शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: नगरपरिषदेत चुरशीची लढाई: ठाकरेंच्या शिवसेनेने खाते उघडले, काँग्रेसही आघाडीवर; पहा लेटेस्ट अपडेट
2
Akkalkot Nagar Parishad Election Result 2025: फटाक्यांची आतषबाजी, विजयाची घोषणा; मतमोजणीआधीच भाजपा कार्यकर्त्यांचा जल्लोष सुरू
3
Nagar Parishad Election Result: 'या' तीन नगर परिषदा भाजपने जिंकल्या! निकालाआधीच उधळला गुलाल
4
घर खरेदीचे स्वप्न होणार साकार! 'ही' बँक देतेय स्वस्त होम लोन; ५० लाखांच्या कर्जासाठी किती हवी सॅलरी?
5
नात्याला काळीमा! विमा पैशांसाठी पोटच्या पोरांनीच रचला बापाच्या हत्येचा कट; 'असा' झाला पर्दाफाश
6
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
7
Nora Fatehi : "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती?
8
घर घेणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर? पगार वाढला, पण घर खरेदी का कठीण झाली...
9
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
10
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
11
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
12
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
13
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
14
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
15
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
16
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
17
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
18
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
19
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
20
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

Raigad: मुसळधार पावसामुळे उरणमधील अनेक रस्ते पाण्याखाली,अनेक गावात, घरात पावसाचे पाणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2023 11:40 IST

Raigad Rain Update: मागील पाच सहा दिवसांपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे चिरनेरला पुराच्या पाण्याने वेढले असुन पुरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे.पावसाचे पाणी गावातील अनेक नागरिकांच्या घरात शिरले आहे.

- मधुकर ठाकूरउरण -  मागील पाच सहा दिवसांपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे चिरनेरला पुराच्या पाण्याने वेढले असुन पुरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे.पावसाचे पाणी गावातील अनेक नागरिकांच्या घरात शिरले आहे. उरण परिसरात मागील पाच -सहा दिवसांपासून पावसाने थैमान घातले आहे.कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे विंधणे-दिघोडे,वशेणी-दिघाटी-केळवणे, नवघर फाटा- जेएनपीए वसाहत,केगाव-विनायक, कोप्रोली-खारपाडा, कंठवली - वेश्वी,जासई -गव्हाणफाटा  आदी रस्ते जलमय झाले आहेत. परिणामी या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे.

चिरनेर गावात पाणी शिरल्याने गावाला पुराचा वेढा पडला आहे.सुमारे ३५०-४०० घरात पुराचे पाणी शिरल्याने रहिवाशांना रात्र जागुन काढावी लागली आहे. उरण शहरातील कुंभारवाडा , इंदिरा गांधी ग्रामीण रुग्णालय, गणपती चौक, पालवी,आपला बाजार परिसरातील रस्ते पाण्याखाली गेले आहेत.

तालुक्यातील नवघर,पागोटे, जेएनपीए कामगार वसाहत,करळ-सोनारी, जसखार,नागाव,म्हातवली, केगाव,भेंडखळ,मोठीजुई आदी अनेक गावात पावसाचे पाणी शिरले आहे. अनेक रस्ते पाण्याखाली गेल्यामुळे उरण परिसरातील अनेक कंटेनर यार्डही पाण्याखाली गेले आहेत. कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे रस्त्यावर साचलेल्या पाण्यामुळे जेएनपीए बंदराकडे ये-जा करणाऱ्या कंटेनर मालाच्या वाहतूकीवरही विपरीत परिणाम झाला आहे.कंटेनर मालाची वाहतूक मंदावली असल्याची माहिती उरण वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर भाटे यांनी दिली.

चाकरमान्यांचे मोठ्या प्रमाणात हाल झाले आहेत. मुसळधार पावसामुळे मात्र उरण परिसरातील नागरिकांचे जनजीवन पार विस्कळीत झाले आहे. उरण परिसरातील शाळा महाविद्यालयेही बंद ठेवण्यात आली आहेत.अनेक ठिकाणच्या गावातील मंगळवारी रात्रीपासून बत्ती गुल झाली आहे.बुधवारी सकाळपर्यंत तरी वीजेचा थांगपत्ता नाही.त्यामुळे नागरिकांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय झाली आहे.

उरण तालुक्यात मंगळवारपासुन बुधवारी  सकाळपर्यंत अवघ्या २४ तासात १६५ मिमी  पावसाची नोंद झाली आहे. चिरनेर,जासई, जसखार,कंठवली,वैश्विक,विंधणे आदी गावातील अनेक घरात पावसाच्या पुराचे पाणी शिरले आहे. काही मार्गावरील रस्ते पाण्याखाली गेले आहेत. त्यामुळे धोकादायक ठरू पाहाणारे रस्ते तुर्तास वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत.पावसाचा जोर वाढत चालला आहे. त्यामुळे पुरसदृश्य गावातील नागरिकांच्या नुकसानीचा आढावा घेऊन पंचनामे करण्यासाठी मंडळ अधिकारी,तलाठी, कोतवाल , ग्रामसेवक तैनात करण्यात आले आहेत.सद्यस्थितीत वित्तहानी वगळता कुठेही जीवितहानी झालेली नाही.पुरसदृश स्थीतीकडे प्रशासन  बारकाईने लक्ष ठेवून असल्याची माहिती उरण तहसीलदार उध्दव कदम  यांनी दिली.

टॅग्स :RainपाऊसRaigadरायगड