शहरं
Join us  
Trending Stories
1
अंकारा हादरलं! लिबियाच्या मिलिट्री चीफना घेऊन जाणारं विमान कोसळलं, एअरपोर्ट तडकाफडकी बंद
2
PPF Calculator: दर महिन्याला ₹२,०००, ₹३,००० आणि ₹५,००० गुंतवले तर मॅच्युरिटीवर किती रक्कम मिळेल; पैसेही राहतील सुरक्षित
3
कोडीन कफ सिरप तस्करीचा मास्टरमाइंड शुभम जायसवालवर ५० हजारांचं इनाम; आता संपत्तीवर चालणार बुलडोझर!
4
पाहुणी म्हणून आली, लाखोंचे दागिने घेऊन पसार झाली; बंगळुरुमध्ये महिलेला अटक
5
बांगलादेश भारताकडून ५०,००० टन तांदूळ खरेदी करणार; दोन्ही देशांचे संबंध सुधारण्यासाठी युनूस सरकारचे प्रयत्न
6
३० वर्षांचा संसार, क्षणाचा राग अन् होत्याचं नव्हतं झालं; संशयी पतीने पत्नीला क्रूरपणे संपवलं
7
मोठा गेम प्लॅन! भाजपने शिंदेसेनेचे ठाण्यामध्येच दाबले नाक; मुंबईत अधिक जागा मागू नये म्हणून...
8
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २४ डिसेंबर २०२५: धनलाभ होईल, नवे काम हाती घ्याल!
9
कोर्टात कराड प्रथमच बोलला; पण न्यायाधीशांनी थांबवले; संतोष देशमुख हत्या प्रकरणी दोषारोप निश्चित
10
संपादकीय: त्रिशंकूंची त्रेधातिरपीट! एचवन-बी व्हिसाधारक आज अक्षरशः लटकले आहेत...
11
महापालिका निवडणूक : मुंबईत भाऊबंध प्रयोगाचा आज आरंभ; पुण्यात पवार काका पुतण्यांचे मनाेमिलन होणार
12
बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी उद्धव ठाकरेंना काेर्टाचा दिलासा; मुलीनंतर पित्याची याचिका फेटाळली
13
बांधकाम मजुरांना किमान मास्क तरी द्या! तुम्हाला गरिबांची काळजी नाही; हायकोर्टाचे फटकारे   
14
पाच लाखांची लाच घेताना जीएसटी अधीक्षकाला अटक; अधिकाऱ्याकडे सापडले घबाड, सीबीआयची कारवाई
15
सरकारला मजुरांच्या घामाची किंमत आहे का? मनरेगा बदलण्यावर विस्तृत लेख...
16
प्रदूषणकारी मेट्रो-२ बीच्या आरएमसी प्लांटचे काम थांबवा; ‘एमएमआरडीए’च्या कंत्राटदाराला नोटीस 
17
निश्चित नसलेल्या जागी कुत्र्यांना अन्न देण्यापासून रोखणे गुन्हा ठरत नाही; मुंबई उच्च न्यायालयाने दिला महत्त्वपूर्ण निर्वाळा  
18
म्हाडा अधिकारी राजकीय दबावाला बळी का पडतात? पुनर्विकास थांबविल्याने उच्च न्यायालयाचा सवाल
19
गृहप्रकल्पात गोदरेजची ११० कोटींची फसवणूक; अहमदाबादच्या सिद्धी ग्रुपविरुद्ध गुन्हा दाखल 
20
जयंत नारळीकर यांना मरणोत्तर विज्ञान रत्न पुरस्कार; मराठी शास्त्रज्ञांचाही राष्ट्रपतींकडून गौरव
Daily Top 2Weekly Top 5

रानसईतील शिराळी, घोसाळी थेट मुंबईत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2018 04:29 IST

रानसईच्या डोंगरातील भाजीपाला आता थेट मुंबईकरांच्या स्वयंपाकघरात

उरण : तालुक्यातील रानसई, विंधणे, चिरनेर, दिघोडे, गावातील शेतकरी रानसई धरणाच्या कुशीत पिकवत असलेल्या शिराळी, दुधी, घोसाळी, पडवळ, काकडी, डेटी आदी चविष्ठ भाज्यांना गणेशोत्सवात मुंबईतून मोठ्या प्रमाणात मागणी आहे, त्यामुळे रानसईच्या डोंगरातील भाजीपाला आता थेट मुंबईकरांच्या स्वयंपाकघरात पोहोचू लागला आहे.उरण तालुक्यातील जनतेला पाणीपुरवठा करणारे रानसई धरण आहे. या परिसरातील पडीक जमिनीवर रानसई गावातील आदिवासी बांधवांनी, तसेच विंधणे, चिरनेर, दिघोडे गावातील शेतकऱ्यांनी गेली २५ वर्षे या पडीक जमिनीवर मशागत करण्यास सुरुवात केली. मेहनतीला तंत्रज्ञानाची जोड दिल्याने दिवसाला १० ते १५ हजार किलो भाजी येथील शेतकरी पिकवत आहेत. पिकवलेली भाजी चार-पाच कि.मी. अंतर पायी पार करून पनवेल, वाशी आणि मुंबईच्या बाजारात पोहोचवतात.रानसई धरणाच्या परिसरातील पडीक जमिनीकडे नजर टाकली, तर शिराळी, घोसाळी, कारली, दुधी, काकडी यांसारख्या इतर भाज्यांच्या रांगा तांबड्या मातीत फुललेल्या दिसतात. त्यात डेटी, भाज्या यांची रोपे डोलताना दिसतात. रानसई, विंधणे, चिरनेर येथील शेतकºयांच्या जमिनी शासनाने रानसई धराणाच्या उभारणीसाठी १९७० साली संपादित केल्या, त्यानंतर शेतकरी, प्रकल्पग्रस्त नागरिकांना रोजगार उपलब्ध करून दिला नाही, त्यामुळे कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी ते रानसईच्या पडीक जमिनीवर गेली २५ ते ३० वर्षे भाजीपाल्याचे, तसेच वाल, चवळी, पावटा, मूग या कडधान्यांचे उत्पन्न घेत आहेत.३० हजार किलो भाजीभाजीपाला चविष्ठ असल्याने मुंबईतून भाजीला मोठी मागणी असते. त्यामुळे शेतकरी २० ते ३० हजार किलो भाजी मार्केटमध्ये पाठवत असतात; परंतु पावसाच्या लहरीपणामुळे भाजीचे उत्पन्न काही वेळा घटत आहे. या भाजीच्या मळ्यांद्वारे ३० कुटुंबे आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत आहेत.शासनाने, कुषी विभागाने शेतकºयांना सहकार्य केले, तर अंगमेहनतीतून भाजीच्या उत्पन्नात निश्चित वाढ होईल, असा विश्वास या शेतकºयांनी व्यक्त केला आहे.

टॅग्स :vegetableभाज्याRaigadरायगड