शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Update : काळजी घ्या! बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा, आज मुसळधार; विदर्भ, मराठवाड्यासह या भागात बरसणार
2
स्वामी चैतन्यानंद फसवणुकीतही माहिर! लोकांवर प्रभाव पाडण्यासाठी बनावट UN-BRICS कार्ड; धक्कादायक माहिती उघड
3
Tamilnadu Stampede : "अभिनेत्याला यायला उशीर, पाण्याची कमतरता आणि..."; चेंगराचेंगरीबद्दल काय म्हणाले पोलीस?
4
IND vs PAK Final, Asia Cup 2025: फायनलमध्ये पाकिस्तानविरोधात भारताचा रेकॉर्ड फारसा चांगला नाही; आजपर्यंत १० वेळा भिडला, पण...
5
'पीएम किसान'चा २१ वा हप्ता जाहीर! ३ राज्यांतील शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना कधी?
6
IND vs PAK Final, Asia Cup 2025: भारत-पाक अंतिम सामना: सूर्यकुमार पाकिस्तानी मंत्री मोहसिन नकवी यांच्या हस्ते ट्रॉफी स्वीकारणार?
7
Video - तामिळनाडूतील चेंगराचेंगरीत मृत्युमुखी पडलेल्यांचे मृतदेह पाहून शिक्षणमंत्री ढसाढसा रडले
8
LPG ते पेन्शन, UPI पासून रेल्वे तिकीटापर्यंत... १ ऑक्टोबरपासून 'हे' ५ नियम बदलणार
9
आधी मसाज करायला आले अन्..; हायकोर्टाच्या वकिलाकडून ब्लॅकमेलिंगद्वारे पैसे उकळले!
10
IND vs PAK Final, Asia Cup 2025 Marathi : आज 'ऑपरेशन पाकिस्तान'! फायनलमध्ये भारतीय संघात दोन मोठे बदल होणार; अशी असेल प्लेइंग 11 
11
वाट चुकलेले दुचाकीस्वार थेट बेलापूर खाडीत; दोन महिन्यांतील दुसरी घटना; एक जण गेला वाहून
12
लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी स्वामी चैतन्यानंद यांना अटक; पोलिसांनी आग्र्यातून ताब्यात घेतले
13
केंद्रीय गृह मंत्रालयाने तामिळनाडूतील चेंगराचेंगरीचा अहवाल मागितला; अभिनेता विजयचीही चौकशी होणार
14
BSNL 4G स्पीड टेस्ट 2025: किती मिळतोय स्पीड? MBPS चा आकडा पहाल तर, म्हणाल...
15
"एकेकाळी कौतुक करणारे लोक आज...", सलमान खानचा अप्रत्यक्षपणे अभिनव कश्यपवर निशाणा
16
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
17
स्वतःच्या पायावर धोंडा, अमेरिकेच्या व्हिसा धोरणावरून भयकंप; पुढे काय अन् निर्णयामागे काय? जाणून घ्या
18
भारत विरुद्ध इंडिया; शहरी-ग्रामीण विषमतेचा अर्थ आणि परिणाम काय?
19
मी २०२९ सालापर्यंत महाराष्ट्रातच राहणार; दिल्लीला जाण्याची शक्यता फडणवीस यांनी फेटाळली!
20
कामाचा जास्त ताण घेता? हेल्थ कोण सांभाळणार? आतापासूनच घ्या 'या' गोष्टींची काळजी

पितळवाडी आरोग्य केंद्र रामभरोसे; निवासस्थानात मोकाट जनावरांचा वावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2019 00:30 IST

दोन्ही वैद्यकीय अधिकारी पदे रिक्त 

प्रकाश कदमपोलादपूर : दुर्गम तालुका म्हणून ओळखला जाणाऱ्या पोलादपूर तालुक्यात आरोग्याबाबत अनेक समस्या भेडसावत आहेत. उपचाराबाबत शासन दरबारी कमालीची अनास्था असल्याने ग्रामीण भागातील गरीब नागरिकांना आर्थिक झळ सोसावी लागत आहे. तालुक्यात तीन प्राथमिक आरोग्य केंद्र व आठ उपकेंद्र आणि एक ग्रामीण रुग्णालय आहे, मात्र पदे रिक्त असून सुविधांची वानवा आहे. यामुळे रु ग्णांना याचा त्रास सहन करावा लागत आहे.

पितळवाडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे काम २०-२५ वर्षांपूर्वी बांधलेल्या छोट्या इमारतीमध्ये सुरू आहे. आजूबाजूच्या ४२ गावांतील २२ हजार रुग्ण येथे उपचारासाठी येतात. या प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत तीन उपकेंद्रे आहेत. वाढणाºया रुग्णांना ही इमारत कमी पडत आहे. आवश्यक औषधे रुग्णांना मिळत आहेत, मात्र काही औषध बाहेरून खरेदी करावी लागतात असे रुग्ण सांगतात. रुग्णांकरिता एक रुग्णवाहिका येथे उपलब्ध आहे. येथे दोन वैद्यकीय अधिकारी पदे आहेत.मात्र सध्या या दोन्ही जागा रिक्त आहेत. सध्या विन्हेरे आरोग्य केंद्रातील डॉ. घोडके हे तात्पुरत्या स्वरूपात येथे कार्यरत आहेत. येथे कोणतेही वैद्यकीय अधिकारी निवासी नसल्याने त्यांच्या निवासस्थानात मोकाट जनावरांचा मुक्त वावर आहे, तर शौचालयाची दुरवस्था झाली आहे. दवाखान्यातील कर्मचारी येथे कोणतीही स्वच्छता ठेवत नाहीत. आगामी काळात जर येथे वैद्यकीय अधिकारी कायमस्वरूपी मिळाले नाही तर रात्री येणाºया रुग्णांची गैरसोय ही ठरलेलीच. या आरोग्य केंद्रातर्गत उमरठ, साखर, कापडे बु. ही तीन उपकेंद्रे येतात. मात्र, येथील उमरठ व साखर ही केंद्रे फक्त नावालाच आहेत येथे कोणत्याही प्रकारची आरोग्य सेवा लोकांना मिळत नाही.

पितळवाडी प्राथमिक आरोग्य केंद्रात देण्यात येणाºया सुविधा येथे अपुºया कर्मचारी वर्गामुळे देता येत नाहीत. रिक्त पदे, सुविधांची वानवा या प्रमुख समस्या असून याबाबत अनेक वेळा तक्रारी करूनही प्रशासन सुधारण्यास तयार नाही. रात्री अपरात्री अत्यवस्थ रुग्ण दाखल केल्यानंतर उपचार लांबच, नातेवाइकांना अधिक उपचारासाठी पुढे नेण्यास सांगितले जाते. त्यामुळे अत्यवस्थ रुग्णांना नो एंट्री असा अलिखित नियम या आरोग्य केंद्रात बनला आहे. जबाबदार वैद्यकीय अधिकाऱ्यांची पदे मागील अनेक वर्षांपासून रिक्त आहेत. येथे मुख्य आरोग्य सेविका, आरोग्य सहायक, आरोग्य सहायिका ही पदे रिक्त आहेत. त्यामुळे नाईलाजाने नातेवाईक खासगी रुग्णालयाची वाट धरतात. गंभीर असलेल्या रुग्णांना अधिक उपचारासाठी महाड शासकीय रुग्णालय किंवा मोठ्या रुग्णालयात नेण्यास सांगितले जाते. त्यामुळे ग्रामीण रुग्णांची परिस्थिती रामभरोसे आहे. परिणामी ग्रामीण रुग्णांसह अपघातग्रस्त रुग्णांना तातडीची सेवा मिळत नाही.

गेली अनेक वर्षे वैद्यकीय अधिकारी पदे रिक्त असल्याने त्रिवेणी विभागातील लोकांची गैरसोय होत आहे. त्यामुळे कायमस्वरूपी डॉक्टर मिळावेत अशी मागणी जनतेच्या वतीने केली. - तुकाराम केसरकर, माजी रुग्ण कल्याण समिती सदस्य

वैद्यकीय अधिकारी निवासस्थानाची इमारत ही नादुरुस्त झाली आहे. रायगड जिल्हा परिषदेकडे दुरुस्तीसाठी प्रस्ताव पाठविला आहे. तसेच अपुरे कर्मचारी असल्याने स्वच्छतेकडे विशेष लक्ष देता येत नाही. - डॉ. सुधीर घोडके, वैद्यकीय अधिकारी