शहरं
Join us  
Trending Stories
1
उत्तराखंडच्या राज्यपालांचा धामींना धक्का ! UCC दुरुस्ती व धर्मांतर विरोधी सुधारणा विधेयक परत पाठविले
2
न्यायाधीशांना ई-मेल पाठवून नागपूर जिल्हा न्यायालयात बॉम्बस्फोट करण्याची धमकी
3
माजी आमदार प्रज्ञा सातव यांचा भाजपमध्ये प्रवेश! काँग्रेसचं काय चुकतंय विचारताच, म्हणाल्या...
4
खळबळजनक दावा! "मुंबईत १० हजार कोटींचं बजेट, प्रत्येक उमेदवाराला शिंदेसेना देणार १० कोटी"
5
‘मला उमेदवारी द्या, अन्यथा माझ्या जीवाचं काही बरंवाईट झाल्यास पक्ष जबाबदार राहील’, भाजपाच्या निष्ठावंत कार्यकर्त्याची धमकी
6
चांदीची 'पांढरी' लाट! सोन्याला मागे टाकत गाठला २ लाखांचा ऐतिहासिक टप्पा; काय आहेत भाववाढीची कारणे?
7
डोनाल्ड ट्रम्प यांनी अचानक का वापरलं 'भारत मॉडेल'?; मिड टर्म निवडणुकीपूर्वी अमेरिकेत मोफत खैरात
8
'पुढे दरोडा पडलाय, दागिने काढून ठेवा'; पोलिसांच्या वेशातील टोळीचा पर्दाफाश, लोकांना घाबरवून लुटायचे
9
Donald Trump :"टॅरिफ माझा फेव्हरीट, मी 10 महिन्यांत...!" डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा
10
"विश्वविख्यात बोलले म्हणजे त्यांचे २९ महापालिकांत पराभव पक्के", भाजपाने संजय राऊतांना डिवचलं
11
Car 360 Degree Camera: कारमध्ये ३६० डिग्री कॅमेरा असणं किती फायद्याचं? नेमकं कसं आणि काय काम करतो?
12
Mumbai: खड्ड्यात दुचाकी आदळून तरुणाचा मृत्यू, पण पोलिसांनी मृतावरच नोंदवला गुन्हा!
13
"आम्ही काही मैत्रिणी नाही आहोत...", लारा दत्तासोबत काम केल्यावर रिंकू राजगुरुची प्रतिक्रिया
14
Supriya Sule: "धनंजय मुंडेंना पुन्हा मंत्रिमंडळात घेतले तर...", खासदार सुप्रिया सुळेंचा इशारा!
15
मोठी बातमी! प्रज्ञा सातव यांचा काँग्रेसच्या विधान परिषदेच्या आमदारकीचा राजीनामा
16
अर्टिगाचे काही खरे नाही...! ७-सीटर 'ग्रॅव्हाईट' लाँच होणार, ६ लाखांत मिळणार हाय-टेक फीचर्स...
17
निष्काळजीपणाचा कळस! 'A' पॉझिटिव्ह ऐवजी 'B+' रक्त अन्...; ७५ वर्षीय रुग्णाच्या जीवाशी खेळ
18
Ola Electric च्या शेअर्समध्ये मोठी घसरण! भाविश अग्रवाल यांनी हिस्सा विकून फेडलं कर्ज; पण गुंतवणूकदारांची चिंता वाढली
19
"हा माझा शेवटचा व्हिडीओ आहे, मला रशियाने बळजबरी युद्धात..."; भारतीय तरुणाचा मृत्यू, आईवडिलांवर आघात
20
तुम्हाला क्युट वाटणारा 'सांताक्लॉज' म्हणजे कोका-कोलाचा बिझनेस मास्टरस्ट्रोक! सत्य वाचून बसेल धक्का
Daily Top 2Weekly Top 5

बाप्पाच्या उत्सवात पावसाचे विघ्न, रस्ते जलमय; वाहतुक ठप्प

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2019 02:47 IST

नवी मुंबईत मुसळधार; रस्त्यावर पाणीच पाणी; नाले तुडुंब

1दोन दिवसांपासून नवी मुंबईसह मुंबई व उपनगरांमध्ये सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे जागोजागी पाणी तुंबले होते. याचा परिणाम बुधवारी सकाळपासून सार्वजनिक वाहतुक व्यवस्थेवर झाल्याचे पहायला मिळाले.

2रस्त्यांवर अनेक फुटापर्यंत पाणी साचल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण झाला होता. परिणामी त्या मार्गावरील वाहतुक बंद करण्यात आली होती. अशाच प्रकारामुळे मुंबईतील अनेक मार्गावरील तसेच उरण मार्गावरील एनएमएमटीच्या बस बंद करण्यात आल्या. उरण मार्गावर जासई येथे रस्त्यांना नदीचे स्वरुप आल्याने वाहतुक ठप्प होवून वाहनांच्या अनेक कि.मी पर्यंतच्या रांगा लागल्या होत्या. त्यामुळे अनेक तास अडकून राहिलेल्या प्रवाशांना पर्यायी पायपीट करावी लागली. तर प्रतिवर्षी पावसाळ्यात उरण मार्गावर भेडसावणारया या समस्येवर पर्याय काढण्यात प्रशासन अपयशी ठरत असल्याचा संताप प्रवासी मोहीनी धुमाळ यांनी व्यक्त केला आहे.

3रस्त्यांवर तुंबलेल्या पाण्यामुळे या मार्गावरील एनएमएमटीच्या बस दुपार नंतर बंद करण्यात आल्या. त्याशिवाय मुंबईतही अनेक ठिकाणी पाणी साचल्याने दादर तसेच सायन मार्गे जाणारया बसही बंद करण्यात आल्याचे परिवहन व्यवस्थापक शिरीष आरदवाड यांनी सांगितले.4खासगी प्रवासी वाहने देखिल जागोजागी अडकून पडल्याने मुंबई ते नवी मुंबई दरम्यान प्रवास करणारयांना गैरसोयीला सामोरे जावे लागले.शहरात वाहतूकीचे तीनतेरामंगळवारीपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसाने बुधवारी दिवसभर जोर धरल्याने नवी मुंबई शहर जलमय झाल्याचे दिसून आले. शहराच्या विविध भागात गुडघाभर पाणी साचले होते. तर नाले तुडुंब भरून वाहू लागल्याने वाहतुकीचा खोळंबा झाला. सायन-पनवेल महामार्गावर मोठ्याप्रमाणात वाहतूक कोंडी झाली. शहरातील बहुतांशी भुयारी मार्गात गुडघाभर पाणी साचल्याने वाहतूक व्यवस्था ठप्प झाली होती.२१ व्या शतकातील शहरात पाणी तुंबण्याचे प्रकारनवी मुंबई शहराला नियोजनबद्ध शहर म्हणून ओळखले जाते परंतु गेल्या काही वर्षात शहरातील नियोजनात केलेल्या विविध बदलांमुळे शहराला पावसाचा फटका बसू लागला आहे. शहरातील पार्किंग व्यवस्थेवर तोडगा काढण्यासाठी महापालिका प्रशासनाने पदपथ आणि पावसाळी गटारांची रूंदी कमी करण्याचे काम हाती घेतले आहे. त्यामुळे यावर्षी पाणी तुंबण्याच्या घटनांत वाढ झाल्याचा निष्कर्ष काढला जात आहे. बुधवारी कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे सखल भागातील रस्ते पाण्याखाली गेले होते. त्यामुळे ठिकठिकाणी वाहने बंद पडण्याचे प्रकार घडले. एमआयडीसीतील रस्त्यांना नद्यांचे स्वरूप प्राप्त झाले होते. त्यामुळे वाहनचालकांची मोठी कसरत झाली. शिरवणो, सानपाडा आदी भुयारी मार्गांमध्ये मोठ्याप्रमाणात पाणी साचल्याने वाहतुकीसाठी मार्ग बंद झाले होते.गणेशोत्सव मंडळाकडून खबरदारीसाचलेल्या पाण्यामुळे अनेक सोसायट्यांचे विद्युत मीटर रूम पाण्याखाली गेल्याचे दिसून आले. त्यामुळे सुरक्षिततेच्या उपाययोजना म्हणून महावितरणने काही भागातील विद्युत पुरवठा खंडीत केला होता. तसेच गणोशोत्सव मंडळांना देखील विद्युत पुरवठा बंद ठेवण्याचे आवाहन महावितरणने केले होते. त्यानुसार अनेक गणेशोत्सव मंडळांनी दिवसभर विद्युत पुरवठा खंडीत केला होता.रेल्वेसेवाही झाली विस्कळीतमुंबईत अनेक ठिकाणी रेल्वेरुळावर पाणी साचल्याने पनवेल ते मानखुर्द पर्यंतच रेल्वे धावत होत्या. अशातच बेलापुर येथे एका ठिकाणी रुळाखालील भाग खचल्याने काही वेळासाठी रेल्वेसेवा प्रभावीत झाली होती. मात्र त्यानंतर धिम्या गतीने पनवेल ते मानखुर्द दरम्यान रेल्वे सोडण्यात आल्या.तर ट्रान्स हार्बर मार्गावर वाशी ते ठाणे दरम्यान ५ ते १० मिनिंटाच्या फरकाने रेल्वे धावत होत्या. यामुळे शहरातील सर्वच रेल्वेस्थानकांवर प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईRaigadरायगडRainपाऊस