शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझ्या नादी लागू नका, पुराव्यासह फाईल्स उघडू..."; भाजपात प्रवेश करताच शिंदेसेनेच्या नेत्याला इशारा
2
"मुंबईत जो येईल त्याचं स्वागत करू..."; निशिकांत दुबेंबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
3
रॉयल एनफिल्डने चीनचे रेअर अर्थ मटेरिअल टाळले! नवीन धातू वापरला, ऑटो कंपन्या चकीत झाल्या...
4
AI घेणार तुमच्या नोकरीची जागा? गुंतवणूकदार विनोद खोसला यांचा इशारा, म्हणाले यातून वाचायचं असेल तर..
5
‘झुकेगा नही’! ट्रम्प यांची धमकी, पण सरकार ठाम; अमेरिकेला भारताचं स्वतंत्र धोरण का खुपतंय?
6
मराठी अभिनेत्याचं साउथ इंडस्ट्रीत काम करण्याचं होतं स्वप्न, लॉकडाऊननंतर हैदराबाद गाठलं अन्...
7
चहा करताना 'ही' छोटीशी चूक कराल तर आयुष्याला मुकाल, योग्य पद्धत कोणती एकदा बघाच
8
ऑपरेशन महादेवमध्ये मारले गेलेले सगळे दहशतवादी पाकिस्तानीच! 'त्या' एका पुराव्याने समोर आली कुंडली
9
IND vs ENG: ३५ धावा की ४ गडी... पाचवी कसोटी निर्णायक वळणावर, 'हा' घटक भारतासाठी ठरेल 'गेमचेंजर'
10
ट्रम्प यांच्यासोबतची मैत्री तुटल्यानंतर मस्क मोठ्या अडचणीत; टेस्लाला द्यावे लागणार तब्बल २ हजार कोटी
11
ट्रम्पच्या जिगरी दोस्तावर पाकिस्तान का चिडला? पोस्ट लिहीत व्यक्त केला राग! शाहबाज शरीफ म्हणाले... 
12
"सचिन माझ्या मुलाचा बाप...", महिलेने दाखवला DNA रिपोर्ट; राजा रघुवंशीच्या घरात भलताच वाद
13
हृदयस्पर्शी! बाळासाठी वडील झाले वासुदेव, पुराच्या पाण्यातून काढली वाट, भावुक करणारा Video
14
शिवसेनेचा बाप मीच आहे, भाजपा आमदार परिणय फुकेंचं वादग्रस्त विधान; शिंदेसेना संतप्त
15
Shravan 2025: शास्त्रानुसार, संसारी व्यक्तीने रुद्राक्षाची जपमाळ ओढावी, पण गळ्यात घालू नये!
16
रक्षाबंधन नेमके कधी आहे? शुभ मुहूर्त कोणता? पाहा, महत्त्व, महात्म्य अन् काही मान्यता
17
नोकरीसाठी विदेशात जायचंय तर पत्नीला भारतात ठेवा, अटीविरुद्ध ‘तो’ सुप्रीम कोर्टात
18
७१% चं रेकॉर्डब्रेकिंग इनक्रिमेंट! 'हे' आहेत भारतातील IT क्षेत्रातील सर्वाधिक कमाई करणारे CEO; मिळणार १५४ कोटी सॅलरी
19
४४ भूखंड, एक किलो सोने, २ किलो चांदी...! आरटीओ अधिकाऱ्याची संपत्ती एवढी की पाहून अधिकारी थक्क झाले...
20
वय वर्ष ८०, तरीही फिट! दिलीप प्रभावळकरांना स्वत:च्या फिटनेसचं आश्चर्य, म्हणाले- "एकदा ५ कुत्रे माझ्या लागले तेव्हा..."

मेल्यावरही फरफट, झोळीतून नेला देह, रस्ताच नसल्याने चार किमी पायपीट, पेणमधील विदारक चित्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2024 07:16 IST

Raigad News: विधानसभा निवडणुकांच्या रणधुमाळीत मतदारराजाला पुढील पाच वर्षांची रंगीत स्वप्ने दाखविण्यात राजकीय पक्ष मश्गुल असताना सर्वांच्या डोळ्यांत झणझणीत अंजन घालेल असे विदारक चित्र पेण तालुक्यात समोर आले आहे.

- नरेश पवारवडखळ - विधानसभा निवडणुकांच्या रणधुमाळीत मतदारराजाला पुढील पाच वर्षांची रंगीत स्वप्ने दाखविण्यात राजकीय पक्ष मश्गुल असताना सर्वांच्या डोळ्यांत झणझणीत अंजन घालेल असे विदारक चित्र पेण तालुक्यात समोर आले आहे. एका अभागी आदिवासी महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तिचा मृतदेह घरापर्यंत नेण्यासाठी मात्र चार किमीची पायपीट करावी लागली. केवळ पक्का रस्ता नसल्याने ही वेळ आदिवासी कुटुंबावर आली. रस्ता तयार करण्यासाठी ठेकेदाराला दिलेले साडेसात कोटी कोणाच्या खिशात गेले, हा प्रश्न आता ऐरणीवर आला आहे.

पेण तालुक्यातील खवसा ही छोटी आदिवासी वाडी. या वाडीतील आंबी कडू (४२) ही महिला आजारी होती. तिला उपचारासाठी अलिबाग जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, गुरुवारी तिचा मृत्यू झाला. आंबी कडू यांचा मृतदेह रुग्णवाहितेकून पेणपर्यंत आणण्यात आला. शहरापासून पाच किमी अंतरावर बोरगाव ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या खवसा आदिवासी वाडीपर्यंत जायला पक्का रस्ताच नाही. त्यामुळे कोणतीही रुग्णवाहिका अथवा खासगी वाहन उपलब्ध झाली नाही. अखेरीस ग्रामस्थांनी झोळी करून मृतदेह खवसावाडीत नेला. याबाबत आदिवासी समाजात संताप व्यक्त होत आहे. या वाडीपर्यंत रस्ता करण्यासाठी दहा महिन्यांपूर्वी ७ कोटी ६० लाखांचे काम ठेकेदाराला देण्यात आले आहे. मात्र, त्याकडे ठेकेदाराने साफ दुर्लक्ष केले. 

मागील वर्षी ठेकेदाराने रस्त्यासाठी थोडा भराव टाकला होता. मात्र पावसाळ्यात तो धुवून गेला. रस्ताच नसल्याने जीवनावश्यक वस्तूंसाठी पाच किलोमीटर पायपीट करावी लागते. - काळ्या पद्मा कडू, ग्रामस्थ, खवसावाडी, पेण

गेल्या दोन वर्षापासून येथील खवसावाडी, काजूचीवाडी, केळीचीवाडी, तांबडी आणि उंबरमाळवाडी या पाचही आदिवासी वाड्यांच्या मूलभूत सुविधांसाठी सातत्याने पाठपुरावा करीत आहे. या वाड्यांच्या रस्त्यांसाठी १ जानेवारी रोजी पुन्हा सिद्धिविनायक कन्स्ट्रक्शन या ठेकेदाराने दहा महिने उलटूनही या रस्त्याचे काम सुरू केलेले नाही. - संतोष ठाकूर, अध्यक्ष, ग्राम संवर्धन सामाजिक संस्था 

१८४ आदिवासी वाड्या 'नॉट रिचेबल' रायगड जिल्ह्यात तीनशेच्या आसपास वाड्या-वस्त्या आहेत. यातील १८४ वाड्यांवर आजही पक्के रस्ते नाहीत. जानेवारीमध्ये जिल्हा प्रशासनाने केलेल्या एका सर्वेक्षणातच हे उघड झाले आहे. यातील बहुतांश ठिकाणी रस्ते नसल्याने वाहने जात नाहीत. त्यामुळे तेथील आदिवासी बांधवांना झोळीतून रुग्णांची वाहतूक करावी लागत आहे

टॅग्स :RaigadरायगडMaharashtraमहाराष्ट्र