शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
2
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
3
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
4
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
5
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
6
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
7
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
8
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
9
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
10
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."
11
नवरात्रीचा मुहूर्त? पंतप्रधान मोदी नव्या ठिकाणाहून कामकाज पाहणार; PMOचा पत्ता बदलणार
12
"भेटायला येतो असा मी मित्रासारखा हट्ट केला होता पण...", प्रियाच्या आठवणीत अभिजीत भावुक
13
Video - पैशांचा पाऊस! चालत्या ट्रेनमधून उडवल्या ५०० च्या नोटा; गोळा करण्यासाठी लोकांची झुंबड
14
बच्चू कडूंना कधीच सोडणार नाही म्हणणारे माजी आमदार सोडून गेले; काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश
15
सारख्या नावाचे दिवस गेले... सेम चेहराही शोधावा लागणार; यापुढे EVM वर उमेदवाराचा रंगीत फोटो छापणार...
16
प्रसिद्धीचा मुद्दा, अजितदादांचा फडणवीसांकडे रोख;  म्हणाले, “जाहिरात करावी तर देवाभाऊंसारखी”
17
समुद्रात दडलाय सोन्याचा खजिना; किंमत 2000 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त, काढणार कसा?
18
आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर प्राणघातक हल्ला: अनेक पोलिस एम्समध्ये दाखल
19
कार अन् ट्रकचा भीषण अपघात; एकाच कुटुंबातील सात जणांचा जागीच मृत्यू
20
ICC T20I Rankings : नंबर वन अभिषेक शर्मानं साधला मोठा डाव; कॅप्टन सूर्यासह तिलक वर्मा घाट्यात

उरणमधील रानसई धरणाची पाणी पातळी खालावली 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2021 00:43 IST

६४ दिवस पुरेल इतकेच पाणी

लोकमत न्यूज नेटवर्कउरण : उरण परिसराला पाणीपुरवठा करणाऱ्या रानसई धरणातील पाण्याची पातळी खालावली असून नागरिकांना फक्त पुढील  ६४ दिवस पुरेल इतकाच पाणीसाठा उपलब्ध आहे. त्यामुळे उरणकरांचा  पाणीपुरवठा या  आठवड्यापासून मंगळवार आणि शुक्रवार असा दोन दिवस बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे उरण विभागाचे प्रभारी उपअभियंता रणजित काळेबाग यांनी दिली.उरणकरांची तहान भागवण्यासाठी तालुक्यातील रानसई एकमेव धरण आहे. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या अखत्यारीत असलेल्या या रानसई धरणातूनच उरण तालुक्यातील ३७ ग्रामपंचायती, उरण नगर परिषद आणि परिसरातील काही औद्योगिक कंपन्यांना पाणीपुरवठा केला जातो. मात्र या वर्षी रानसई धरणात येत्या एप्रिल महिन्यापर्यंत नागरिकांना पुरेल इतकाच ६४ दिवसांचा पाणीसाठा उपलब्ध आहे. त्यातच  कडक उन्हाच्या तडाख्याने रानसई धरणातील पाण्याचे मोठ्या प्रमाणावर बाष्पीभवन होत आहे. त्यामुळे धरणातील पाण्याची  पातळी आणखीनच कमी होण्याची शक्यता आहे. त्याशिवाय मागील वर्षात पावसाचे प्रमाणही कमी आहे. त्यामुळेही उरणच्या पाणीपुरवठ्यावर विपरीत परिणाम झाला आहे. त्यामुळे पाणीटंचाईची झळ बसणार नाही याची धोरण उरण एमआयडीसीने स्वीकारले आहे. यासाठी खबरदारीची उपाययोजना म्हणून शहरी व ग्रामीण भागातील पाणीपुरवठा आठवड्यातून मंगळवारी आणि शुक्रवारी असा दोन दिवस बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती प्रभारी उपअभियंता रणजित काळेबाग यांनी दिली. 

हेटवणेतून घेतले जाते पाणी एमआयडीसीकडून दहा एमएलडी पाणीपुरवठा करण्याची मागणी केली जाते. मात्र सिडकोकडून पाच एमएलडी इतके मिळते. त्यामुळे पाणीटंचाईवर मात करण्यासाठी आणि उरणकरांना पावसाळ्यापर्यंत सुरळीत पाणीपुरवठा व्हावा यासाठी आठवड्यातून दोन दिवस पाणीपुरवठा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांनी पाणी वाया न घालवता जपून वापर करावा असे आवाहनही काळेबाग यांनी केले आहे.