शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

नवी मुंबईसह रायगडला फटका; वीजपुरवठा खंडित झाल्याने कामे ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2020 01:06 IST

रायगड जिल्ह्यात तीन तास बत्ती गुल; नागरिक हैराण

रायगड : महापारेषणच्या इतिहासामध्ये प्रथमच वीज पुरवठा खंडीत झाला. रायगड जिल्ह्यात सुमारे तीन तास वीज गायब झाली होती. २४० मेगावॉट वीजेच्या तुडवड्याने तब्बल तीन लाख ४५ हजार वीज ग्राहक प्रभावीत झाले होते.त्यानंतर वीज पुरवठा सुरळीत झाल्याने सर्वांनीच सुटकेचा निश्वास टाकला. मुंबई, ठाणे, नवीमुंबईमध्येही वीज पुरवठा खंडीत झाला होता.

विविध सरकारी रुग्णालये आणि खासगी रुग्णालयांमध्ये उपलब्ध असलेल्या जनरेटच्या माध्यमातून वीज पुरवठा सुरु राहील्याने या ठिकाणी विशेष अडचण आली नाही. मात्र, जिल्ह्यातील अन्य ग्राहकांना त्यांचा चांगलाच त्रास झाला. महापारेषणच्या ४०० केव्ही कळवा पडघा जीआयएस केंद्रात सर्किट-१ मध्ये देखभाल दुरुस्तीचे काम सुरु होते. त्यामुळे त्याचा अतिरीक्त भार हा सर्किट -२ वर होता. मात्र सर्किट -२ मध्ये अचानक बिघाड झाल्याने वीज पुरवठा खंडीत झाल्याचे ऊर्जा मंत्र्यांनी स्पष्ट केले आहे.

सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास रायगड जिल्ह्यातील वीज पुरवठा खंडीत झाला होता. अचानक वीज गायब झाल्याने सुरुवातीला काहीच कळले नाही. त्यानंतर वीज वितरण कंपनीच्या कार्यालयातील फोन खणखणत होते. वीज का गेली आहे याबाबतचा संदेश संबंधीत कंपनीने ग्राहकांच्या मोबाईलवर पाठवल्यावर खरे कारण समजू शकले. त्यानंतर तब्बल तीन तासांनी वीज पुरवठा सुरु झाला.विजेच्या लपंडावामुळे नवी मुंबईकर हैराणदिवसभर सुरू असलेल्या विजेच्या लपंडावामुळे नवी मुंबईकर ही हैराण झाले. अचानक वीज गेल्यामुळे रूग्णांचीही गैरसोय झाली. बेलापूर परिसरात पहाटे तीन ते सायंकाळपर्यंत विजेचा लपंडाव सुरूच होता.

सीबीडी, बेलापूर परिसरात पहाटे तीन वाजता विद्युत पुरवठा खंडीत झाला. नागरिक व लोकप्रतिनिधींनी वारंवार महावितरण कार्यालय व अधिकारी, कर्मचा-यांशी संपर्क केल्यानंतर ही व्यवस्थित माहिती दिली जात नव्हती. पहाटे सात वाजता वीज आली. पुन्हा साडेदहा च्या दरम्यान ठाणे, नवी मुंबई, मुंबई परिसरातील वीजपुरवठा खंडीत झाला. अचानक वीज गेल्यामुळे रूग्णांचीही गैरसोय झाली. एक्स रे व इतर तपासण्या वेळेत करता आल्या नाहीत. घरीच उपचार सुरू असलेल्या कोरोना रूग्णांचे प्रचंड हाल झाले. दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास वीजपुरवठा सुरू झाला. बेलापूर सेक्टर २० व इतर ठिकाणी दुपारी तीन वाजता पुन्हा वीज गेली. सायंकाळी साडेसातवाजता वीज आली. नागरिकांनी महावितरण शी संपर्क साधल्यावरही योग्य माहिती मिळत नसल्याने नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

टॅग्स :electricityवीज