शहरं
Join us  
Trending Stories
1
Lok Sabha 2024 Rahul Gandhi :सस्पेन्स संपला! अखेर राहुल गांधींच्या नावाची घोषणा, पाहा कुठून लढणार लोकसभा, अमेठीत कोण?
2
सूर्य पश्चिमेला उगवेल मात्र उद्धव ठाकरे निर्णय बदलत नाहीत; जयंत पाटील थेट बोलले
3
तुम्ही महाराष्ट्राचे वाघ तर आम्हीही सांगलीचे वाघ; ठाकरेंसमोरच विश्वजित कदम गरजले
4
भाजप v/s काँग्रेस; उद्धवसेना v/s शिंदेसेना; शरद पवार गट विरुद्ध शिंदेसेनेत एकही लढत नाही
5
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
6
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
7
एकेकाळी मोबाइल फोन क्षेत्र गाजवलं, आता त्यांचं वर्कप्लेस अपग्रेड करणार Wipro; मिळाली मेगा डील!
8
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
9
पाकमधील हिंदू मुलींचे बळजबरी धर्मांतर रोखा; दानेशकुमार पलानी यांनी उठवला आवाज
10
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
11
धावत्या लोकलमध्ये सशस्त्र हल्ल्यात प्रवाशाचा मृत्यू; कल्याण रेल्वे पोलिसांनी दोघांना केली अटक
12
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
13
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
14
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
15
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
16
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
17
मनसेच्या अविनाश जाधवांवर गुन्हा दाखल; पाच कोटींच्या वसुलीसाठी सोन्याच्या दागिन्यांचे व्यापारी जैन यांना धमकावल्याचा आरोप
18
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
19
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला
20
जातिवाचक शिवीगाळ, नग्न करून मारहाण; तरुणाची आत्महत्या, कोपर्डी घटनेतील पीडितेच्या भावासह तिघांविरुद्ध गुन्हा

रायगडचे २४ किनारे आपत्ती निवारणास सज्ज

By ऑनलाइन लोकमत | Published: February 01, 2019 4:27 AM

पर्यटकांच्या सुरक्षेसाठी आधुनिक साधने तैनात

- जयंत धुळप अलिबाग: जिल्ह्यातील समुद्रकिनाऱ्यांवर मदत व बचाव कार्यासाठी तसेच संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी साहाय्यभूत ठरणारी आधुनिक साधने जिल्ह्यातील २४ समुद्रकिनारी पर्यटकांच्या सुरक्षेसाठी तैनात करण्यात आली आहेत. याची माहिती रायगडचे जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिली.रायगडच्या समुद्रकिनारी राज्या-परराज्यातील पर्यटक मोठ्या प्रमाणात येत असतात. अनेकदा समुद्राच्या भरती-ओहोटीचा अंदाज न आल्याने जीवावर बेतणारे प्रसंग या किनाºयावर घडले आहेत. त्यातून पर्यटकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला होता. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. पर्यटक सुरक्षा अभियानांतर्गत ७८ लाख रुपयांच्या निधीतून ही साधने आणण्यात आली आहेत. सद्य:स्थितीत पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी अशा प्रकारे संरक्षण यंत्रणा उभी करण्यात रायगड जिल्हा राज्यात अव्वल ठरला आहे.रायगडचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी या आधुनिक साधनांची पाहणी करून माहिती घेतल्यानंतर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे प्रमुख तथा जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी पर्यटकांच्या सुरक्षेसाठी ही साधने तैनात केली आहेत. जिल्ह्यातील अलिबाग, मांडवा, आक्षी, नागाव, किहीम, रेवदंडा, कोर्ले, मुरुड- जंजिरा, जलदुर्ग, काशीद, श्रीवर्धन, हरिहरेश्वर, दिवेआगर, सासवणे, आवास, थळ, वरसोली, रांजणपाडा डावली, मिळकतखार, कोप्रोली बोडणी, आदगाव, वेळास आगर, घारापुरी, नागाव पिरवाडी आदी २४ समुद्रकिनारी ही सुरक्षा साधने तैनात केली आहेत.परिणामी, येत्या काळात समुद्रात बुडण्याच्या दुर्घटनांवर नियंत्रण ठेवण्यास मदत होणार आहे. दरम्यान, समुद्रकिनारी येणाºया पर्यटकांनी आपल्या स्वत:च्या सुरक्षिततेसाठी आपत्ती निवारण पथकास सहकार्य करावे, त्यांनी दिलेल्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने केले गेले आहे.दोन टप्प्यांत साधनसामग्रीचे वितरणपहिल्या टप्प्यात मेगाफोन, दुर्बीण, टॉर्च, दोरखंड, लाइफ जॅकेट, फायबर स्ट्रेचर, स्कुबा ड्रायव्हिंग सेट, जीवरक्षक रिंग, सायरन, उलन ब्लँकेट, सर्चलाईट आदी साधने उपलब्ध करून देण्यात आली आहेत. तर दुसºया टप्प्यात रेस्क्यू ट्यूब, रेस्कू कॅन, थ्रो बॅग, जीवरक्षकांसाठी पोषाख, सर्फ रेस्क्यू बोर्ड आदी सामुग्री उपलब्ध करून देण्यात येत आहे. तसेच समुद्रकिनाºयांवर २५ जीवरक्षक नेमून त्यांना आवश्यक प्रशिक्षण देण्यात आले आहे.मुरुडच्या दुर्घटनेनंतर पर्यटक सुरक्षा अभियानपुण्यातील अबेदा इनामदार महाविद्यालयातील १४ विद्यार्थ्यांचा मुरुडच्या समुद्रात बुडून मृत्यू झाला होता. अशा प्रकारच्या घटना वारंवार घडू नये, यासाठी शासनाने पर्यटकांच्या सुरक्षेसाठी हा निर्णय घेऊन जिल्ह्यातील समुद्रकिनाºयांवर मदत व बचावकार्यासाठी साहित्य पुरवण्याची घोषणा करण्यात आली होती.पर्यटकांच्या सुरक्षा तसेच बचावकार्यासाठी आवश्यक विविध ११ साधने आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडून संबंधित ग्रामपंचायती आणि नगरपालिकांना उपलब्ध करून देण्यात आली आहेत.

टॅग्स :Raigadरायगड