शहरं
Join us  
Trending Stories
1
'...तर आम्ही शिंदेंच्या शिवसेनेसोबतची दोन जिल्ह्यात युती तोडू'; नारायण राणेंचा इशारा, तेलींबद्दल काय बोलले?
2
"आधी कर्जबाजारी व्हायचं आणि मग पुन्हा कर्जमाफी मागायची"; राधाकृष्ण विखे पाटलांची शेतकऱ्यांवर आगपाखड
3
"पंतप्रधान मोदींनीही घातली होती टोपी, मी फोटो पाठवेन", मुस्लीम तुष्टीकरणाच्या आरोपांवर काय म्हणाले रेवंत रेड्डी?
4
लय मोठा विषय चाललाय! चीन, पाकिस्तान अन् बांगलादेशला एकाचवेळी झटका; भारतीय सैन्य काय करतंय?
5
Rishabh Pant: टीम इंडियाचं टेन्शन वाढलं, ऋषभ पंत पुन्हा जखमी, अर्ध्यातच मैदान सोडलं!
6
बिहार निवडणुकीनंतर भाजपाला मिळणार नवा राष्ट्रीय अध्यक्ष? बड्या नेत्याने दिले सूचक संकेत
7
पार्थ अजित पवार जमीन प्रकरणात शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “समाजासमोर वास्तव...”
8
स्टंटबाजी करणाऱ्या टवाळखोरामुळं युवती जीवाला मुकली; ११० च्या स्पीडनं उडवलं, दात तुटले अन्...
9
उपाशी ठेवलं, बेदम मारलं... पोटच्या लेकाने, सुनेने जमिनीसाठी केले जन्मदात्या आईचे हालहाल
10
"वहिनी, तुमची जोडी जमत नाही, हे काका कोण?", रील्सचं वेड, सर्वस्व असलेल्या नवऱ्याच संपवलं
11
Viral Video: मिरची पूड घेऊन ज्वेलर्समध्ये शिरली, पण प्लॅन फसला! दुकानदारानं २० वेळा थोबाडलं
12
Operation Pimple : सैन्याला मोठं यश! कुपवाडामध्ये घुसखोरी करणाऱ्या २ दहशतवाद्यांचा खात्मा
13
शेजाऱ्याशी लफडं, गुपित पतीला कळलं; प्रियकरासोबत मिळून पत्नीने केली हत्या, मृतदेह नदीत फेकला
14
उद्धव ठाकरेंसमोर व्यथा मांडताना ९० वर्षीय शेतकऱ्याला रडू कोसळले; म्हणाले, “कर्जमाफी...”
15
IND vs AUS 5th T20I : तिलक वर्माला बसवलं बाकावर! टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये रिंकूची एन्ट्री
16
जरीन खान यांच्यावर हिंदू पद्धतीने झाले अंत्यसंस्कार, मुलगा झायेदने दिला अग्नी; कारण...
17
कतरिना कैफचे सासरे 'आजोबा' बनल्यानंतर झाले भावुक! 'ज्युनिअर कौशल'साठी शेअर केली प्रेमळ पोस्ट
18
"महाराष्ट्र लुटून खा... आम्ही...! मंत्री सरनाईकांनी २०० कोटींची जमीन ३ कोटीत घेतली", वडेट्टीवारांचा गंभीर आरोप
19
राहू-केतू गोचर २०२५: राहू केतू तसे तापदायकच, पण नोव्हेंबरमध्ये 'या' ८ राशींवर होणार मेहेरबान!
20
Railway: धावत्या ट्रेनला गरुडाची समोरून धडक, जखमी होऊनही लोको पायलटनं प्रसंगावधान दाखवलं, नाही तर...

रानसईतील शिराळी, घोसाळी थेट मुंबईत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2018 04:29 IST

रानसईच्या डोंगरातील भाजीपाला आता थेट मुंबईकरांच्या स्वयंपाकघरात

उरण : तालुक्यातील रानसई, विंधणे, चिरनेर, दिघोडे, गावातील शेतकरी रानसई धरणाच्या कुशीत पिकवत असलेल्या शिराळी, दुधी, घोसाळी, पडवळ, काकडी, डेटी आदी चविष्ठ भाज्यांना गणेशोत्सवात मुंबईतून मोठ्या प्रमाणात मागणी आहे, त्यामुळे रानसईच्या डोंगरातील भाजीपाला आता थेट मुंबईकरांच्या स्वयंपाकघरात पोहोचू लागला आहे.उरण तालुक्यातील जनतेला पाणीपुरवठा करणारे रानसई धरण आहे. या परिसरातील पडीक जमिनीवर रानसई गावातील आदिवासी बांधवांनी, तसेच विंधणे, चिरनेर, दिघोडे गावातील शेतकऱ्यांनी गेली २५ वर्षे या पडीक जमिनीवर मशागत करण्यास सुरुवात केली. मेहनतीला तंत्रज्ञानाची जोड दिल्याने दिवसाला १० ते १५ हजार किलो भाजी येथील शेतकरी पिकवत आहेत. पिकवलेली भाजी चार-पाच कि.मी. अंतर पायी पार करून पनवेल, वाशी आणि मुंबईच्या बाजारात पोहोचवतात.रानसई धरणाच्या परिसरातील पडीक जमिनीकडे नजर टाकली, तर शिराळी, घोसाळी, कारली, दुधी, काकडी यांसारख्या इतर भाज्यांच्या रांगा तांबड्या मातीत फुललेल्या दिसतात. त्यात डेटी, भाज्या यांची रोपे डोलताना दिसतात. रानसई, विंधणे, चिरनेर येथील शेतकºयांच्या जमिनी शासनाने रानसई धराणाच्या उभारणीसाठी १९७० साली संपादित केल्या, त्यानंतर शेतकरी, प्रकल्पग्रस्त नागरिकांना रोजगार उपलब्ध करून दिला नाही, त्यामुळे कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी ते रानसईच्या पडीक जमिनीवर गेली २५ ते ३० वर्षे भाजीपाल्याचे, तसेच वाल, चवळी, पावटा, मूग या कडधान्यांचे उत्पन्न घेत आहेत.३० हजार किलो भाजीभाजीपाला चविष्ठ असल्याने मुंबईतून भाजीला मोठी मागणी असते. त्यामुळे शेतकरी २० ते ३० हजार किलो भाजी मार्केटमध्ये पाठवत असतात; परंतु पावसाच्या लहरीपणामुळे भाजीचे उत्पन्न काही वेळा घटत आहे. या भाजीच्या मळ्यांद्वारे ३० कुटुंबे आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत आहेत.शासनाने, कुषी विभागाने शेतकºयांना सहकार्य केले, तर अंगमेहनतीतून भाजीच्या उत्पन्नात निश्चित वाढ होईल, असा विश्वास या शेतकºयांनी व्यक्त केला आहे.

टॅग्स :vegetableभाज्याRaigadरायगड