शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

रायगडला बनविणार टूरिझम डेस्टिनेशन

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2023 11:35 IST

समाजातील सर्व घटकांना सोबत घेऊन जिल्ह्याच्या विकासाचे प्रकल्प पूर्ततेकडे नेण्याकडे माझा भर असणार आहे.

दवी स्वराज्याची राजधानी असलेल्या रायगड किल्ल्याला फार मोठा ऐतिहासिक वारसा असून समस्त देशासाठी प्रेरणादायी आहे. इथली संस्कृती, परंपरा जपतानाच नावीन्यपूर्ण व अद्यावत योजना राबवत हा इतिहास जगापुढे मांडण्याची गरज आहे. त्यासाठी रायगड विकास प्राधिकरणाचे काम गतीने पूर्ण करण्याला माझे प्राधान्य राहणार आहे. त्याचबरोबर जिल्ह्याच्या औद्योगिकीकरण, शेती व पर्यटन व्यवसायाच्या माध्यमातून  सर्वांगीण विकासासाठी नियोजनबद्ध  कार्यक्रम राबविण्यावर आपला भर राहणार  आहे. जेणेकरून ठराविक मुदतीमध्ये ते कार्यान्वित होतील. समाजातील सर्व घटकांना सोबत घेऊन जिल्ह्याच्या विकासाचे प्रकल्प पूर्ततेकडे नेण्याकडे माझा भर असणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांची  राजधानी असलेल्या रायगड किल्ल्याच्या  संवर्धनासाठी  शासनाचे रायगड विकास प्राधिकरण कार्यरत आहे. युवराज संभाजीराजे यांच्या अध्यक्षतेखाली कार्यरत या समितीचे काम प्रगतिपथावर आहे. प्राधिकरणाला  विकासकामासाठी ६५० कोटींची मंजुरी मिळालेली असून आतापर्यंत १२० कोटींचा निधी मिळाला आहे. याठिकाणची प्रलंबित कामे गतीने पूर्ण करण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत. राज्यातील कोकण विभागातील रायगड हा एक  महत्त्वाचा जिल्हा असून त्याच्या पश्चिमेस अरबी समुद्राची किनारपट्टी आहे. नवनवीन कंपन्या याठिकाणी येण्यास उत्सुक आहेत. त्यासाठी पुरक मूलभूत सुविधा म्हणजे रस्ता, वीज व पाण्याची पूर्तता प्राधान्याने  करावी लागणार आहे. प्रलंबित प्रकल्पातील अडचणी दूर करण्यासाठी बैठक घेऊन कृती आराखडा बनविला जाईल. शेती हा रायगड जिल्ह्यातील महत्त्वाचा व्यवसाय आहे.  बळीराजाचे जीवन अधिक समृद्ध होण्यासाठी येथील पारंपरिक पिकाच्या उत्पादनाबरोबरच कृषीला पुरक नवनवीन उत्पादनाची निर्मिती करण्याची गरज आहे. त्यासाठी आवश्यक माहिती, तंत्रज्ञान व पीक पाणी पुरविण्यासाठी योजना राबविल्या जातील. शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत जाण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. मत्स्य व्यवसायाला चालना मिळण्यासाठी  जेटी उभारण्यापासून ते सुरक्षित मासेमारी करण्यापर्यंत प्रस्तावित प्रकल्पाचा पाठपुरावा  केला जाईल.

- रायगड जिल्ह्याला इतिहासाबरोबरच निसर्गाचे मोठे वरदान लाभले आहे. पुरातन ऐतिहासिक स्थळे,  अलिबाग, वरसोली, काशीद, श्रीवर्धन, मांडवा या ठिकाणी आकर्षक समुद्रकिनारे लाभले आहेत.- आवश्यक सुविधांची उभारणी करावी लागेल. लोकप्रतिनिधी आणि स्थानिक नगरपालिका, ग्रामपंचायतींशी समन्वय साधून उपलब्धता केली जाईल.- पश्चिम घाटातील अप्रतिम ठिकाणे  जिल्ह्यात आहेत. मुरुड जंजिरा किल्ला, महाड आणि पाली स्थित अष्टविनायक मंदिरे तसेच घारापुरी बेटावरील एलिफंटा गुहा या रायगड जिल्ह्याच्या वैभवशाली सांस्कृतिक इतिहासाच्या साक्षी देणारे आहेत. येथे  राज्याच्या कानाकोपऱ्यासह देशविदेशातून ही पर्यटक येत असतात. त्यामुळे त्यांना आवश्यक सुविधा, साधनांची उभारणी केली जाईल. पर्यटन व्यवसायामध्ये वृद्धी झाल्यास स्थानिक रोजगारही वाढेल. व्यापारी, विक्रेत्यांना त्यांचा लाभ होईल, या दृष्टीने जास्तीत जास्त प्रयत्न करण्यावर आपला भर असेल.

डॉ. योगेश म्हसे, जिल्हाधिकारी, रायगड

टॅग्स :RaigadरायगडFortगड