शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाजपाला पराभव दिसू लागलाय, प्रचंड मताधिक्यांनी १०० टक्के विजयी होणार”: विशाल पाटील
2
‘मुलीला वडिलांच्या संपत्तीत ५० टक्के अधिकार, हा सरकारचा कायदा’, सुप्रिया सुळेंचा जानकरांना टोला 
3
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
4
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
5
चोरीच्या आरोपाखाली महिलेला दिली थर्ड डिग्री, पोलिसांवर गुन्हा दाखल 
6
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
7
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
8
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
9
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
10
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
11
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
12
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
13
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
14
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
15
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
16
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
17
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
18
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
19
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
20
राहुल आणि सिद्धरामय्या यांचा कार्टून व्हिडिओ; काँग्रेसची जेपी नड्डांसह तीन BJP नेत्यांविरुद्ध तक्रार

रायगडमध्ये मतदारांनी घेतला आखडता हात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2019 12:18 AM

२०१४ च्या लोकसभा निवडणुकीच्या तुलनेमध्ये मतदानाची आकडेवारी तब्बल चार टक्क्यांनी घसरली

अलिबाग : रायगड लोकसभा मतदारसंघामध्ये राजकीय पक्षांनी अतिशय गाजावाजा करून आपापल्या उमेदवारांचा प्रचार केला होता, तर दुसरीकडे निवडणूक विभागानेही मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी जोरदार कँपेनिंग केले होते. मात्र, मतदानाच्या दिवशी मतांचे दान टाकण्यामध्ये मतदारांनी हात आखडता घेतल्याचे चित्र आहे. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीच्या तुलनेमध्ये मतदानाची आकडेवारी तब्बल चार टक्क्यांनी घसरली आहे, त्यामुळे या ट्रेंडचा फायदा कोणाला होणार हे मतपेट्या उघडल्यावर समोर येणार आहे. काही ठिकाणच्या मतदान केंद्रावर उशिरापर्यंत मतदान सुरू होते, त्यामुळे मतदानाची टक्केवारी वाढण्याची शक्यता आहे.सकाळी ७ वाजता मतदानाला सुरुवात झाली. सकाळी मतदानाला येणाऱ्या मतदारांची तुरळक प्रमाणात गर्दी दिसून आली होती. मतदारांमध्ये मतदानासाठी असलेला उत्साह दिसून आला नाही. त्यानंतर हळूहळू उन्हाच्या झळा वाढल्याने मतदान केंद्रावर मतदानासाठी येणाऱ्यांची गर्दी रोडावल्याचे चित्र होते. नेहमीप्रमाणे लांबच लांब रांगा लागलेल्याचे दृश्य नेहमीच निवडणुकीत अनुभवास मिळत होते. या वेळी तसे दिसून आले नाही. मतदारांना राजकीय पक्षांचे कार्यकर्ते घराबाहेर पडून मतदान करण्यासाठी विनंती करत होते. मात्र, बाहेर पडण्याची मानसिकता दिसून येत नव्हती. असे चित्र अलिबाग विधानसभा मतदारसंघातील बहुतांश मतदान केंद्रांवर दिसून आले.रायगड लोकसभा मतदारसंघात निवडणूक : मतदानाची आकडेवारी तब्बल चार टक्क्यांनी घसरलीअलिबागमध्ये दिव्यांगांसाठी रॅम्प नव्हतानिवडणूक विभागाने दिव्यांग, ज्येष्ठ नागरिकांसाठी मतदान केंद्रावर सर्व सुविधा सज्ज ठेवल्याचा केलेला दावा फोल ठरला. अलिबाग तालुक्यातील मतदान केंद्र क्रमांक-२१ वैजाळी-२ येथे दिव्यांगांसाठी रॅम्प उभारण्यात आला नव्हता, त्यामुळे पायºया चढून मतदान केंद्रात जावे लागत होते. त्या ठिकाणी व्हीलचेअर होते. मात्र, तेथील कर्मचाºयांनी मतदारांना ते उपलब्ध करून दिले नाही. पत्रकारांनी ही बाब लक्षात आणून देताच व्हीलचेअर सज्ज केली.केंद्राबाहेर लहान मुलांना सांभाळण्यासाठी आशा सेविकाप्रत्येक मतदान केंद्राबाहेर लहान मुलांना सांभाळण्यासाठी अंगणवाडी कर्मचारी आणि आशा सेविका तत्पर असल्याचे दिसून आले. त्यांच्याकडे लहान मुलांना देऊन मतदार मतदान करण्यासाठी जात होते. पहिल्यांदाच असा प्रयोग करण्यात आल्याने मतदारांनी निवडणूक विभागाच्या या उपक्रमाचे स्वागत केले.मतदान केंद्रावर शुकशुकाटनवगावमधील ग्रामस्थांनी मतदानावर बहिष्कार टाकला होता. येथील मतदान केंद्रांवर दोन हजार ९३२ मतदार संख्या होती. दिवसभरात फक्त १९७ मतदारांनीच आपल्या मतदानाचा हक्क बजावला, त्यामध्ये प्रामुख्याने काही नवमतदारांचा समावेश होता. सकाळपासून दुपारपर्यंत या मतदान केंद्रावर शुकशुकाट दिसून आला. याच मतदान केंद्रांवर नेहमीच ८५ टक्क्यांपर्यंत मतदान झाल्याची नोंद झाल्याचे तेथील ग्रामस्थांनी सांगितले.कार्यकर्त्यांच्या खाण्या-पिण्याची सोय नाहीमतदारांना मार्गदर्शन करण्यासाठी असलेल्या राजकीय बूथवरही कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण दिसत नव्हते. कार्यकर्त्यांच्या खाण्या-पिण्याची सोय करण्यात आली नव्हती. मतदारांना घराबाहेर काढण्यासाठी त्यांच्याकडून सातत्याने सूचना दिल्या जात होत्या. निवडणूक विभागाने आचारसंहितेची कडक अंमलबजावणी केल्याने कारवाईच्या भीतीपोटी बूथवर उमेदवारांचा प्रचार कटाक्षाने टाळण्यात आला होता. मात्र, रेवस कोळीवाडा येथील बूथवर विवेक पेरेकर (२१ वर्षे) याने बूथ लावला होता. तेथे आघाडीचे उमेदवार सुनील तटकरे यांचा फोटो असलेल्या ६५६ मतदार चिठ्ठी सापडल्या. भरारी पथकातील अधिकारी प्रदीप पगारे यांना सीव्हीजल अ‍ॅपवर ही तक्रार मिळाली होती. त्यांनी पंचनामा करून पोलिसात तक्रार नोंदवली आहे.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019raigad-pcरायगड