शहरं
Join us  
Trending Stories
1
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
2
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
3
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
4
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
5
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
6
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
7
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
8
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
9
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
10
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
11
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले
12
Crime: विधवा भावजयीच्या प्रेमात पडला जेठ, लग्नासाठी सतत दबाव; नकार देताच अ‍ॅसिड फेकलं!
13
IND vs SA : सलग दोन सेंच्युरीसह 'या' पठ्ठ्यानं वाढवलं गिल-गंभीर जोडीचं टेन्शन; कारण...
14
आधार कार्ड काढायला घराबाहेर पडले ते परतलेच नाहीत; पेट्रोल पंप मालकाचा २ मुलींसह संशयास्पद मृत्यू
15
Hero: ड्युअल डिस्क ब्रेक्स, मल्टीपल राइडिंग मोड्स आणि बरेच काही; हिरो एक्सट्रीम १२५ आर लॉन्च!
16
Dance Bar Raid: उल्हासनगरातील चांदणी लेडीज सर्व्हिस बारवर पोलिसांची धाड, ९ महिलांसह १५ जणांना अटक
17
अरे देवा! मेट्रो स्टेशन तयार झालं पण नंतर कळालं उंचीच कमी, पुढं जे केलं ते पाहून थक्क व्हाल
18
स्टाँग रूमचे CCTV बंद, मध्यरात्री एका पिकअप व्हॅनची एन्ट्री; RJD च्या आरोपानंतर तपासाचे आदेश
19
कोण आहेत गजाला हाशमी? ज्यांनी अमेरिकेत रचला नवा इतिहास; भारताशी थेट कनेक्शन, जाणून घ्या
20
वीज चमकली की सुरू होतं काउंटडाउन!… काय आहे क्रिकेटच्या मैदानात क्वचित लागू होणारा '30:30 नियम'?

'रायगडमधील खासदार मंत्री झाला तरी मौनीबाबाच'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2019 00:27 IST

प्रकाश आंबेडकर यांची गीतेंवर टीका

माणगाव : कुणबी समाज मोठा आहे, याची मला जाणीव आहे. तसेच येथील खासदार २० वर्षे झाली लोकसभेच्या सभागृहात, सत्तेत आहेत; पण काहीच बोलत नाही मौनीबाबा, असा टोला खा. अनंत गीतेंना अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी माणगाव येथील सभेत लगावला. या वेळी प्रकाश आंबेडकर यांनी भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस या पक्षांवर चौफेर टोलेबाजी केली.वंचित आघाडीच्या उमेदवार सुमन कोळी यांच्या प्रचारसभेचे आयोजन माणगावमध्ये अशोकदादा साबळे विद्यालयात करण्यात आले होते, या वेळी प्रकाश आंबेडकर बोलत होते. ज्या खोती पद्धती नष्ट झाल्या, जो जमिनी कसत होता त्याचे नाव त्यावर लागले पाहिजे. २० वर्षे झाली तरी एकदाही आदेश काढला नाही. ‘जो कसेल त्याची जमीन’ या कायद्यची १९६५ नंतर अंमलबजावणी झाली नाही. काँग्रेस ५० तर युतीच्या सरकारने २० वर्षे सत्ता भोगली, तरी कसेल त्याची जमीन कायद्याची अंमलबजावणी झाली नाही. या वेळी तुम्ही सुमन कोळींना मतदान करून निवडून द्या, मग या कायद्याची अंमलबजावणी करू, असे आश्वासन प्रकाश आंबेडकर यांनी दिले.या निवडणुकीत आता मतदानाला दोन हजार रु पये मिळणार जर हा बाजार मांडायचा असेल तर व्यवस्थित मांडा, घरामध्ये काय कमी आहे. दोन हजारांमध्ये काय होणार? यांनी तर कोेट्यवधी रु पये लुटले आहेत. त्यांचे पैसे आपण लुटले तर पाप होत नाही. हेमंत करकरे, कामटे, साळसकर,ओंबळे हे मुंबई हल्ल्यात अतिरेकी कसाबने हल्ला केल्याने शहीद झाले. तर साध्वी म्हणते करकरे यांना मी शाप दिला म्हणून मेले. भाजप सरकार यावर काहीच बोलत नाही. मोहन भागवत, नरेंद्र मोदी, देवेंद्र फडणवीस हे एकही शब्दांनी बोलत नाहीत. यांच्या मनामध्ये काय आहे? त्यामुळे पोलिसांमध्येसुद्धा चीड निर्माण झाली आहे. औरंगाबाद येथील पोलीस अधिकारी म्हणत होते की, यावेळेस भाजपला मतदान करणार नाही. काँग्रेससुद्धा मोदीच चालवत आहेत. देशभरामध्ये काँग्रेसने इतरांबरोबर युती केली नाही. मोदी हा दहावी नापास डॉक्टर आहे. याच्या आॅपरेशन टेबलवर सोनिया गांधीचे कुटुंब आहे. आॅपरेशन करायला लावले तर जावई आतमध्ये गेले असते, असे प्रकाश आंबेडकर म्हणाले.एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी बाबत काँग्रेस अपप्रचार करीत असते ते जातिवादी, धर्मांध आहेत. काँग्रेसने बदनाम करण्याचा विडा उचलला आहे. काँग्रेसने युती करण्यासाठी माझ्याकडे पाहिली अट घातली की एमआयएम सोबत नको. कारण मुस्लिमांचे नेतृत्व करणारा जर पुढे आला तर आपली मुस्लिमांची व्होट बँक बंद होईल ही काँग्रेसला भीती वाटत आहे. या वेळेस प्रकाश आंबेडकरांनी मुस्लीम समाजालासुद्धा भावनिक आवाहन केले. वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार सुमन कोळी यांना निवडून देण्याचे आवाहन केले.या वेळी जिल्हा भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष दीपक मोरे, जिल्हा सचिव हरिश्चंद्र माळी, भारिप जिल्हा महिला अध्यक्षा मेघा रिकामे आदी बहुजन समाज बांधव उपस्थित होते.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019raigad-pcरायगडAnant Geeteअनंत गीतेPrakash Ambedkarप्रकाश आंबेडकर