शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या अनुभवाचा राज्याला काय उपयोग? कुंडमाळा पूल दुर्घटनेवरुन राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल
2
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
3
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
4
१०-१५ हजारांत संसाराचा गाडा हाकायचा कसा? राज्यातील शिक्षणसेवकांचा सवाल
5
₹१७०० घेऊन गाझियाबादवरून अमेरिकेला पोहोचले; आज झुकरबर्ग, सुंदर पिचाईंपेक्षाही अधिक आहे सॅलरी
6
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?
7
तेजीसह शेअर बाजाराच्या कामकाजाला सुरुवात, Sensex ८१,१०० च्या वर; Nifty मध्येही तेजी, 'हे' स्टॉक्स वधारले
8
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
9
लॅम्बोर्गिनी चलायी जाने हो...; राम कपूरने घरी आणली लक्झरियस कार, कोटींमध्ये आहे किंमत
10
लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी आम्हाला त्रास का देता? विमानातल्या व्हायरल फोटोशी इन्फ्लुएन्सरकडून छेडछाड, कुटुंबियांचा संताप
11
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
12
आजचा अग्रलेख: मध्य पूर्वेत पुन्हा आगडोंब!
13
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण
14
तुलाच पत्नी बनवेन! तरुणाने मृत प्रेयसीसोबत लग्न करून पूर्ण केलं वचन, नातेवाईक भावूक  
15
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
16
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता
17
इस्रायल आणि इराणचे एकमेकांवरील हल्ले सुरूच, आतापर्यंत दोन्ही देशांचे किती नुकसान? जाणून घ्या
18
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
19
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत अनेक पर्यटक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
20
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू

Raigad: चोरी करण्यासाठी घुसलेल्या चोरट्यांचा चिरनेरच्या युवा गस्ती पथकाकडून फिल्मी स्टाईलने पाठलाग

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2024 23:04 IST

Raigad Crime News: अंधाराचा फायदा घेऊन गुरुवारी पहाटेच्या सुमारास चोरीच्या उद्देशाने गावात घुसलेल्या चोरांचा तैनात करण्यात आलेल्या तरुणांच्या गस्ती पथकाने फिल्मी स्टाईलने १५ किमी अंतरापर्यंत पाठलाग केला.मात्र अंधाराचा फायदा घेऊन सशस्त्र  आलेले चोरटे चारचाकीतुन पसार होण्यात यशस्वी झाले.

- मधुकर ठाकूर उरण - अंधाराचा फायदा घेऊन गुरुवारी पहाटेच्या सुमारास चोरीच्या उद्देशाने गावात घुसलेल्या चोरांचा तैनात करण्यात आलेल्या तरुणांच्या गस्ती पथकाने फिल्मी स्टाईलने १५ किमी अंतरापर्यंत पाठलाग केला.मात्र अंधाराचा फायदा घेऊन सशस्त्र  आलेले चोरटे चारचाकीतुन पसार होण्यात यशस्वी झाले. मात्र पोलिसांसह स्थानिक तरुणांच्या गस्ती पथक तैनात असतानाही चिरनेरमध्ये घुसलेल्या चोरट्यांमुळे भीतीचे वातावरण पसरले आहे.

मागील काही दिवसांपासून उरण परिसरातील ग्रामीण भागातील काही गावांमध्ये भुरट्या चोऱ्या, घरफोड्यांचे सत्र सुरू झाले आहे.पोलिसांनाही चोरांना आवर घालण्यात यश आले नाही.यामुळे चिरनेरमध्ये रात्रीच्या वेळी गस्त घालण्यासाठी तरुणांची गस्ती पथके तयार केली आहेत.ही गस्ती पथके रात्रभर गावभर गस्त घालत आहेत.गुरुवारी (१८) पोलिस, युवकांची गस्त सुरू असतानाच पहाटेच्या सुमारास अचानक चिरनेर गावातील बत्तीस गुल झाली.यामुळे अंधाराचा फायदा घेऊन चोरीच्या उद्देशाने चोरटे गावात शिरले.चोरट्यांच्या हालचालींची माहिती मिळताच तरुणांच्या गस्ती पथकाने आपला मोर्चा चोरट्यांकडे वळविला.मात्र चोरट्यांना गस्ती पथकाच्या हालचालींचा अंदाज आला.त्यानंतर चोरट्यांनी अंधाराचा फायदा घेऊन चिरनेर गावातून काढता पाय घेतला.युवक सदस्य असलेल्या गस्ती पथकातील काही निडर तरुणांना एका चारचाकीतुन पनवेलच्या दिशेने चोरटे पसार होत असल्याचे दिसून आल्यानंतर त्यांनी दुचाकीवरून त्यांचा १५ किमी अंतरापर्यंत फिल्मी स्टाईलने पाठलाग केला.मात्र स्पीड ब्रेकरवरुनही भरधाव वेगाने चारचाकी चालवत चोरटे पलायन करण्यात यशस्वी ठरले.

दरम्यान या गंभीर घटनेची दखल घेऊन उध्दव ठाकरे गटाचे उरण तालुकाप्रमुख संतोष ठाकूर,सरपंच भास्कर मोकल, उपसरपंच सचिन घबाडी, तंटामुक्तीचे गाव अध्यक्ष अलंकार परदेशी, ग्रामपंचायतीचे सदस्य समाधान ठाकूर, शिवसेनेचे तेजस ठाकूर तसेच  चिरनेर गावातील अन्य कार्यकर्त्यांनी उरण पोलीस ठाणे गाठले . पोलिस निरीक्षक (गुन्हे) कांबळे यांच्याशी याबाबत चर्चा करून गावकऱ्यांच्या सुरक्षेबाबत ठोस उपाययोजना करावी अशी मागणी चिरनेर गावकऱ्यांच्या वतीने केली.यावेळी रात्रीच्या वेळी गस्त वाढविण्यासाठी पोलिस बळ वाढविण्याचे तसेच गावात रात्री गाव बैठका घेण्यात आश्वासन पोलिसांच्या वतीने देण्यात आले आहे.

टॅग्स :Raigadरायगड