शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

चौकशी नंबर बंद झाल्याने रेल्वे प्रवाशांचे हाल, आॅनलाइन चौकशी नंबर कायम नॉटरिचेबल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2017 03:03 IST

सिकंदर अनवारेदासगाव : कोकण रेल्वेचे महाडमध्ये वीर रेल्वेस्थानक आहे. महाड शहरापासून सुमारे १५ कि.मी. लांब असणारे हे रेल्वेस्थानक तालुक्यातील सर्वच ग्रामीण भागांना प्रवासासाठी गैरसोईचे आहे. वीर रेल्वेस्थानकात सुरुवातीपासून चौकशीसाठी असलेला २७००५५ हा दूरध्वनी क्रमांक बंद झाल्याने, रेल्वे प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत. सध्याच्या स्थितीत रेल्वे प्रशासनाने रेल्वेसंदर्भात माहितीसाठी आॅनलाइन चौकशी ...

सिकंदर अनवारेदासगाव : कोकण रेल्वेचे महाडमध्ये वीर रेल्वेस्थानक आहे. महाड शहरापासून सुमारे १५ कि.मी. लांब असणारे हे रेल्वेस्थानक तालुक्यातील सर्वच ग्रामीण भागांना प्रवासासाठी गैरसोईचे आहे. वीर रेल्वेस्थानकात सुरुवातीपासून चौकशीसाठी असलेला २७००५५ हा दूरध्वनी क्रमांक बंद झाल्याने, रेल्वे प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत. सध्याच्या स्थितीत रेल्वे प्रशासनाने रेल्वेसंदर्भात माहितीसाठी आॅनलाइन चौकशी नंबर सुरू केला आहे. मात्र, तोदेखील कायम बंद आहे.मुंबई-गोवा महामार्गालगत असणारे वीर रेल्वेस्थानक महाडसाठी आहे. महाडपासून लांब असल्यामुळे हे स्थानक महाडकरांसाठी असून नसल्यासारखे आहे. रात्री-अपरात्री येणाºया गाड्या, दोन-तीन तासांच्या विलंबाने चालणाºया गाड्या, अशी कोकण रेल्वेची अवस्था असल्यामुळे कोकण रेल्वे प्रवासासाठी चौकशी क्रमांक महत्त्वपूर्ण होता. गेले वर्षभरापासून हा क्रमांक बंद आहे. प्रवाशांना गाडीची वेळ अगर चौकशीसाठी १५ कि.मी. दूर रेल्वेस्थानकात जाण्याशिवाय पर्याय राहत नाही. याचा फ टका प्रवाशांना बसत असून, उशिरा येणाºया गाड्यांची वाट पाहत तासन्तास रेल्वेस्थानकात बसावे लागत आहे.कोकण रेल्वेचे वीर रेल्वेस्थानक सुरू झाल्यानंतर त्याच वेळी या स्थानकात २७००५५ हा दूरध्वनी क्रमांक सुरू करण्यात आला. गेल्या एक वर्षापासून हा क्रमांक बंद करण्यात आला. रेल्वे प्रशासन हा दूरध्वनी क्रमांक चौकशीसाठी असल्याचे मानण्यास तयार नसून, हा नंबर कार्यालयीन कामकाज तसेच अत्यावश्यक सेवेसाठी होता; परंतु सुरुवातीपासून बंद होईपर्यंत या क्रमांकाचा वीर रेल्वेस्थानकात चौकशीसाठीच वापर करण्यात येत होता. हा क्रमांक बंद केल्यानंतर या वीर रेल्वेस्थानकामध्ये पुन्हा दुसºया क्रमांकाचा दूरध्वनी क्रमांक २७००५५ सुरू करण्यात आला. यावर अगर एखाद्या प्रवाशांने चौकशीसाठी फोन लावला, तर हा क्रमांक कार्यालयीन आहे. चौकशीसाठी नाही. चौकशीसाठी आॅनलाइन सुविधा सुरू आहे, असे उत्तर देण्यात येते. यासंदर्भात रत्नागिरी कोकण रेल्वे कार्यालयाशी संपर्क साधला असता, कोकण रेल्वेचे अधिकारी व्ही. बी. निकम यांनी जुने नंबर हे जे स्टेशनवर होते ते चौकशीसाठी नव्हते. स्टेशनमध्ये एखादी दुर्घटना घडली, तर अन्य ठिकाणी संपर्क साधता यावा, यासाठी होते. १८००२३३१३३२ जो कॉल सेंटर आॅनलाइन नंबर आहे असे सांगितले. सध्या या मार्गावर गाड्यांची संख्या वाढल्यामुळे फोनवर संपर्क केल्याने स्टेशनमास्तर जर फोन घेत बसला, तर कामावर भरपूर परिणाम होतात.>वीर स्थानक महाडकरांसाठी महत्त्वाचेमहाड तालुक्यातील खेड्या-पाड्यातील मोठ्या संख्येने नागरिक कोकण रेल्वेने प्रवास करतात. तसेच महाड औद्योगिक वसाहतीतील मजूरवर्गही मोठ्या संख्येने कोकण रेल्वेने प्रवास करतो. महाड तालुक्यातील नागरिकांसाठी जवळचे तसेच महत्त्वाचे वीर रेल्वेस्थानक आहे. दर आठवड्याला थांबणारी अजमेर-मरुसागर या गाडीमधून मोठ्या संख्येने महाड तालुक्यातील प्रवासी प्रवास करतात. तसेच रात्रीच्या थांबणाºया दोन गाड्या तुतारी एक्स्प्रेस यामधूनही महाडमधील नागरिकांचा मोठ्या प्रमाणात प्रवास होतो. अशा वेळी चौकशीनंबर बंद असल्याचा मोठ्या प्रमाणात फटका नागरिकांना सहन करावा लागत आहे. सर्वात महत्त्वाचे रात्रीच्या उशिरा धावणाºया गाड्यांची चौकशी महत्त्वाची आहे. मात्र, या चौकशी बंद केलेल्या दूरध्वनीमुळे रेल्वे प्रवाशांमध्ये रेल्वे प्रशासनाविरोधात नाराजी व्यक्त होत आहे.>चौकशीसाठी असलेला आॅनलाइन नंबर नेहमी बंदवीर रेल्वेस्थानकातून दर दिवशी अप ३० तर डाउन ३० अशा ६० गाड्या धावतात. मात्र, यामधून रत्नागिरी-दादर, सकाळी ९ वा.ची सावंतवाडी-दिवा संध्याकाळी ४ वा. तर रात्रीची सावंतवाडी-दादर, १.२० मि. (तुतारी एक्स्प्रेस) अशा मुंबई जाणाºया तीन गाड्या, तर मुंबईहून कोकणात, मडगाव, दुसरी दादर-रत्नागिरी संध्याकाळी ८ वाजताची तर दादर-सावंतवाडी (तुतारी एक्स्प्रेस) अशा सहा गाड्यांचा थांबा दर दिवशी वीर रेल्वेस्थानकात आहे, तर दर आठवड्याच्या सोमवारी अजमेरला जाणारी व तीच परतीच्या प्रवासाला शनिवारी वीर रेल्वेस्थानकात थांबतात. मात्र, नेहमी या वीर रेल्वेस्थानकात थांबणाºया पॅसेंजर लोकल गाड्या असल्यामुळे मुंबई तसेच रत्नागिरी, सावंतवाडीवरून निघाल्यानंतर ठिकठिकाणी रेल्वेस्थानकांत थांबवून अन्य गाड्यांना क्रॉसिंग देण्यात येतो. यामुळे गाड्या दर दिवशी वेळेवर नसतातच. १ ते २ तास नेहमी उशिरा धावतात. मात्र, चौकशी नंबर बंद केल्याने व आॅनलाइन नंबर बंद असल्याने प्रवाशांना गाड्यांच्या वेळेअगोदर स्थानकात जाऊन गाड्यांची दोन-दोन तास वाट पाहावी लागते. हा चौकशी नंबर बंद केल्याने त्याचा मोठा फटका रेल्वे प्रवाशांना बसला आहे. मात्र, मोठ्या प्रमाणात पुन्हा स्थानकात चौकशी नंबर सुरू करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.