शहरं
Join us  
Trending Stories
1
यवत हिंसाचारात कोणाचं किती नुकसान, सध्याची परिस्थिती कशी? जाणून घ्या ताजी अपडेट्स!
2
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
3
IND vs ENG : सिराजसह प्रसिद्ध कृष्णानं मारला 'चौकार'! यजमान इंग्लंडचा पहिला डाव अल्प आघाडीसह संपला
4
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
5
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
6
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
7
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
8
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
9
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
10
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
11
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
12
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
13
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
14
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
15
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
16
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
17
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
18
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
19
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
20
IND vs ENG : आता कसं वाटतंय...! डकेटचा वचपा काढल्यावर आकाशदीपनं त्याच्या खांद्यावर हात टाकला अन्... (VIDEO)

रायगड जिल्ह्याचा निकाल ८६.८७ टक्के

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2018 01:23 IST

राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या बारावीच्या परीक्षेत रायगड जिल्ह्यातील ८६.८७ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत

अलिबाग : राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या बारावीच्या परीक्षेत रायगड जिल्ह्यातील ८६.८७ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. बारावीच्या परीक्षेला ३२ हजार ९२९ विद्यार्थी बसले होते. पैकी २७ हजार ६५७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यंदाही बारावीच्या परीक्षेत मुलींनी बाजी मारली आहे. ९२.२६ टक्के मुली तर ८२.१५ टक्के मुले उत्तीर्ण झाले आहेत.राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दुपारी एक वाजता आॅनलाइन निकाल जाहीर केला. परंतु इंटरनेट वापरणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्याने इंटरनेटचा वेग मात्र घसरला होता.परिणामी निकाल मिळण्यासाठी विद्यार्थ्यांना उशीर होत होता. त्यामुळे विद्यार्थ्यांची चांगलीच धाकधूक वाढल्याचे दिसून आले.धीम्या इंटरनेट गतीचा फटका रायगड जिल्ह्याच्या माध्यमिक विभागाला देखील बसला. त्यांच्या कार्यालयातीलही फोन सातत्याने खणखणत होते, मात्रत्यांच्याकडेही माहिती उपलब्ध नसल्याने खोळंबा होत होता. दुपारी ४ वाजता शिक्षण विभागाने अधिकृत निकालाबाबतची माहिती जाहीर केली.बारावी परीक्षेत जिल्ह्यातील शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागात देखील मुलींचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण अधिक अधिक आहे. रायगड जिल्ह्यातील ग्रामीण क्षेत्रातील तळा तालुक्याने ९५.५७ टक्के उत्तीर्ण प्रमाण साध्य करुन जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळविला आहे.सिद्धार्थ पेटारे यास गणितात १०० पैकी १००अलिबाग : तालुक्यातील आरसीएफ स्कूलचा विद्यार्थी सिद्धार्थ मंगेश पेटारे याने ९३.८६ टक्के गुण मिळवून तो शाळेत पहिला आला आहे. गणित विषयामध्ये १00 पैकी १00 गुण मिळवून त्याने सुवर्ण पदकावर शिक्कामोर्तब केले आहे. त्याचे सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.नांदगाव कनिष्ठ महाविद्यालयाचानिकाल ६८ टक्केमुरु ड जंजिरा : श्री छत्रपती शिवाजी नूतन विद्यालय कनिष्ठ महाविद्यालयाच्या कला शाखेसाठी एकंदर ८८ विद्यार्थी परीक्षेसाठी बसले होते.त्यापैकी ६0 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून या शाळेचा निकाल ६८.१८ टक्के लागला आहे. या विद्यालयामधून समीक्षा दत्तात्रेय नाकती हिने ६७.८४ टक्के मिळून प्रथम, मनस्वी विनोद राऊत हिने ६५.२३ टक्के गुण मिळवून द्वितीय तर तेजल गोपाळ गुंड हिला ६३.५३ टक्के गुण मिळवून तृतीय आली आहे. या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अध्यक्ष फैरोज घलटे व मुख्याध्यापक चिंतामणी जोशी व संचालक मंडळ यांनी अभिनंदन केले आहे.पाली विज्ञान शाखेचा निकाल ९६.२३ टक्केपाली : पाली येथील वडेर हायस्कूल कनिष्ठ महाविद्यालयाच्या विज्ञान शाखेचा निकाल ९६.२३ टक्के लागला आहे. एकूण १७९ विद्यार्थ्यांपैकी ५ विशेष प्रावीण्य, ५० प्रथम श्रेणी, १२२ द्वितीय श्रेणी तर २ उत्तीर्ण श्रेणीत यशस्वी झाले आहेत. कला शाखेचा निकाल ६४.३७ टक्के लागला असून एकूण ७४ विद्यार्थ्यांपैकी एक विशेष गुणवत्ता, ६ प्रथम श्रेणी,६० द्वितीय श्रेणी, तर ७ उत्तीर्ण श्रेणीत यशस्वी झाले आहेत. तीनही शाखांमधून ४७४ उत्तीर्ण झाले. तीनही शाखांचा एकूण निकाल ८६.५७ टक्के लागला आहे.नवयुग ज्यु. कॉलेजची उज्ज्वल यशाची परंपरा कायममहाड : नवयुग विद्यापीठ ट्रस्टच्या नवयुग ज्युनियर कॉलेजचा वेदांत जोशी ८३.५९ टक्के गुण मिळवून नवयुगमधून प्रथम आला आहे. कॉलेजच्या वाणिज्य शाखेचा निकाल ९२.५९ टक्के ,शास्त्र विभागाचा निकाल ८५.५७ टक्के लागला आहे. सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे संस्थेचे संस्थापक अ‍ॅड. विजयसिंह जाधवराव, अध्यक्ष अ‍ॅड. रणजितसिंह जाधवराव, कार्यकारी विश्वस्त विजयानंदा जाधवराव, मुख्य कार्यकारी अधिकारी संग्रामसिंह जाधवराव, मुख्याध्यापक मनोहर पाटील तसेच शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.विज्ञान विभागाचानिकाल ९५.३९ टक्के१बारावी विज्ञान विभागाचा निकाल हा सर्वाधिक ९५.३९ टक्के लागला आहे. १० हजार ७९७ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. पैकी १० हजार २९९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. त्यात ६९९ विद्यार्थ्यांना विशेष श्रेणी, तीन हजार २२५ विद्यार्थ्यांना प्रथम श्रेणी, पाच हजार ९३९ विद्यार्थ्यांना द्वितीय श्रेणी तर ४३६ विद्यार्थ्यांना उत्तीर्ण श्रेणी प्राप्त झाली आहे.कला शाखेचानिकाल ७१.४४ टक्के२कला शाखेत आठ हजार २२ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती, त्यातील पाच हजार ७३१ म्हणजे ७१.४४ विद्यार्थी पास झाले. ६९ विद्यार्थ्यांना विशेष श्रेणी, ८६३ विद्यार्थ्यांना प्रथम श्रेणी, तीन हजार ९३५ विद्यार्थ्यांना द्वितीय श्रेणी तर ८६४ विद्यार्थ्यांना उत्तीर्ण श्रेणी प्राप्त झाली आहे.वाणिज्य शाखेचानिकाल ८९.७५ टक्के३वाणिज्य शाखेतून ११ हजार ६४६ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. पैकी ८९.७५ टक्के म्हणजे १० हजार ४५२ विद्यार्थी यशस्वी झाले आहेत. ७१२ विद्यार्थ्यांना विशेष श्रेणी, तीन हजार १६५ विद्यार्थ्यांना प्रथम श्रेणी, पाच हजार ५८७ विद्यार्थ्यांना द्वितीय श्रेणी तर ९८८ विद्यार्थ्यांना उत्तीर्ण श्रेणी प्राप्त झाली आहे.कौशल्य विकास शाखेचा निकाल ८४.६३ टक्के४कौशल्य विकास(व्होकेशनल) शाखेतून ७८७ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. पैकी ८४.६३ टक्के म्हणजे ६६६ विद्यार्थी पास झाले. १९ विद्यार्थ्यांना विशेष श्रेणी, २४२ विद्यार्थी प्रथम श्रेणी, ३८८ विद्यार्थी द्वितीय श्रेणी तर १७ विद्यार्थ्यांना उत्तीर्ण श्रेणी प्राप्त झाली.