शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
2
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
3
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
4
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
5
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?
6
नेपाळच्या लष्कर प्रमुखांनी भारतात प्रशिक्षण घेतले, देशाला एकसंघ ठेवण्याची आता त्यांच्यावर जबाबदारी
7
“PM मोदींच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त ७५ ST बसस्थानकावर मोफत वाचनालय सुरू करणार”: सरनाईक
8
पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्...
9
भारतात पारडे पालटले! इन्स्टाने रील्समध्ये युट्यूबला मागे टाकले; मेटाने काय ट्रेडिंग असते ते जाहीर केले
10
२१ लाख लोक रस्त्यावर, आतापर्यंत ९०० जणांचा मृत्यू! पाकिस्तानात पुराचं थैमान 
11
वेफर्स अन् भुजिया बनवणारी कंपनीत हिस्सेदारीसाठी चुरस; पेप्सिको, आयटीसीसह अनेक कंपन्या शर्यतीत
12
शेअर बाजारातील नुकसानीपासून वाचण्याचा सॉलिड फंडा, नितीन कामथ यांनी सांगितली भन्नाट ट्रिक
13
"भविष्यात मुख्यमंत्री होण्याची माझ्याकडे ऑफर", असं कोण म्हणालं? वाचा
14
"ही तर फक्त सुरूवात..." नाशिकमध्ये उद्धवसेना-मनसे संयुक्त जनआक्रोश मोर्चा; भाजपाला दिलं आव्हान
15
'भारताच्या वाढीमुळे घाबरले, म्हणून शुल्क लादला', ट्रम्प टॅरिफवर मोहन भागवतांचे सूचक विधान
16
क्रूरतेचा कळस! गुजरातमधून विमानानं आला, गर्लफ्रेंडवर अत्याचार केला अन् ५१ वेळा स्क्रूड्रायव्हर खुपसला; कोर्टाने सुनावली शिक्षा
17
एकेकाळी ५००० रुपये होता पगार, आता त्यांची कंपनी आणतेय ३८२० कोटींचा IPO; कोण आहे ही व्यक्ती?
18
पितृपक्ष २०२५: ५ रुपयांत मिळणाऱ्या ५ वस्तू पितरांना अर्पण करा; पूर्वज आयुष्यभर आशीर्वाद देतील
19
UPSC ची तयारी करणाऱ्या युवकानं उचललं धक्कादायक पाऊल; स्वत:चा प्रायव्हेट पार्ट कापला, कारण...
20
विजयादशमी २०२५: दसरा कधी आहे? देशभरात होतो साजरा; पाहा, महाराष्ट्रातील वैशिष्ट्य-मान्यता

Rain: मुंबापुरीत कोसळधारा; वरळी हिल रोडवर टेकडीवरील दगड, माती कोसळली

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2020 06:31 IST

मुंबई शहर आणि उपनगरात शुक्रवारी दिवसभर पावसाने धिंगाणा घातला असतानाच आता ४ जुलै रोजीही पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, नाशिकसह पुणे जिल्ह्यासाठीही रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.

मुंबई : देशासह महाराष्ट्राला व्यापलेल्या मान्सूनने मुंबईकडे पाठ फिरवली होती. मात्र त्यानंतर शुक्रवारी दिवसभर कोसळलेल्या पावसाने मुंबईला भिजवले. दुपारी १ नंतर मात्र पावसाचा जोर ओसरला.

पावसामुळे मुंबईत वाहतूक मंदावली. ३८ ठिकाणी पाणी साचल्याचे अतिरिक्त आयुक्त प्रवीण पडवळ यांनी सांगितले. तर, अंधेरी सबवेमध्ये पाणी साचल्याने तो काही काळ बंद करून वाहतूक वळवल्याची माहिती उपआयुक्त संदीप भाजीभाकरे यांनी दिली.२४ ठिकाणी झाडे कोसळली,

सायंकाळी साडेपाचपर्यंतच्या नोंदीनुसार, कुलाबा येथे १६०.६ तर सांताक्रुझ येथे १०२.७ मिली. पाऊस झाला. सकाळी ८ ते १० या वेळेत समुद्राला भरती होती. या वेळी ४.४१ मीटर उंच लाटा उसळल्या. परिणामी हिंदमाता, कफ परेड, धोबीघाट, भुलाभाई देसाई रोड, बिंदु माधव जंक्शन, चिराबाजार, भायखळा पोलीस ठाणे, ई. मर्चंट रोड, सायन रोड नंबर २४, गांधी मार्केट, अंधेरी सब वे येथे पाणी साचले. ३ ठिकाणी बांधकामाचा भाग पडला. २४ ठिकाणी झाडे पडली. ९ ठिकाणी शॉर्टसर्किट झाले. वरळी हिल रोड येथे जरीमरी मंदिराजवळ टेकडीवरील मातीचा काही भाग, दगड खाली कोसळले. सुदैवाने हानी झाली नाही. 'मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, नाशिक, पुण्याला आज रेड अलर्टमुंबई शहर आणि उपनगरात शुक्रवारी दिवसभर पावसाने धिंगाणा घातला असतानाच आता ४ जुलै रोजीही पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, नाशिकसह पुणे जिल्ह्यासाठीही रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. येथे अत्यंत मुसळधार पाऊस पडेल, असा इशारा हवामान खात्याने दिला. तर ५ आणि ६ जुलै रोजी पालघरला आॅरेंज अलर्ट (कोणत्याही क्षणी नैसर्गिक आपत्ती येऊ शकते) असून, येथे तुरळक ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडेल.५ ते ६ जुलैदरम्यान मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, अहमदनगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, औरंगाबाद, जालना, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी पावसाचा मारा सुरूच राहील, अशी शक्यताही हवामान खात्याने वर्तविली आहे. मुंबई प्रादेशिक हवामान शास्त्र विभागाचे उपमहासंचालक कृष्णानंद होसाळीकर यांनी सांगितले की, भारतीय हवामान शास्त्र विभागाने शनिवारीही मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. यात मुंबईसह पश्चिम किनारपट्टीचा समावेश आहे.मशीद रेल्वे स्थानकावरील रूळ पाण्याखालीमुसळधार पावसामुळे रेल्वे रुळाजवळील नाल्यामधून पाणी वाहण्यास अडथळा आला. पाण्याचा निचरा न झाल्याने मध्य रेल्वे मार्गावरील मशीद स्थानकावरील रुळांवर सकाळी ११ च्या सुमारास पाणी साचले. परिणामी, काही काळ रेल्वे सेवा विस्कळीत झाली. मुसळधार पावसामुळे हार्बर मार्गावरील लोकल फेऱ्या १० ते १५ मिनिटांनी धावत होत्या. पनवेलकडे जाणारी लोकल मशीद स्थानकात थांबली होती. दरम्यान, लोकल सेवा सुरळीत करण्यासाठी वडाळा येथून विशेष लोकल सोडण्यात आली.बसचा मार्ग बदललासकाळी १० ते ११ या वेळेत मलबार हिल, दादर, भायखळा, हाजी अली, सांताक्रुझ, विलेपार्ले, पवई, घाटकोपर, कुर्ला, साकीनाका, वांद्रे, अंधेरी, सांताक्रूझ, बोरीवली, गोरेगाव येथे पावसाचा जोर वाढला. वरळी नाका, हिंदमाता, धोबीघाट, चिराबाझार यासह अनेक ठिकाणी पाणी साचल्याने बेस्ट बसची वाहतूक वळविण्यात आली होती.वातावरण धूसरसकाळी ८ वाजल्यापासून दुपारी १२ वाजेपर्यंत मुंबईवर दाटून आलेल्या ढगांमुळे काळोख झाला होता. शिवाय मुसळधार पाऊस कोसळत होता. त्यामुळे मुंबईतील वातावरण धूसर झाल्याचे चित्र होते.

टॅग्स :Rainपाऊस