शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
2
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
3
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
4
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
5
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
6
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
7
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
8
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
9
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
10
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
11
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
12
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
13
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
14
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
15
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
16
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
17
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
18
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
19
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
20
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले

Raigad: चोरी करण्यासाठी घुसलेल्या चोरट्यांचा चिरनेरच्या युवा गस्ती पथकाकडून फिल्मी स्टाईलने पाठलाग

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2024 23:04 IST

Raigad Crime News: अंधाराचा फायदा घेऊन गुरुवारी पहाटेच्या सुमारास चोरीच्या उद्देशाने गावात घुसलेल्या चोरांचा तैनात करण्यात आलेल्या तरुणांच्या गस्ती पथकाने फिल्मी स्टाईलने १५ किमी अंतरापर्यंत पाठलाग केला.मात्र अंधाराचा फायदा घेऊन सशस्त्र  आलेले चोरटे चारचाकीतुन पसार होण्यात यशस्वी झाले.

- मधुकर ठाकूर उरण - अंधाराचा फायदा घेऊन गुरुवारी पहाटेच्या सुमारास चोरीच्या उद्देशाने गावात घुसलेल्या चोरांचा तैनात करण्यात आलेल्या तरुणांच्या गस्ती पथकाने फिल्मी स्टाईलने १५ किमी अंतरापर्यंत पाठलाग केला.मात्र अंधाराचा फायदा घेऊन सशस्त्र  आलेले चोरटे चारचाकीतुन पसार होण्यात यशस्वी झाले. मात्र पोलिसांसह स्थानिक तरुणांच्या गस्ती पथक तैनात असतानाही चिरनेरमध्ये घुसलेल्या चोरट्यांमुळे भीतीचे वातावरण पसरले आहे.

मागील काही दिवसांपासून उरण परिसरातील ग्रामीण भागातील काही गावांमध्ये भुरट्या चोऱ्या, घरफोड्यांचे सत्र सुरू झाले आहे.पोलिसांनाही चोरांना आवर घालण्यात यश आले नाही.यामुळे चिरनेरमध्ये रात्रीच्या वेळी गस्त घालण्यासाठी तरुणांची गस्ती पथके तयार केली आहेत.ही गस्ती पथके रात्रभर गावभर गस्त घालत आहेत.गुरुवारी (१८) पोलिस, युवकांची गस्त सुरू असतानाच पहाटेच्या सुमारास अचानक चिरनेर गावातील बत्तीस गुल झाली.यामुळे अंधाराचा फायदा घेऊन चोरीच्या उद्देशाने चोरटे गावात शिरले.चोरट्यांच्या हालचालींची माहिती मिळताच तरुणांच्या गस्ती पथकाने आपला मोर्चा चोरट्यांकडे वळविला.मात्र चोरट्यांना गस्ती पथकाच्या हालचालींचा अंदाज आला.त्यानंतर चोरट्यांनी अंधाराचा फायदा घेऊन चिरनेर गावातून काढता पाय घेतला.युवक सदस्य असलेल्या गस्ती पथकातील काही निडर तरुणांना एका चारचाकीतुन पनवेलच्या दिशेने चोरटे पसार होत असल्याचे दिसून आल्यानंतर त्यांनी दुचाकीवरून त्यांचा १५ किमी अंतरापर्यंत फिल्मी स्टाईलने पाठलाग केला.मात्र स्पीड ब्रेकरवरुनही भरधाव वेगाने चारचाकी चालवत चोरटे पलायन करण्यात यशस्वी ठरले.

दरम्यान या गंभीर घटनेची दखल घेऊन उध्दव ठाकरे गटाचे उरण तालुकाप्रमुख संतोष ठाकूर,सरपंच भास्कर मोकल, उपसरपंच सचिन घबाडी, तंटामुक्तीचे गाव अध्यक्ष अलंकार परदेशी, ग्रामपंचायतीचे सदस्य समाधान ठाकूर, शिवसेनेचे तेजस ठाकूर तसेच  चिरनेर गावातील अन्य कार्यकर्त्यांनी उरण पोलीस ठाणे गाठले . पोलिस निरीक्षक (गुन्हे) कांबळे यांच्याशी याबाबत चर्चा करून गावकऱ्यांच्या सुरक्षेबाबत ठोस उपाययोजना करावी अशी मागणी चिरनेर गावकऱ्यांच्या वतीने केली.यावेळी रात्रीच्या वेळी गस्त वाढविण्यासाठी पोलिस बळ वाढविण्याचे तसेच गावात रात्री गाव बैठका घेण्यात आश्वासन पोलिसांच्या वतीने देण्यात आले आहे.

टॅग्स :Raigadरायगड