शहरं
Join us  
Trending Stories
1
Anil Ambani : अनिल अंबानी अडचणीत? घरासह इतरही ठिकाणांवर सकाळपासूनच छापे; १७००० कोटींच्या बँक कर्ज घोटाळाप्रकरणी CBI ची कारवाई!
2
'भारत-पाकिस्तान मुद्द्यावर कोणतीही मध्यस्थी स्वीकार्य नाही', परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी नाव न घेता ट्रम्प यांना स्पष्टच सांगितले
3
मुंबईत घडामोडींना वेग, शिवसेना शिंदे गटाच्या मंत्र्यांनी घेतली शरद पवारांची भेट; कारण काय?
4
सरकारची 'उपसमिती' म्हणजे 'जुनेच खुळ', आमच्या मागण्यांचे काय? मनोज जरांगेंचा संतप्त सवाल
5
नागपूर: चालकाला येऊ लागली झोप, स्वतःच कार...; अपघातात कुलगुरू हरेराम त्रिपाठी यांचा पत्नीसह मृत्यू
6
एक ऑर्डर पोहोचवण्यासाठी Myntra आणि Amazon च्या डिलिव्हरी बॉयला किती पैसे मिळतात?
7
मुंबईत घडतेय तरी काय? आता अमित ठाकरेंनी घेतली आशिष शेलारांची भेट; राजकीय वर्तुळात चर्चा
8
"छन छन छन...असा आवाज करत ते...", प्रिया बापटनं सांगितला दादरच्या घरातील थरकाप उडवणारा प्रसंग
9
ठरलं! मेस्सी अर्जेंटिनाचा अख्खा वर्ल्ड चॅम्पियन संघ घेऊन भारतात खेळायला येतोय! कधी अन् कुठं रंगणार सामना?
10
विराट आणि रोहित वनडेतून कधी निवृत्त होणार? राजीव शुक्ला स्पष्टच बोलले...
11
भाद्रपद महिन्यात गौरी, गणपती आणि पितृपक्षही; जाणून घ्या या मराठी महिन्याचे महत्त्व!
12
अखेर लग्नाच्या ३८ वर्षांनंतर गोविंदा आणि सुनीताचा होतोय घटस्फोट? चीचीचे वकील म्हणाले...
13
खिलाडी अन् अनाडी १६ वर्षांनंतर एकत्र येणार, अक्षय कुमार-सैफ अली खानच्या 'हैवान'चं शूट सुरु
14
काजोलच्या 'द ट्रायल' सीझन २ चा दमदार ट्रेलर पाहिलात का? सोनाली कुलकर्णीचीही मुख्य भूमिका
15
विराट-धोनी नव्हे, तर हा आहे जगातला सर्वात श्रीमंत क्रिकेटर; बघा टॉप-5 क्रिकेटर्सची लिस्ट...!
16
उपराष्ट्रपती निवडणूक २०२५: “पवार-ठाकरेंची भूमिका विरोधाभासी, राष्ट्रहितविरोधी”; भाजपाची टीका
17
कर्जाचं ओझं कमी करतेय अनिल अंबानींची कंपनी; आता २००० कोटी रुपयांत विकणार पुणे-सातारा टोल रोड प्रोजेक्ट
18
जगदीप धनखड नेमके आहेत तरी कुठे? ते सध्या काय करतात?; महत्त्वाची माहिती समोर आली, पत्ता लागला!
19
काळाचा घाला...! पाटण्यात भीषण अपघात, ट्रक-ऑटोच्या धडकेत गंगा स्नानासाठी जात असलेल्या ७ महिलांसह ८ जणांचा मृत्यू!
20
रात्रभर नोटा जाळल्या, तरीही पैसे संपले नाहीत; अधीक्षक अभियंता निघाला काळ्या धनाचा कुबेर!

Raigad: पाण्याची चिंता मिटली; १३ धरणे शंभर टक्के भरली, सर्व धरणांत ७४.७६ टक्के पाणीसाठा

By निखिल म्हात्रे | Updated: July 11, 2024 15:04 IST

Raigad News: रविवारी मध्यरात्री व सोमवारी दिवसभर रायगड जिल्ह्यात सरासरी १०८ मिमी पाऊस झाला आहे. हा पाऊस हा प्राधान्याने धरण क्षेत्रात अधिक पडल्याने धरणांतील पाणीसाठा झपाट्याने वाढला आहे. २८ धरणांपैकी १३ धरणे ही शंभर टक्के भरली आहेत.

- निखिल म्हात्रेअलिबाग _ रविवारी मध्यरात्री व सोमवारी दिवसभर रायगड जिल्ह्यात सरासरी १०८ मिमी पाऊस झाला आहे. हा पाऊस हा प्राधान्याने धरण क्षेत्रात अधिक पडल्याने धरणांतील पाणीसाठा झपाट्याने वाढला आहे. २८ धरणांपैकी १३ धरणे ही शंभर टक्के भरली असून, सर्व धरणांत मिळून ७४.७६ टक्के इतका पाणीसाठा झाला आहे. त्यामुळे धरणावर अवलंबून असणाऱ्यांची पाण्याची चिंता मिटली आहे.

तेरा धरणे भरली असून, दोन धरणांत ९० टक्के पाणीसाठा आहे. तेरा धरणांमध्ये ७० टक्क्यांहून कमी पाणीसाठा आहे. रायगड २० दिवसांपासून पावसाला सुरुवात झाली आहे. पावसाने सुरुवात चांगली केली होती. त्यानंतर काही काळ विश्रांती घेतली होती. मात्र, रविवारी मध्यरात्री अलिबाग, मुरुड, म्हसळा, तळा, श्रीवर्धन या तालुक्यांत अतिवृष्टी झाली. ९ जुलैपर्यंत जिल्ह्यात एकूण तीन हजार ८९ मिमी पावसाची नोंद झाली आहे. सरासरी ३५ टक्के पाऊस पडला आहे. धरण क्षेत्रातही पावसाचे प्रमाण चांगले आहे.

शंभर टक्के पाणीसाठारायगड पाटबंधारे विभाग कोलाड यांच्याअंतर्गत २८ लहान धरणे येतात. त्यापैकी तळा तालुक्यातील वावा, सुतारवाडीमधील रोहा, सुधागडमधील कोंडगाव, कवेळे, उन्हेरे, म्हसळामधील पाबरे, संदेरी, महाडमधील वरंध, खिंडवाडी, कोथुर्डे, खैरे, खालापूर भिलवले, पनवेलमधील मोरबे ही तेरा धरणे शंभर टक्के भरली आहेत. मुरुड तालुक्यातील फणसाड ९९ टक्के, पनवेलमधील उसरण ९० टक्के भरले आहे. श्रीवर्धनमधील कुडकी ८३ टक्के, पेणमधील अंबेघर ८० टक्के भरले.

टॅग्स :RaigadरायगडWaterपाणी