शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
2
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
3
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
4
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
5
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
6
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
7
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
8
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
9
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
10
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
11
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
12
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
13
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
14
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
15
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
16
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
17
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
18
'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाचंच होतंय कौतुक, आर माधवनचा जळफळाट? म्हणाला, "तो नव्या घरात..."
19
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
20
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
Daily Top 2Weekly Top 5

Raigad Landslide: रायगड जिल्ह्यावर आभाळ कोसळले; दरडींनी घेतला 60 जणांचा बळी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2021 19:57 IST

Mahad Landslide, Poladpur Landslide: महाड-तळीये गावात दरड काेसळून 49 जणांचा मृत्यू, तर पाेलादपूर मध्ये 11 जणांना मृत्यूने कवटाळले. सकाळी सुरु झालेले बचाव कार्य सायंकाळी सहा वाजता थांबवण्यात आले आहे.

ठळक मुद्देनडीआरएफ, एसडीआरएफ, नाैदाल, काेस्टगार्ड यांची प्रत्येकी दाेन पथक तर स्थानिक पातळीवरील 12 बचाव पथकांचा रेस्क्यू आॅपरेशनमध्ये समावेश हाेता.तब्बल 22 तासांनी मदत मिळाल्याने दरेकरांनी अधिकाऱ्यांना घेतले फैलावर.

आविष्कार देसाई लाेकमत न्यूज नेटवर्करायगड ः महाड तालुक्यातील तळीये गावात गुरुवारी काेसळलेल्या दरडीमध्ये (Mahad Landslide) 49 जणांचा मृत्यू झाला आहे. तर पाेलादपूर येथील पडलेल्या दरडीमध्ये 11 असा एकूण 60 जणांचा बळी गेला आहे. पाेलादपूर येथील किरकाेळ जखमींना महाड, पाेलादपूर, माणगाव आणि एमजीएम येथील रुग्णालयात दाखल केले आहे. (Landslide in Raigad district, 60 died.)

सकाळी सुरु झालेले बचाव कार्य सायंकाळी सहा वाजता थांबवण्यात आले आहे. बचाव पथक, पाेलिस यंत्रणा आणि डाॅक्टर्स यांनी बचाव कार्य संपले असल्याचे सांगितले आहे, ढिगऱ्या खाली काेणी अडकले आहे का याची खात्री पुन्हा एकदा करण्यासाठी शनिवारी बचाव कार्य हाती घेण्यात येणार अशी माहिती जिल्हाधिकारी निधी चाैधरी यांनी लाेकमतशी बाेलताना दिली.

तळीये हे गाव दरड प्रवण गावामध्ये नव्हते, जी गावे आहेत त्या गावातील नागरिकांना आधीच सर्तकतेच्या सुचना दिल्या हाेत्या, असेही त्यांनी स्पष्ट केले.गेल्या काही दिवसांपासून अतिवृष्टीने रायगड जिल्ह्याला चांगलेच झाेडपले आहे. अतिवृष्टीने आलेल्या पुराचा सर्वाधिक फटका हा महाड तालुक्याला बसला आहे. गुरुवारी महाड आणि पाेलादपूर तालुक्यात दरडी पडण्याच्या घटना घडल्या. महाड तालुक्यातील तळीये या गावात गुरुवारी सांयकाळी चार वाजण्याचा सुमारास दरड काेसळली हाेती. याची माहिती प्रशासना सायंकाळी साडे सहा वाजण्याच्या सुमारास मिळाली. त्यानंतर बचाव कार्य हाती घेण्यात आले. परंतू पावसाचा जाेर, पुराचे पाणी, मार्गात दरडी पडल्याने घटनास्थळी पाेचण्यात अडचणी येत हाेत्या. पाचाड मार्गेही दरड काेसळली हाेती. त्यामुळे अडथळा निर्माण झाला हाेता.

रात्री हेलीकाॅप्टरच्या सहायाने घटनास्थळी बचाव पथकाला उतरवण्याचा प्रयत्न करण्यात आला मात्र अतिवृष्टीमुळे ते शक्य झाले नाही. त्यानंतर शु्क्रवारी सकाळी 11 वाजता मदत आणि बचाव कार्याला सुरुवात झाली. दुपारी तीन वाजेपर्यंत 38 मृतदेह ढिगाऱ्याखालून काढण्यात बचाव पथकाला यश आले. त्यानंतर सायंकाळी साडेपाच वाजता 49 मृतदेह बाहेर काढण्यात आले हाेते. सायंकाळी सहा वाजता खात्री झाल्यावर बचाव कार्य थांबवण्यात आले.दरम्यान, पाेलादपूर येथील केवनाळे येथे चार घरांवर दरड काेसळली. त्यामध्ये सहा जणांचा मृत्यू झाला आहे, तर सुतारवाडी येथेही दरड पडल्याने पाच असा एकूण 11 जणांचा मृत्यू झाला आहे. दाेन्ही गावातील 13 जखमींना महाड  पाेलादपूर, माणगाव आणि एमजीएम येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

  • एनडीआरएफ, एसडीआरएफ, नाैदाल, काेस्टगार्ड यांची प्रत्येकी दाेन पथक तर स्थानिक पातळीवरील 12 बचाव पथकांचा रेस्क्यू आॅपरेशनमध्ये समावेश हाेता.
  •  
  • घटनास्थळी पालकमंत्री आदिती तटकरे, विराेधी पक्ष नेते प्रविण दरेकर, भाजपा नेते गिरीश महाजन, स्थानिक आमदार भरत गाेगावले यांनी भेट दिली.
  •  
  • तब्बल 22 तासांनी मदत मिळाल्याने दरेकरांनी अधिकाऱ्यांना घेतले फैलावर
  •  
  • गुरुवारी सायंकाळी दरड काेसळली आणि मदत शुक्रवारी सुरु करण्यात आली. या कालावधीत प्रशासन का पाेचले नाही असा सवाल दरेकर यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना विचारला. यावेळी त्यांनी पालकमंत्री आदिती तटकरे यांच्या समाेरच अधिकाऱ्यांची झाडाझडती घेत नाराजी व्यक्त केली.
  •  
  • पुराचे पाणी आणि मार्गावर पडलेल्या दरडीमुळे घटनास्थळी पाेचण्यात उशिर झाला. पाचाड मार्गे जाण्याचा प्रयत्न केला मात्र तेथे ही दरडी पडल्याने रस्ता बंद हाेता. असे उपस्थित अधिकाऱ्यांनी सांगितेल, मात्र प्रशासनाने ठरवले असते तर चालत सुध्दा येथे पाेचता आले असते. असेही दरेकर यांनी स्पष्ट केले.
  •  
  • जिल्हा प्रशासनाने बचावासाठी लागणारे साहित्य, अन्न पाकीटे, पाणी यांची व्यवस्था डाॅ.बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात केली आहे.
टॅग्स :landslidesभूस्खलनRaigadरायगडRainपाऊस