शहरं
Join us  
Trending Stories
1
गुवाहाटीची खरी कथा मला विचारूनच लिहावी लागेल- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
2
न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनले जोहरान ममदानी, ट्रम्प यांच्या धमक्यांनंतरही मोठा विजय!
3
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
4
अमिताभ बच्चन यांनी विकले २ लक्झरी फ्लॅट्स; ‘बिग बीं’ची प्रॅापर्टीमधून बंपर कमाई, कितीमध्ये झाली ही ‘सुपर डील’?
5
"आम्ही कार्यक्रम वेळेत सुरु केलेला, पण..."; माधुरी दीक्षितच्या उशीरा येण्यामागचं खरं कारण आयोजकांनी सांगितलं
6
२०२६ला डबल धमाका, ७ राशींवर असीम शनि कृपा; उत्पन्नात लक्षणीय वाढ, घर खरेदीचे स्वप्न पूर्ण!
7
“६ महिन्यात ४८ लाख मतदार वाढ, डबल स्टार नाही, डबल मतदारांची यादी हवी”; शरद पवार गटाची मागणी
8
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
9
१३,००० कोटींचे कोकेन प्रकरण: डॉन वीरूच्या मुलाला पकडण्यासाठी १८० देशांची फौज; इंटरपोलची रेड नोटीस जारी
10
पालघरमधील तीन नगरपरिषदा, एका नगरपंचायतीत रणधुमाळी; यंदा कोण मारणार बाजी?
11
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
12
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
13
बदलापुरात युतीत लढाई? तर अंबरनाथमध्ये मविआत तडजोड? निवडणुकांमध्ये चुरशीची लढाई
14
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
15
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
16
रायगडमध्ये १० नगरपरिषदांमध्ये धूम युतीची की आघाडीची..? सर्व राजकीय पक्षांकडून हालचाली
17
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
18
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
19
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
20
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू

Raigad: चोरी करण्यासाठी घुसलेल्या चोरट्यांचा चिरनेरच्या युवा गस्ती पथकाकडून फिल्मी स्टाईलने पाठलाग

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2024 23:04 IST

Raigad Crime News: अंधाराचा फायदा घेऊन गुरुवारी पहाटेच्या सुमारास चोरीच्या उद्देशाने गावात घुसलेल्या चोरांचा तैनात करण्यात आलेल्या तरुणांच्या गस्ती पथकाने फिल्मी स्टाईलने १५ किमी अंतरापर्यंत पाठलाग केला.मात्र अंधाराचा फायदा घेऊन सशस्त्र  आलेले चोरटे चारचाकीतुन पसार होण्यात यशस्वी झाले.

- मधुकर ठाकूर उरण - अंधाराचा फायदा घेऊन गुरुवारी पहाटेच्या सुमारास चोरीच्या उद्देशाने गावात घुसलेल्या चोरांचा तैनात करण्यात आलेल्या तरुणांच्या गस्ती पथकाने फिल्मी स्टाईलने १५ किमी अंतरापर्यंत पाठलाग केला.मात्र अंधाराचा फायदा घेऊन सशस्त्र  आलेले चोरटे चारचाकीतुन पसार होण्यात यशस्वी झाले. मात्र पोलिसांसह स्थानिक तरुणांच्या गस्ती पथक तैनात असतानाही चिरनेरमध्ये घुसलेल्या चोरट्यांमुळे भीतीचे वातावरण पसरले आहे.

मागील काही दिवसांपासून उरण परिसरातील ग्रामीण भागातील काही गावांमध्ये भुरट्या चोऱ्या, घरफोड्यांचे सत्र सुरू झाले आहे.पोलिसांनाही चोरांना आवर घालण्यात यश आले नाही.यामुळे चिरनेरमध्ये रात्रीच्या वेळी गस्त घालण्यासाठी तरुणांची गस्ती पथके तयार केली आहेत.ही गस्ती पथके रात्रभर गावभर गस्त घालत आहेत.गुरुवारी (१८) पोलिस, युवकांची गस्त सुरू असतानाच पहाटेच्या सुमारास अचानक चिरनेर गावातील बत्तीस गुल झाली.यामुळे अंधाराचा फायदा घेऊन चोरीच्या उद्देशाने चोरटे गावात शिरले.चोरट्यांच्या हालचालींची माहिती मिळताच तरुणांच्या गस्ती पथकाने आपला मोर्चा चोरट्यांकडे वळविला.मात्र चोरट्यांना गस्ती पथकाच्या हालचालींचा अंदाज आला.त्यानंतर चोरट्यांनी अंधाराचा फायदा घेऊन चिरनेर गावातून काढता पाय घेतला.युवक सदस्य असलेल्या गस्ती पथकातील काही निडर तरुणांना एका चारचाकीतुन पनवेलच्या दिशेने चोरटे पसार होत असल्याचे दिसून आल्यानंतर त्यांनी दुचाकीवरून त्यांचा १५ किमी अंतरापर्यंत फिल्मी स्टाईलने पाठलाग केला.मात्र स्पीड ब्रेकरवरुनही भरधाव वेगाने चारचाकी चालवत चोरटे पलायन करण्यात यशस्वी ठरले.

दरम्यान या गंभीर घटनेची दखल घेऊन उध्दव ठाकरे गटाचे उरण तालुकाप्रमुख संतोष ठाकूर,सरपंच भास्कर मोकल, उपसरपंच सचिन घबाडी, तंटामुक्तीचे गाव अध्यक्ष अलंकार परदेशी, ग्रामपंचायतीचे सदस्य समाधान ठाकूर, शिवसेनेचे तेजस ठाकूर तसेच  चिरनेर गावातील अन्य कार्यकर्त्यांनी उरण पोलीस ठाणे गाठले . पोलिस निरीक्षक (गुन्हे) कांबळे यांच्याशी याबाबत चर्चा करून गावकऱ्यांच्या सुरक्षेबाबत ठोस उपाययोजना करावी अशी मागणी चिरनेर गावकऱ्यांच्या वतीने केली.यावेळी रात्रीच्या वेळी गस्त वाढविण्यासाठी पोलिस बळ वाढविण्याचे तसेच गावात रात्री गाव बैठका घेण्यात आश्वासन पोलिसांच्या वतीने देण्यात आले आहे.

टॅग्स :Raigadरायगड