शहरं
Join us  
Trending Stories
1
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सात जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील भाविकांचा समावेश
2
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
3
इस्रायलचा इराणवर 'वार'! तेहरानमधील संरक्षण मंत्रालयाची इमारत, अणु मुख्यालय उद्ध्वस्त
4
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
5
"मी एकावेळी ४-४ सिनेमे केले नाही...", दीपिकाच्या ८ तास शिफ्ट मागणीवर काजोलची प्रतिक्रिया
6
Maharashtra Govt: महावितरणची सौरऊर्जेत ३० हजार कोटींची गुंतवणूक!
7
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
8
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
9
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
10
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
11
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप
12
Ahmedabad Plane Crash: चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन, मृतांची संख्या २७०
13
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
14
अग्रलेख: ‘ती’च्यावर गर्भाशय काढण्याची वेळ का येते?
15
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
16
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन
17
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
18
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
19
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
20
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू

‘निसर्ग’च्या फटक्यानंतर सावरतोय रायगड जिल्हा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2020 00:02 IST

प्रशासनाचे काम सुरू : वादळामुळे अलिबाग, मुरूड, श्रीवर्धनमध्ये नुकसान

निसर्ग चक्रीवादळ हे रायगड जिल्ह्याच्या मुरूड समुद्रकिनारी धडकल्याने याचा फटका हा अलिबाग, मुरूड, श्रीवर्धन तालुक्यांना बसला आहे. या वादळाने खासगी आणि शासकीय मालमत्तेचे आर्थिक नुकसान झाले आहे. जिल्ह्यात अनेक भागांत झाडे उन्मळून पडल्याने रस्ते बंद झाले आहेत. अनेक इमारतींचे पत्रेही उडाले आहेत. पाऊस थांबल्यानंतर पोलीस प्रशासनाने जेसीबीच्या साह्याने रस्त्यावर पडलेली झाडे बाजूला करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू केले आहे.

पोलादपूर वीज महावितरणकडून कामाला सुरुवातपोलादपूर : बुधवारी आलेल्या निसर्ग चक्रीवादळामुळे तालुक्यात विद्युत पोल कोसळून, तारा तुटून वीजपुरवठा खंडित झाला होता. या पार्श्वभूमीवर वीज महावितरण कंपनीकडून कामाला तातडीने सुरुवात करण्यात आली असून वीजपुरवठा लवकरच सुरळीत करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे महावितरणकडून सांगण्यात आले आहे. यासाठी अजय सलगर आणि टीम मेहनत घेत आहे.पोलादपूर शहर परिसरातील एल टी लहान लाइन १४ खांब तर एच टी मेन लाइन पोलादपूर पेट्रोल पंप येथील एक खांब आणि राजेवाडी भागातील पाच खांबांचे नुकसान झाल्याने वीजपुरवठा खंडित झाला होता. मात्र, महावितरणने कामाला युद्धपातळीवर सुरुवात केली असून राजेवाडी भागातील पोल उभे करण्यात आले आहेत. पेट्रोल पंपावरील खांबांच्या दुरुस्तीचे कामही सुरू करण्यात आले आहे. पोलादपूर शहर परिसरातील विद्युत खांब दुरुस्तीनंतर सायंकाळपर्यंत वीजपुरवठा सुरळीत सुरू होईल, असे सांगण्यात आलेआहे.दरम्यान, तालुक्यातील ग्रामीण भागातील खंडित वीजपुरवठा सुरळीत कण्यासाठी सर्व विभागांत कर्मचारी काम करीत आहेत. ग्रामीण भागात वीज वितरण कंपनीचे मोठे नुकसान झाले आहे. मात्र, ही कामेही लवकरच सुरळीत करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे सांगण्यात आले.नुकसानग्रस्तांना तत्काळमदत करावी - प्रवीण दरेकरच्अलिबाग : निसर्ग वादळाचा तडाखा कोकण किनारपट्टीला सर्वाधिक बसला आहे. त्यामुळे राज्य सरकारने कोकणासाठी विशेष पॅके ज जाहीर करीत तत्काळ मदत करावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी अलिबाग येथे केली आहे. तसेच जिल्ह्यात झालेल्या दोन मृत्यूची माहिती घेऊन अलिबाग तालुक्यातील रामराज-उमठे येथील मृतांच्या नातेवाइकांची भेट घेतली.च्श्रीवर्धन, मुरुडसह अलिबागला निसर्ग वादळाचा चांगलाच तडाखा बसला. जिल्हाभरात झालेल्या नुकसानाची पाहणी करण्यासाठी विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर अलिबागेत आले होते. जिल्हाधिकारी कार्यालयात अधिकऱ्यांकडून झालेल्या नुकसानाची माहिती घेऊन नुकसानीचे तत्काळ पंचनामे करावेत, अशा सूचना अधिकाऱ्यांना त्यांनी दिल्या.चक्रीवादळात भिंत कोसळून महिला ठारमाणगाव : गोरेगाव शहरनजीक देवळी गावात एका घराची भिंत वादळात पडल्याने घरातील एक महिला जागीच ठार झाली तर दोघे जखमी झाल्याची घटना ३ जून रोजी दुपारी १ वाजता घडली. ललिता नथुराम सत्वे (४५, रा. उणेगाव) या माहेरी देवळी येथे आल्या आसता घराची भिंत कोसळून डोक्यात मार लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला, तर त्यांचे भाऊ राजेंद्र भगोजी कालेकर (३५, रा. देवळी), भावजय विक्रांती विक्रम कालेकर (२५) हे दोघे जखमी झाले.माणगाव तालुक्यात निसर्गचे थैमानमाणगाव : तालुक्यात निसर्ग चक्रीवादळामुळे मुंबई-गोवा महामार्गावर, राज्यमार्गावर व विविध अंतर्गत ठिकाणी झाडे पडली होती. आपत्कालीन यंत्रणेने ही झाडे ताबडतोब दूर केली. तसेच मुंबई-गोवा महामार्गावर इंदापूर येथे सिलिंडर असलेल्या ट्रेलरला आग लागली. प्रशासनाने अग्निशामक दलास बोलावून ही आग विझविण्यास मदत केली. तालुक्यात अनेक ठिकाणी घरांची पडझड झाली आहे.

टॅग्स :Cyclone Nisargaनिसर्ग चक्रीवादळ