असल्याने त्यांनी फसवणूक केली आहे. फसवणूक करणाऱ्या विरोधात पोलीस तक्रार दाखल करावी. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे याच्यासोबत चर्चा झाली असून त्याच्याकडे अहवाल आला आहे. याबाबत शिंदे फडणवीस सरकारने निर्णय घ्यायचा आहे. ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनाही भेटणार आहे. या घोटाळा बाबत शासन, जिल्हा परिषद, ग्रामविकास की मी तक्रार दाखल करावी याबाबत दोन दिवसात निर्णय घेणार असल्याचे किरीट सोमय्या यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 

टॅग्स :Kirit Somaiyaकिरीट सोमय्याRaigadरायगडalibaugअलिबाग