शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
2
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
3
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
4
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
5
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
6
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
7
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
8
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
9
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
10
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
11
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
12
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
13
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
14
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
15
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
16
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
17
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
18
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
19
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
20
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव

चौकशी नंबर बंद झाल्याने रेल्वे प्रवाशांचे हाल, आॅनलाइन चौकशी नंबर कायम नॉटरिचेबल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2017 03:03 IST

सिकंदर अनवारेदासगाव : कोकण रेल्वेचे महाडमध्ये वीर रेल्वेस्थानक आहे. महाड शहरापासून सुमारे १५ कि.मी. लांब असणारे हे रेल्वेस्थानक तालुक्यातील सर्वच ग्रामीण भागांना प्रवासासाठी गैरसोईचे आहे. वीर रेल्वेस्थानकात सुरुवातीपासून चौकशीसाठी असलेला २७००५५ हा दूरध्वनी क्रमांक बंद झाल्याने, रेल्वे प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत. सध्याच्या स्थितीत रेल्वे प्रशासनाने रेल्वेसंदर्भात माहितीसाठी आॅनलाइन चौकशी ...

सिकंदर अनवारेदासगाव : कोकण रेल्वेचे महाडमध्ये वीर रेल्वेस्थानक आहे. महाड शहरापासून सुमारे १५ कि.मी. लांब असणारे हे रेल्वेस्थानक तालुक्यातील सर्वच ग्रामीण भागांना प्रवासासाठी गैरसोईचे आहे. वीर रेल्वेस्थानकात सुरुवातीपासून चौकशीसाठी असलेला २७००५५ हा दूरध्वनी क्रमांक बंद झाल्याने, रेल्वे प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत. सध्याच्या स्थितीत रेल्वे प्रशासनाने रेल्वेसंदर्भात माहितीसाठी आॅनलाइन चौकशी नंबर सुरू केला आहे. मात्र, तोदेखील कायम बंद आहे.मुंबई-गोवा महामार्गालगत असणारे वीर रेल्वेस्थानक महाडसाठी आहे. महाडपासून लांब असल्यामुळे हे स्थानक महाडकरांसाठी असून नसल्यासारखे आहे. रात्री-अपरात्री येणाºया गाड्या, दोन-तीन तासांच्या विलंबाने चालणाºया गाड्या, अशी कोकण रेल्वेची अवस्था असल्यामुळे कोकण रेल्वे प्रवासासाठी चौकशी क्रमांक महत्त्वपूर्ण होता. गेले वर्षभरापासून हा क्रमांक बंद आहे. प्रवाशांना गाडीची वेळ अगर चौकशीसाठी १५ कि.मी. दूर रेल्वेस्थानकात जाण्याशिवाय पर्याय राहत नाही. याचा फ टका प्रवाशांना बसत असून, उशिरा येणाºया गाड्यांची वाट पाहत तासन्तास रेल्वेस्थानकात बसावे लागत आहे.कोकण रेल्वेचे वीर रेल्वेस्थानक सुरू झाल्यानंतर त्याच वेळी या स्थानकात २७००५५ हा दूरध्वनी क्रमांक सुरू करण्यात आला. गेल्या एक वर्षापासून हा क्रमांक बंद करण्यात आला. रेल्वे प्रशासन हा दूरध्वनी क्रमांक चौकशीसाठी असल्याचे मानण्यास तयार नसून, हा नंबर कार्यालयीन कामकाज तसेच अत्यावश्यक सेवेसाठी होता; परंतु सुरुवातीपासून बंद होईपर्यंत या क्रमांकाचा वीर रेल्वेस्थानकात चौकशीसाठीच वापर करण्यात येत होता. हा क्रमांक बंद केल्यानंतर या वीर रेल्वेस्थानकामध्ये पुन्हा दुसºया क्रमांकाचा दूरध्वनी क्रमांक २७००५५ सुरू करण्यात आला. यावर अगर एखाद्या प्रवाशांने चौकशीसाठी फोन लावला, तर हा क्रमांक कार्यालयीन आहे. चौकशीसाठी नाही. चौकशीसाठी आॅनलाइन सुविधा सुरू आहे, असे उत्तर देण्यात येते. यासंदर्भात रत्नागिरी कोकण रेल्वे कार्यालयाशी संपर्क साधला असता, कोकण रेल्वेचे अधिकारी व्ही. बी. निकम यांनी जुने नंबर हे जे स्टेशनवर होते ते चौकशीसाठी नव्हते. स्टेशनमध्ये एखादी दुर्घटना घडली, तर अन्य ठिकाणी संपर्क साधता यावा, यासाठी होते. १८००२३३१३३२ जो कॉल सेंटर आॅनलाइन नंबर आहे असे सांगितले. सध्या या मार्गावर गाड्यांची संख्या वाढल्यामुळे फोनवर संपर्क केल्याने स्टेशनमास्तर जर फोन घेत बसला, तर कामावर भरपूर परिणाम होतात.>वीर स्थानक महाडकरांसाठी महत्त्वाचेमहाड तालुक्यातील खेड्या-पाड्यातील मोठ्या संख्येने नागरिक कोकण रेल्वेने प्रवास करतात. तसेच महाड औद्योगिक वसाहतीतील मजूरवर्गही मोठ्या संख्येने कोकण रेल्वेने प्रवास करतो. महाड तालुक्यातील नागरिकांसाठी जवळचे तसेच महत्त्वाचे वीर रेल्वेस्थानक आहे. दर आठवड्याला थांबणारी अजमेर-मरुसागर या गाडीमधून मोठ्या संख्येने महाड तालुक्यातील प्रवासी प्रवास करतात. तसेच रात्रीच्या थांबणाºया दोन गाड्या तुतारी एक्स्प्रेस यामधूनही महाडमधील नागरिकांचा मोठ्या प्रमाणात प्रवास होतो. अशा वेळी चौकशीनंबर बंद असल्याचा मोठ्या प्रमाणात फटका नागरिकांना सहन करावा लागत आहे. सर्वात महत्त्वाचे रात्रीच्या उशिरा धावणाºया गाड्यांची चौकशी महत्त्वाची आहे. मात्र, या चौकशी बंद केलेल्या दूरध्वनीमुळे रेल्वे प्रवाशांमध्ये रेल्वे प्रशासनाविरोधात नाराजी व्यक्त होत आहे.>चौकशीसाठी असलेला आॅनलाइन नंबर नेहमी बंदवीर रेल्वेस्थानकातून दर दिवशी अप ३० तर डाउन ३० अशा ६० गाड्या धावतात. मात्र, यामधून रत्नागिरी-दादर, सकाळी ९ वा.ची सावंतवाडी-दिवा संध्याकाळी ४ वा. तर रात्रीची सावंतवाडी-दादर, १.२० मि. (तुतारी एक्स्प्रेस) अशा मुंबई जाणाºया तीन गाड्या, तर मुंबईहून कोकणात, मडगाव, दुसरी दादर-रत्नागिरी संध्याकाळी ८ वाजताची तर दादर-सावंतवाडी (तुतारी एक्स्प्रेस) अशा सहा गाड्यांचा थांबा दर दिवशी वीर रेल्वेस्थानकात आहे, तर दर आठवड्याच्या सोमवारी अजमेरला जाणारी व तीच परतीच्या प्रवासाला शनिवारी वीर रेल्वेस्थानकात थांबतात. मात्र, नेहमी या वीर रेल्वेस्थानकात थांबणाºया पॅसेंजर लोकल गाड्या असल्यामुळे मुंबई तसेच रत्नागिरी, सावंतवाडीवरून निघाल्यानंतर ठिकठिकाणी रेल्वेस्थानकांत थांबवून अन्य गाड्यांना क्रॉसिंग देण्यात येतो. यामुळे गाड्या दर दिवशी वेळेवर नसतातच. १ ते २ तास नेहमी उशिरा धावतात. मात्र, चौकशी नंबर बंद केल्याने व आॅनलाइन नंबर बंद असल्याने प्रवाशांना गाड्यांच्या वेळेअगोदर स्थानकात जाऊन गाड्यांची दोन-दोन तास वाट पाहावी लागते. हा चौकशी नंबर बंद केल्याने त्याचा मोठा फटका रेल्वे प्रवाशांना बसला आहे. मात्र, मोठ्या प्रमाणात पुन्हा स्थानकात चौकशी नंबर सुरू करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.