शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

बाप्पाच्या उत्सवात पावसाचे विघ्न, रस्ते जलमय; वाहतुक ठप्प

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2019 02:47 IST

नवी मुंबईत मुसळधार; रस्त्यावर पाणीच पाणी; नाले तुडुंब

1दोन दिवसांपासून नवी मुंबईसह मुंबई व उपनगरांमध्ये सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे जागोजागी पाणी तुंबले होते. याचा परिणाम बुधवारी सकाळपासून सार्वजनिक वाहतुक व्यवस्थेवर झाल्याचे पहायला मिळाले.

2रस्त्यांवर अनेक फुटापर्यंत पाणी साचल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण झाला होता. परिणामी त्या मार्गावरील वाहतुक बंद करण्यात आली होती. अशाच प्रकारामुळे मुंबईतील अनेक मार्गावरील तसेच उरण मार्गावरील एनएमएमटीच्या बस बंद करण्यात आल्या. उरण मार्गावर जासई येथे रस्त्यांना नदीचे स्वरुप आल्याने वाहतुक ठप्प होवून वाहनांच्या अनेक कि.मी पर्यंतच्या रांगा लागल्या होत्या. त्यामुळे अनेक तास अडकून राहिलेल्या प्रवाशांना पर्यायी पायपीट करावी लागली. तर प्रतिवर्षी पावसाळ्यात उरण मार्गावर भेडसावणारया या समस्येवर पर्याय काढण्यात प्रशासन अपयशी ठरत असल्याचा संताप प्रवासी मोहीनी धुमाळ यांनी व्यक्त केला आहे.

3रस्त्यांवर तुंबलेल्या पाण्यामुळे या मार्गावरील एनएमएमटीच्या बस दुपार नंतर बंद करण्यात आल्या. त्याशिवाय मुंबईतही अनेक ठिकाणी पाणी साचल्याने दादर तसेच सायन मार्गे जाणारया बसही बंद करण्यात आल्याचे परिवहन व्यवस्थापक शिरीष आरदवाड यांनी सांगितले.4खासगी प्रवासी वाहने देखिल जागोजागी अडकून पडल्याने मुंबई ते नवी मुंबई दरम्यान प्रवास करणारयांना गैरसोयीला सामोरे जावे लागले.शहरात वाहतूकीचे तीनतेरामंगळवारीपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसाने बुधवारी दिवसभर जोर धरल्याने नवी मुंबई शहर जलमय झाल्याचे दिसून आले. शहराच्या विविध भागात गुडघाभर पाणी साचले होते. तर नाले तुडुंब भरून वाहू लागल्याने वाहतुकीचा खोळंबा झाला. सायन-पनवेल महामार्गावर मोठ्याप्रमाणात वाहतूक कोंडी झाली. शहरातील बहुतांशी भुयारी मार्गात गुडघाभर पाणी साचल्याने वाहतूक व्यवस्था ठप्प झाली होती.२१ व्या शतकातील शहरात पाणी तुंबण्याचे प्रकारनवी मुंबई शहराला नियोजनबद्ध शहर म्हणून ओळखले जाते परंतु गेल्या काही वर्षात शहरातील नियोजनात केलेल्या विविध बदलांमुळे शहराला पावसाचा फटका बसू लागला आहे. शहरातील पार्किंग व्यवस्थेवर तोडगा काढण्यासाठी महापालिका प्रशासनाने पदपथ आणि पावसाळी गटारांची रूंदी कमी करण्याचे काम हाती घेतले आहे. त्यामुळे यावर्षी पाणी तुंबण्याच्या घटनांत वाढ झाल्याचा निष्कर्ष काढला जात आहे. बुधवारी कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे सखल भागातील रस्ते पाण्याखाली गेले होते. त्यामुळे ठिकठिकाणी वाहने बंद पडण्याचे प्रकार घडले. एमआयडीसीतील रस्त्यांना नद्यांचे स्वरूप प्राप्त झाले होते. त्यामुळे वाहनचालकांची मोठी कसरत झाली. शिरवणो, सानपाडा आदी भुयारी मार्गांमध्ये मोठ्याप्रमाणात पाणी साचल्याने वाहतुकीसाठी मार्ग बंद झाले होते.गणेशोत्सव मंडळाकडून खबरदारीसाचलेल्या पाण्यामुळे अनेक सोसायट्यांचे विद्युत मीटर रूम पाण्याखाली गेल्याचे दिसून आले. त्यामुळे सुरक्षिततेच्या उपाययोजना म्हणून महावितरणने काही भागातील विद्युत पुरवठा खंडीत केला होता. तसेच गणोशोत्सव मंडळांना देखील विद्युत पुरवठा बंद ठेवण्याचे आवाहन महावितरणने केले होते. त्यानुसार अनेक गणेशोत्सव मंडळांनी दिवसभर विद्युत पुरवठा खंडीत केला होता.रेल्वेसेवाही झाली विस्कळीतमुंबईत अनेक ठिकाणी रेल्वेरुळावर पाणी साचल्याने पनवेल ते मानखुर्द पर्यंतच रेल्वे धावत होत्या. अशातच बेलापुर येथे एका ठिकाणी रुळाखालील भाग खचल्याने काही वेळासाठी रेल्वेसेवा प्रभावीत झाली होती. मात्र त्यानंतर धिम्या गतीने पनवेल ते मानखुर्द दरम्यान रेल्वे सोडण्यात आल्या.तर ट्रान्स हार्बर मार्गावर वाशी ते ठाणे दरम्यान ५ ते १० मिनिंटाच्या फरकाने रेल्वे धावत होत्या. यामुळे शहरातील सर्वच रेल्वेस्थानकांवर प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईRaigadरायगडRainपाऊस