शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

रानसईतील शिराळी, घोसाळी थेट मुंबईत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2018 04:29 IST

रानसईच्या डोंगरातील भाजीपाला आता थेट मुंबईकरांच्या स्वयंपाकघरात

उरण : तालुक्यातील रानसई, विंधणे, चिरनेर, दिघोडे, गावातील शेतकरी रानसई धरणाच्या कुशीत पिकवत असलेल्या शिराळी, दुधी, घोसाळी, पडवळ, काकडी, डेटी आदी चविष्ठ भाज्यांना गणेशोत्सवात मुंबईतून मोठ्या प्रमाणात मागणी आहे, त्यामुळे रानसईच्या डोंगरातील भाजीपाला आता थेट मुंबईकरांच्या स्वयंपाकघरात पोहोचू लागला आहे.उरण तालुक्यातील जनतेला पाणीपुरवठा करणारे रानसई धरण आहे. या परिसरातील पडीक जमिनीवर रानसई गावातील आदिवासी बांधवांनी, तसेच विंधणे, चिरनेर, दिघोडे गावातील शेतकऱ्यांनी गेली २५ वर्षे या पडीक जमिनीवर मशागत करण्यास सुरुवात केली. मेहनतीला तंत्रज्ञानाची जोड दिल्याने दिवसाला १० ते १५ हजार किलो भाजी येथील शेतकरी पिकवत आहेत. पिकवलेली भाजी चार-पाच कि.मी. अंतर पायी पार करून पनवेल, वाशी आणि मुंबईच्या बाजारात पोहोचवतात.रानसई धरणाच्या परिसरातील पडीक जमिनीकडे नजर टाकली, तर शिराळी, घोसाळी, कारली, दुधी, काकडी यांसारख्या इतर भाज्यांच्या रांगा तांबड्या मातीत फुललेल्या दिसतात. त्यात डेटी, भाज्या यांची रोपे डोलताना दिसतात. रानसई, विंधणे, चिरनेर येथील शेतकºयांच्या जमिनी शासनाने रानसई धराणाच्या उभारणीसाठी १९७० साली संपादित केल्या, त्यानंतर शेतकरी, प्रकल्पग्रस्त नागरिकांना रोजगार उपलब्ध करून दिला नाही, त्यामुळे कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी ते रानसईच्या पडीक जमिनीवर गेली २५ ते ३० वर्षे भाजीपाल्याचे, तसेच वाल, चवळी, पावटा, मूग या कडधान्यांचे उत्पन्न घेत आहेत.३० हजार किलो भाजीभाजीपाला चविष्ठ असल्याने मुंबईतून भाजीला मोठी मागणी असते. त्यामुळे शेतकरी २० ते ३० हजार किलो भाजी मार्केटमध्ये पाठवत असतात; परंतु पावसाच्या लहरीपणामुळे भाजीचे उत्पन्न काही वेळा घटत आहे. या भाजीच्या मळ्यांद्वारे ३० कुटुंबे आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत आहेत.शासनाने, कुषी विभागाने शेतकºयांना सहकार्य केले, तर अंगमेहनतीतून भाजीच्या उत्पन्नात निश्चित वाढ होईल, असा विश्वास या शेतकºयांनी व्यक्त केला आहे.

टॅग्स :vegetableभाज्याRaigadरायगड