शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
2
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
3
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
4
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
5
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
6
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
7
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
8
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
9
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
10
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
11
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
12
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
13
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
14
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
15
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
16
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
17
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
18
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
19
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
20
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
Daily Top 2Weekly Top 5

रायगडात पावसाची जोरदार बॅटिंग सुरू; हवामान विभागाचा मुसळधार पावसाचा इशारा

By राजेश भोस्तेकर | Updated: June 28, 2024 13:01 IST

पावसामुळे शेतकरी हा सुखावला असला तरी पावसामुळे जनजीवन विस्कळित झाले आहे. 

 राजेश भोस्तेकर, अलिबाग : रायगड जिल्ह्यात पुढील तीन तासात मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. जिल्हा प्रशासनाने नदी, खाडी किनारी गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. शासकीय यंत्रणांनी सतर्क राहण्यास प्रशासनाने सांगितले आहे. शुक्रवारी रात्रीपासूनच जिल्ह्यात मुसळधार पावसाने सुरुवात केली आहे. त्यामुळे शेतकरी हा सुखावला असला तरी पावसामुळे जनजीवन विस्कळित झाले आहे. 

रायगड जिल्ह्यात गेल्या दोन दिवसापासून पावसाने सुरुवात केली आहे. शुक्रवारी रात्रीपासून जिल्ह्यात पावसाच्या जोरदार सरी कोसळत आहेत. सकाळच्या वेळेस ही पावसाने सुरुवात केल्याने नोकरदार वर्गाला पावसाचा फटका बसला आहे. जिल्ह्यातील सखल भागात पावसाचे पाणी साचल्याने पाणीच पाणी रस्त्यावर साचलेले आहे. त्यामुळे चालकांना पाण्यातून वाहने काढावी लागत आहेत. 

पावसाने जिल्ह्यातील जनजीवन विस्कळित झाले आहे. मात्र शेतकरी राजा सुखावला आहे. जिल्ह्यात सुरू झालेल्या पावसाने शेतात पाणी साचले असल्याने एक दोन दिवसात खोळंबलेल्या पेरण्या सुरू होणार आहेत. हवामान विभागाने दिलेल्या इशारा मुळे जिल्हा प्रशासन अलर्ट मोडवर आलेले आहे.

टॅग्स :RaigadरायगडRainपाऊस