शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
4
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
5
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
6
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
7
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
8
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
9
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
10
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
11
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
12
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
13
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
14
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
15
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
16
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
17
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
18
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
19
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
20
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."

Rain: मुंबापुरीत कोसळधारा; वरळी हिल रोडवर टेकडीवरील दगड, माती कोसळली

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2020 06:31 IST

मुंबई शहर आणि उपनगरात शुक्रवारी दिवसभर पावसाने धिंगाणा घातला असतानाच आता ४ जुलै रोजीही पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, नाशिकसह पुणे जिल्ह्यासाठीही रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.

मुंबई : देशासह महाराष्ट्राला व्यापलेल्या मान्सूनने मुंबईकडे पाठ फिरवली होती. मात्र त्यानंतर शुक्रवारी दिवसभर कोसळलेल्या पावसाने मुंबईला भिजवले. दुपारी १ नंतर मात्र पावसाचा जोर ओसरला.

पावसामुळे मुंबईत वाहतूक मंदावली. ३८ ठिकाणी पाणी साचल्याचे अतिरिक्त आयुक्त प्रवीण पडवळ यांनी सांगितले. तर, अंधेरी सबवेमध्ये पाणी साचल्याने तो काही काळ बंद करून वाहतूक वळवल्याची माहिती उपआयुक्त संदीप भाजीभाकरे यांनी दिली.२४ ठिकाणी झाडे कोसळली,

सायंकाळी साडेपाचपर्यंतच्या नोंदीनुसार, कुलाबा येथे १६०.६ तर सांताक्रुझ येथे १०२.७ मिली. पाऊस झाला. सकाळी ८ ते १० या वेळेत समुद्राला भरती होती. या वेळी ४.४१ मीटर उंच लाटा उसळल्या. परिणामी हिंदमाता, कफ परेड, धोबीघाट, भुलाभाई देसाई रोड, बिंदु माधव जंक्शन, चिराबाजार, भायखळा पोलीस ठाणे, ई. मर्चंट रोड, सायन रोड नंबर २४, गांधी मार्केट, अंधेरी सब वे येथे पाणी साचले. ३ ठिकाणी बांधकामाचा भाग पडला. २४ ठिकाणी झाडे पडली. ९ ठिकाणी शॉर्टसर्किट झाले. वरळी हिल रोड येथे जरीमरी मंदिराजवळ टेकडीवरील मातीचा काही भाग, दगड खाली कोसळले. सुदैवाने हानी झाली नाही. 'मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, नाशिक, पुण्याला आज रेड अलर्टमुंबई शहर आणि उपनगरात शुक्रवारी दिवसभर पावसाने धिंगाणा घातला असतानाच आता ४ जुलै रोजीही पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, नाशिकसह पुणे जिल्ह्यासाठीही रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. येथे अत्यंत मुसळधार पाऊस पडेल, असा इशारा हवामान खात्याने दिला. तर ५ आणि ६ जुलै रोजी पालघरला आॅरेंज अलर्ट (कोणत्याही क्षणी नैसर्गिक आपत्ती येऊ शकते) असून, येथे तुरळक ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडेल.५ ते ६ जुलैदरम्यान मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, अहमदनगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, औरंगाबाद, जालना, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी पावसाचा मारा सुरूच राहील, अशी शक्यताही हवामान खात्याने वर्तविली आहे. मुंबई प्रादेशिक हवामान शास्त्र विभागाचे उपमहासंचालक कृष्णानंद होसाळीकर यांनी सांगितले की, भारतीय हवामान शास्त्र विभागाने शनिवारीही मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. यात मुंबईसह पश्चिम किनारपट्टीचा समावेश आहे.मशीद रेल्वे स्थानकावरील रूळ पाण्याखालीमुसळधार पावसामुळे रेल्वे रुळाजवळील नाल्यामधून पाणी वाहण्यास अडथळा आला. पाण्याचा निचरा न झाल्याने मध्य रेल्वे मार्गावरील मशीद स्थानकावरील रुळांवर सकाळी ११ च्या सुमारास पाणी साचले. परिणामी, काही काळ रेल्वे सेवा विस्कळीत झाली. मुसळधार पावसामुळे हार्बर मार्गावरील लोकल फेऱ्या १० ते १५ मिनिटांनी धावत होत्या. पनवेलकडे जाणारी लोकल मशीद स्थानकात थांबली होती. दरम्यान, लोकल सेवा सुरळीत करण्यासाठी वडाळा येथून विशेष लोकल सोडण्यात आली.बसचा मार्ग बदललासकाळी १० ते ११ या वेळेत मलबार हिल, दादर, भायखळा, हाजी अली, सांताक्रुझ, विलेपार्ले, पवई, घाटकोपर, कुर्ला, साकीनाका, वांद्रे, अंधेरी, सांताक्रूझ, बोरीवली, गोरेगाव येथे पावसाचा जोर वाढला. वरळी नाका, हिंदमाता, धोबीघाट, चिराबाझार यासह अनेक ठिकाणी पाणी साचल्याने बेस्ट बसची वाहतूक वळविण्यात आली होती.वातावरण धूसरसकाळी ८ वाजल्यापासून दुपारी १२ वाजेपर्यंत मुंबईवर दाटून आलेल्या ढगांमुळे काळोख झाला होता. शिवाय मुसळधार पाऊस कोसळत होता. त्यामुळे मुंबईतील वातावरण धूसर झाल्याचे चित्र होते.

टॅग्स :Rainपाऊस