शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
2
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
4
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
5
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
6
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
7
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
8
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
9
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
10
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
11
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
12
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
13
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
14
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
15
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
16
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
17
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
18
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
19
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
20
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?

बाप्पाच्या उत्सवात पावसाचे विघ्न, रस्ते जलमय; वाहतुक ठप्प

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2019 02:47 IST

नवी मुंबईत मुसळधार; रस्त्यावर पाणीच पाणी; नाले तुडुंब

1दोन दिवसांपासून नवी मुंबईसह मुंबई व उपनगरांमध्ये सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे जागोजागी पाणी तुंबले होते. याचा परिणाम बुधवारी सकाळपासून सार्वजनिक वाहतुक व्यवस्थेवर झाल्याचे पहायला मिळाले.

2रस्त्यांवर अनेक फुटापर्यंत पाणी साचल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण झाला होता. परिणामी त्या मार्गावरील वाहतुक बंद करण्यात आली होती. अशाच प्रकारामुळे मुंबईतील अनेक मार्गावरील तसेच उरण मार्गावरील एनएमएमटीच्या बस बंद करण्यात आल्या. उरण मार्गावर जासई येथे रस्त्यांना नदीचे स्वरुप आल्याने वाहतुक ठप्प होवून वाहनांच्या अनेक कि.मी पर्यंतच्या रांगा लागल्या होत्या. त्यामुळे अनेक तास अडकून राहिलेल्या प्रवाशांना पर्यायी पायपीट करावी लागली. तर प्रतिवर्षी पावसाळ्यात उरण मार्गावर भेडसावणारया या समस्येवर पर्याय काढण्यात प्रशासन अपयशी ठरत असल्याचा संताप प्रवासी मोहीनी धुमाळ यांनी व्यक्त केला आहे.

3रस्त्यांवर तुंबलेल्या पाण्यामुळे या मार्गावरील एनएमएमटीच्या बस दुपार नंतर बंद करण्यात आल्या. त्याशिवाय मुंबईतही अनेक ठिकाणी पाणी साचल्याने दादर तसेच सायन मार्गे जाणारया बसही बंद करण्यात आल्याचे परिवहन व्यवस्थापक शिरीष आरदवाड यांनी सांगितले.4खासगी प्रवासी वाहने देखिल जागोजागी अडकून पडल्याने मुंबई ते नवी मुंबई दरम्यान प्रवास करणारयांना गैरसोयीला सामोरे जावे लागले.शहरात वाहतूकीचे तीनतेरामंगळवारीपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसाने बुधवारी दिवसभर जोर धरल्याने नवी मुंबई शहर जलमय झाल्याचे दिसून आले. शहराच्या विविध भागात गुडघाभर पाणी साचले होते. तर नाले तुडुंब भरून वाहू लागल्याने वाहतुकीचा खोळंबा झाला. सायन-पनवेल महामार्गावर मोठ्याप्रमाणात वाहतूक कोंडी झाली. शहरातील बहुतांशी भुयारी मार्गात गुडघाभर पाणी साचल्याने वाहतूक व्यवस्था ठप्प झाली होती.२१ व्या शतकातील शहरात पाणी तुंबण्याचे प्रकारनवी मुंबई शहराला नियोजनबद्ध शहर म्हणून ओळखले जाते परंतु गेल्या काही वर्षात शहरातील नियोजनात केलेल्या विविध बदलांमुळे शहराला पावसाचा फटका बसू लागला आहे. शहरातील पार्किंग व्यवस्थेवर तोडगा काढण्यासाठी महापालिका प्रशासनाने पदपथ आणि पावसाळी गटारांची रूंदी कमी करण्याचे काम हाती घेतले आहे. त्यामुळे यावर्षी पाणी तुंबण्याच्या घटनांत वाढ झाल्याचा निष्कर्ष काढला जात आहे. बुधवारी कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे सखल भागातील रस्ते पाण्याखाली गेले होते. त्यामुळे ठिकठिकाणी वाहने बंद पडण्याचे प्रकार घडले. एमआयडीसीतील रस्त्यांना नद्यांचे स्वरूप प्राप्त झाले होते. त्यामुळे वाहनचालकांची मोठी कसरत झाली. शिरवणो, सानपाडा आदी भुयारी मार्गांमध्ये मोठ्याप्रमाणात पाणी साचल्याने वाहतुकीसाठी मार्ग बंद झाले होते.गणेशोत्सव मंडळाकडून खबरदारीसाचलेल्या पाण्यामुळे अनेक सोसायट्यांचे विद्युत मीटर रूम पाण्याखाली गेल्याचे दिसून आले. त्यामुळे सुरक्षिततेच्या उपाययोजना म्हणून महावितरणने काही भागातील विद्युत पुरवठा खंडीत केला होता. तसेच गणोशोत्सव मंडळांना देखील विद्युत पुरवठा बंद ठेवण्याचे आवाहन महावितरणने केले होते. त्यानुसार अनेक गणेशोत्सव मंडळांनी दिवसभर विद्युत पुरवठा खंडीत केला होता.रेल्वेसेवाही झाली विस्कळीतमुंबईत अनेक ठिकाणी रेल्वेरुळावर पाणी साचल्याने पनवेल ते मानखुर्द पर्यंतच रेल्वे धावत होत्या. अशातच बेलापुर येथे एका ठिकाणी रुळाखालील भाग खचल्याने काही वेळासाठी रेल्वेसेवा प्रभावीत झाली होती. मात्र त्यानंतर धिम्या गतीने पनवेल ते मानखुर्द दरम्यान रेल्वे सोडण्यात आल्या.तर ट्रान्स हार्बर मार्गावर वाशी ते ठाणे दरम्यान ५ ते १० मिनिंटाच्या फरकाने रेल्वे धावत होत्या. यामुळे शहरातील सर्वच रेल्वेस्थानकांवर प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईRaigadरायगडRainपाऊस