शहरं
Join us  
Trending Stories
1
Sambhajinagar Accident: संभाजीनगरात भीषण अपघात, भरधाव कार दुभाजकाला धडकून उलटली, ३ जण जागीच ठार!
2
IND vs ENG: केएल राहुलने शुभमन गिलकडून घेतली 'कॅप्टन्सी', पराभवापूर्वी सामन्यात अचानक काय घडलं?
3
संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा वाल्मीक कराडच 'डायरेक्टर'; न्यायालयात ३ तास काय झाला युक्तिवाद?
4
IND vs ENG: आधी चार झेल सोडले, नंतर हसत-खेळत केली 'तशी' कृती... यशस्वी जैस्वालवर संतापले नेटिझन्स
5
मदरशामध्ये अल्पवयीन विद्यार्थ्यासोबत ठेवले अनैसर्गिक संबंध, व्हिडीओही काढले, सोशल मीडियावर शेअर केले, आरोपी अटकेत
6
पाकिस्तान सुधारणार नाही, राजौरीमध्ये नियंत्रण रेषेवर घुसखोरीचा प्रयत्न अयशस्वी; दहशतवादी गोळीबार करून पळून गेले
7
Iran Israel Conflict: इराण इस्रायल प्रकरणी भारत शांत का? एक चूक आणि ५७,४४८ कोटी येतील धोक्यात
8
Pramod Kondhare: पाठीमागून आला आणि...; भाजप पदाधिकाऱ्याचं महिला पोलीसाशी गैरवर्तन, गुन्हा दाखल
9
जगभर: चिनी राष्ट्राध्यक्षांच्या ‘अज्ञात’ मुलीची ‘हेरगिरी’! शी जिनपिंग यांची मुलगी कोण?
10
पीएफ खात्यातून ७२ तासांत काढता येणार ५ लाख रुपये; एटीएम आणि यूपीआयद्वारेही पैसे काढता येणार
11
दोन पत्नी असल्याने आमदारकी रद्द होत नाही; शिवसेना आमदाराला मुंबई उच्च न्यायालयात मोठा दिलासा
12
Mumbra Local Train Accident: ‘त्या’ प्रवाशामुळे मुंब्र्यात अपघात? दोन्ही ट्रेनमधील प्रवाशांमध्ये होते फक्त ०.७५ मीटर अंतर
13
"...म्हणून आम्ही हरलो", पराभवानंतर शुभमन गिलने यांच्यावर फोडलं अपयशाचं खापर 
14
नीरज चोप्राचं सोनेरी यश, ओस्ट्रावा गोल्डन स्पाईक स्पर्धेत जिंकलं सुवर्णपदक   
15
आजचे राशीभविष्य - २५ जून २०२५, नोकरीत पदोन्नतीची शक्यता, वैवाहिक सौख्य लाभेल!
16
विशेष लेख: आणीबाणीने देशाला शिकवलेले तीन धडे
17
Samruddhi Mahamarg: 'समृद्धी'वर शहापूरजवळ ओव्हरपासच्या पुलावर १९ दिवसांतच पडले खड्डे
18
लेख: तोटा सोसून बँकेच्या बचत खात्यात लोकांनी पैसे का ठेवावे?
19
शक्तिपीठ महामार्ग होणारच; 'कोल्हापुरात महामार्ग नको', कोल्हापूरच्या मंत्र्यांची भूमिका
20
India vs England: जिथे कमी तिथे केएल राहुल!

लाच प्रकरणांत रायगड जिल्हा आघाडीवर

By admin | Updated: November 28, 2015 01:16 IST

लाचलुचपत विभागाने रायगड जिल्ह्यात गेल्या वर्षभरात लाचखोरीला आळा घालण्यात महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली आहे

बोर्ली-मांडला : लाचलुचपत विभागाने रायगड जिल्ह्यात गेल्या वर्षभरात लाचखोरीला आळा घालण्यात महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली आहे, असे असले तरी उपलब्ध आकडेवारीवरून जिल्ह्यात लाचखोरीची सर्वाधिक प्रकरणे समोर आली आहेत. जिल्ह्यात लाचखोरीची प्रकरणे वर्षाला सरासरी दहाच्या आसपास उघडकीस येत असत. मात्र २०१४ ते नोव्हें. २०१५ पर्यंत ४९ लाचखोरीची प्रकरणे उघड झाली असून, यात ६८ व्यक्तींवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. तसेच या दोन वर्षांत प्रत्येकी तीन व चार असे सात गुन्हे साबीत झाले आहेत. रायगड लाचलुचपत विभागाचे पोलीस उपअधीक्षक सुनील कलगुरकर आणि त्यांच्या पथकाने रचलेल्या सापळ्यात कोट्यवधींची बेहिशोबी मालमत्तादेखील उघडकीस आली आहे.एका बाजूला भ्रष्टाचाराने नडलेली सामान्य जनता आणि दुसऱ्या बाजूला ऐशोआरामात राहणारी नोकरशाही असे दिसत आहे. लाचलुचपत विभागाने भ्रष्ट नोकरशाहीवर वचक निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. त्याचबरोबर लोकप्रतिनिधीद्वारे होणाऱ्या भ्रष्टाचाराला पायबंद घालण्याच्या प्रयत्नात असून, यास जनतेने सहकार्य करावे, असेही आवाहन वेळोवेळी लाचलुचपत विभागाकडून केले जात आहे.लोकप्रतिनिधीने केलेल्या भ्रष्टाचाराच्या गुन्ह्याखाली ताब्यात घेण्यास अनेक अडचणींबरोबर सामना करावा लागतो. मात्र जिल्हा परिषदेचे माजी अर्थ व बांधकाम सभापती उत्तम कोळंबे आणि खालापूर पंचायत समिती सदस्य निवृत्ती खंडू पिंगळे यांना लाचलुचपत विभागाने ताब्यात घेत पोलीस कोठडीत ठेवण्याचे धाडस दाखविले होते. याचबरोबर जवळपास अकरा अधिकाऱ्यांवर लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यान्वये कारवाई करण्यात आली आहे. भ्रष्टाचारात महिलाही कमी नाहीत हे नगररचना विभागाच्या सहा. संचालक दिशा सांवत, सहकार विभागाच्या राखी गावडे दामत, तलाठी मनीषा हुलवले या सारख्या महिला अधिकारी - कर्मचारी यांच्यावर लाचलुचपत विभागाने कारवाई केली आहे. ग्रामीण भागात शेतकऱ्यांशी निगडीत महसूल विभागातील अधिकारी कर्मचारी यांच्यावर १४ कारवाई, तर जनतेचे ेसंरक्षण करणारा विभाग म्हणजे पोलीस विभागातील सात पोलीस अधिकारी-कर्मचारी यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे.