शहरं
Join us  
Trending Stories
1
पायलट 'निगेटिव्ह-जी ॲक्रोबॅटिक' युद्धाभ्यास करायला गेला अन्...; दुबई एअर शोमध्ये 'तेजस' विमान अपघाताचे कारण समोर आले...
2
वर्षाच्या अखेरीस आणखी एक महामारी येणार! नॉस्ट्राडेमसचे भाकित काय? जाणून घ्या
3
ऐतिहासिक निर्णय! देशात चार नवे कामगार कायदे तात्काळ लागू; २९ जुने कायदे रद्द, श्रम धोरणाला आधुनिक स्वरूप
4
धक्कादायक! पत्नीने प्रियकरासाठी लग्नाच्या सातव्या दिवशी पतीची हत्या केली
5
IND A vs BAN A : 'सुपर ओव्हर'मध्ये भारताचा फ्लॉप शो! एकही चेंडू न खेळता बांगलादेशनं गाठली फायनल
6
“मालेगाव प्रकरणी आरोपीला फाशी द्या, राज्यात महिला मुलींची सुरक्षा रामभरोसे”: हर्षवर्धन सपकाळ
7
बिहारमध्ये भाजपाचा डाव! नितीश कुमारांना मुख्यमंत्रीपद दिलं पण, गृहमंत्रीपद स्वतः कडे ठेवले, २० वर्षांनंतर खाते सोडले
8
कर्नाटकच्या राजकारणात खळबळ! "सर्व १४० आमदार माझ्यासोबत", डी. के. शिवकुमार यांचे थेट विधान
9
तुम्हाला तुमची गाडी खूपच प्यारी आहे...! २० वर्षांहून जुन्या वाहनांच्या फिटनेस टेस्ट शुल्कात १५ पट वाढ
10
फेस्टीव्ह संपला नाही तोच...! फ्लिपकार्ट 'ब्लॅक फ्रायडे सेल २०२५' ची तारीख ठरली, अमेझॉन थांबतेय होय...
11
'G-20 मध्ये सामील होणार नाही', डोनाल्ड ट्रम्प दक्षिण आफ्रिकेच्या राष्ट्राध्यक्षांवर नाराज, कारण...
12
जॉब, इन्व्हेस्टमेंट, WFH च्या नावाने फ्रॉड; ऑपरेशन CyHawk अंतर्गत ४८ तासांत ८७७ जणांना अटक
13
Tejas Fighter Jet Crashed : भारताचे लढाऊ विमान तेजस कोसळले, पायलटचा मृत्यू; दुबई एअर शो दरम्यान मोठी दुर्घटना
14
भाजपा-शिंदे गटात वाद, चंद्रशेखर बावनकुळे थेट बोलले; म्हणाले, “कारवाई करू, आमचे संस्कार...”
15
Travel : अवघ्या ३ दिवसात फिरता येईल 'हा' सुंदर देश; भारताचे १०००० होतील तब्बल ५८०००! फिरण्यासाठी बेस्ट
16
"बँक खात्यात ५ लाख आले, तरीही म्हणाला आणखी पैसे लागतील"; डॉ. आदिलच्या whatsApp चॅटमध्ये काय काय?
17
केरळ, यूपीसह अनेक राज्यात SIR ला आव्हान; सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला मागितले उत्तर...
18
मोठी बातमी! इस्रायलचे पंतप्रधान बेजामिन नेतान्याहून भारत दौऱ्यावर येणार, जुनी दोस्ती आणखी घट्ट होणार
19
Local Body ELection: दोंडाईचा नगरपालिका निवडणुकीत भाजपचा ऐतिहासिक विजय, नगराध्यक्ष आणि सर्वच २६ नगरसेवक बिनविरोध!
20
स्लीपर वंदे भारत देशभर फिरवली, ट्रायलनंतर परत पाठवली; ५ फॉल्ट समोर आले, लोकार्पण लांबणार?
Daily Top 2Weekly Top 5

रायगड जिल्ह्यात जत्रोत्सवांवर पसरले कोरोना विषाणूचे सावट, दरवर्षी होणारी लाखोंची उलाढाल ठप्प

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2020 02:31 IST

Raigad News : गावागावांतून यात्रा रद्द करण्यात येत आहेत. त्यामुळे आता गावागावांतील छोट्या विक्रेत्यांचे अर्थकारणच ठप्प झाले आहे.

-  निखिल म्हात्रेअलिबाग : जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी जिल्हा प्रशासनाने यात्रा, सार्वजनिक कार्यक्रम रद्द करण्याचे आवाहन केले. त्यानंतर, आता गावागावांतून यात्रा रद्द करण्यात येत आहेत. त्यामुळे आता गावागावांतील छोट्या विक्रेत्यांचे अर्थकारणच ठप्प झाले आहे. मात्र, जिल्हा प्रशासनाच्या जत्रोत्सव रद्द करण्याच्या हाकेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. दिवाळी संपली की, कोकणातील जत्रोत्सव सुरू होतात. रायगड जिल्ह्यातील देवस्थानांच्या जत्रोत्सवाला आता प्रारंभ झाला असला, तरी यंदा त्यावर कोरोनाचे सावट पाहायला मिळते आहे. यामुळे अशा उत्सवातून दरवर्षी होणारी लाखो रुपयांची उलाढाल ठप्प झाली आहे. दरवर्षी होणारी गर्दी यंदा पाहायला मिळाली नाही. जत्रोत्सवातून उपलब्ध होणारा रोजगार कोरोनामुळे बुडाला आहे.हे दिवस शेतकऱ्यांसाठी सुगीचे दिवस असतात. भातांची मळणी काढून झालेली असते. त्‍यामुळे शेतकऱ्यांच्‍या हातात पैसे खुळखुळतात. त्‍यातून मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढाल होत असते. त्‍यातून व्‍यावसायिकांना मोठा रोजगार उपलब्‍ध होत असतो. ऐन यात्रांच्या हंगामातच कोरोनाने विळखा घट्ट केला आहे. अनेक ठिकाणी धार्मिक, भावनिक प्रश्‍न असल्याने गावागावांत स्थानिकांच्या बैठका सुरू होत्या. बहुतांशी ठिकाणी फक्त धार्मिक व रितीनुसार आवश्‍यक तितकेच विधी थोडक्‍यात करण्याविषयी एकमत झाले.अलिबाग तालुक्‍यातील आवास येथील नागेश्‍वर, मापगाव येथील कनकेश्‍वर आणि वरसोली येथील आंग्रेकालीन श्री विठ्ठल रखुमाई मंदिर, तसेच चौल येथील दत्त मंदिराची जत्रा, पेणची जत्रा खालापूर तालुक्यातील साजगावची बोंबले विठोबाची जत्रा भाविकांचे मोठे आकर्षण असते, जत्रा म्‍हणजे बच्‍चे कंपनीसाठी मोठी पर्वणीच असते. अनलॉकच्‍या प्रक्रियेत मंदिरे उघडलेली असतानाच, कोरोनाच्‍या दुसऱ्या लाटेच्‍या शक्‍यतेने पुन्‍हा एकदा भीतीचे सावट निर्माण झाले आहे. त्‍यामुळे सुनेसुने वातावरण दिसते आहे. सोशल मीडियावरून देतात माहिती यात्रांचे नियोजन अगोदरच ठरले असल्याने, अनेक जण जत्रोत्सवासाठी गावी परततात. लांबच्या शहरातूनही गावाकडे यात्रेसाठी येणारे भाविक असतात. यात्रा रद्द झाल्यानंतर सोशल मीडियावरून याची कल्पना ग्रामस्थांमार्फत देण्यात येत आहे. विविध ग्रुपच्या माध्यमातून ही माहिती बाहेरगावातील भाविकांना असल्याने त्यांचे येणेही आता रद्द झाले आहे.

टॅग्स :RaigadरायगडCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस