शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
2
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
3
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
4
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
5
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
6
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
7
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
8
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
9
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
10
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
11
आयपीएल २०२५ दरम्यान 'या' स्टार फलंदाजावर ४ सामन्यांची बंदी
12
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
13
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
14
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
15
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
16
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
17
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
18
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
19
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
20
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज

रायगडात पावसाची जोरदार बॅटिंग सुरू; हवामान विभागाचा मुसळधार पावसाचा इशारा

By राजेश भोस्तेकर | Updated: June 28, 2024 13:01 IST

पावसामुळे शेतकरी हा सुखावला असला तरी पावसामुळे जनजीवन विस्कळित झाले आहे. 

 राजेश भोस्तेकर, अलिबाग : रायगड जिल्ह्यात पुढील तीन तासात मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. जिल्हा प्रशासनाने नदी, खाडी किनारी गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. शासकीय यंत्रणांनी सतर्क राहण्यास प्रशासनाने सांगितले आहे. शुक्रवारी रात्रीपासूनच जिल्ह्यात मुसळधार पावसाने सुरुवात केली आहे. त्यामुळे शेतकरी हा सुखावला असला तरी पावसामुळे जनजीवन विस्कळित झाले आहे. 

रायगड जिल्ह्यात गेल्या दोन दिवसापासून पावसाने सुरुवात केली आहे. शुक्रवारी रात्रीपासून जिल्ह्यात पावसाच्या जोरदार सरी कोसळत आहेत. सकाळच्या वेळेस ही पावसाने सुरुवात केल्याने नोकरदार वर्गाला पावसाचा फटका बसला आहे. जिल्ह्यातील सखल भागात पावसाचे पाणी साचल्याने पाणीच पाणी रस्त्यावर साचलेले आहे. त्यामुळे चालकांना पाण्यातून वाहने काढावी लागत आहेत. 

पावसाने जिल्ह्यातील जनजीवन विस्कळित झाले आहे. मात्र शेतकरी राजा सुखावला आहे. जिल्ह्यात सुरू झालेल्या पावसाने शेतात पाणी साचले असल्याने एक दोन दिवसात खोळंबलेल्या पेरण्या सुरू होणार आहेत. हवामान विभागाने दिलेल्या इशारा मुळे जिल्हा प्रशासन अलर्ट मोडवर आलेले आहे.

टॅग्स :RaigadरायगडRainपाऊस