शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

रायगड जिल्ह्यामध्ये १,१0१  बालके कुपोषित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2017 06:12 IST

राज्यात २0१६मध्ये १८ हजार बालमृत्यू झाले, असे सरकारी  आकडेच सांगतात. राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण (एनएफएचएस)  २00५-२00६च्या तुलनेत २0१५-१६ मध्ये राज्यात बालकांच्या उंचीनुसार  वजन कमी असलेल्या पाच वर्षांखालील बालकांचे प्रमाण ५.२ टक्क्यांवरून  वाढून ९.४ टक्के म्हणजे, जवळपास दुप्पट झाल्याचे निष्पन्न झाले.

ठळक मुद्देपाच वर्षांत दुप्पट वाढ आदिवासी बालक कुपोषणमुक्तीस रिक्त पदांचा  अडसर

जयंत धुळप । लोकमत न्यूज नेटवर्कअलिबाग : राज्यात २0१६मध्ये १८ हजार बालमृत्यू झाले, असे सरकारी  आकडेच सांगतात. राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण (एनएफएचएस)  २00५-२00६च्या तुलनेत २0१५-१६ मध्ये राज्यात बालकांच्या उंचीनुसार  वजन कमी असलेल्या पाच वर्षांखालील बालकांचे प्रमाण ५.२ टक्क्यांवरून  वाढून ९.४ टक्के म्हणजे, जवळपास दुप्पट झाल्याचे निष्पन्न झाले. कु पोषणाच्या या गंभीर समस्येच्या पार्श्‍वभूमीवर बालमृत्यू आणि कुपोषण या  मुद्दय़ांवर राज्यपाल, मुख्यमंत्री आणि मुंबई उच्च न्यायालयांनीही लक्ष घालून  उपाययोजना सुचविल्या आहेत. भारतरत्न डॉ. एपीजे अब्दूल कलाम अमृत  आहार योजना ही कुपोषण निर्मूलनाच्या दिशेने टाकलेले सकारात्म पाऊल  असले तरी रायगड जिल्ह्यात आदिवासी बालकांच्या कुपोषणमुक्तीस  जिल्ह्यातील रिक्त पदांचा मोठा अडसर निर्माण झाला आहे.रायगड जिल्हा परिषदेचा महिला व बाल कल्याण विभाग, आरोग्य विभाग  आणि आदिवासी विकास विभाग यांच्याकडून प्राप्त माहितीनुसार जिल्ह्या तील १५ तालुक्यांतील ३ हजार २८३ अंगणवाड्यांमध्ये ऑक्टोबर २0१७  अखेर 0 ते ६ या वयोगटातील १ लाख ५९ हजार १९0 बालके आहेत. त्या पैकी १ लाख ४६५८२ बालकांच्या वजनांच्या नोंदी घेण्यात आल्या, त्यात १  लाख ४५ हजार ४८१ बालके सर्वसाधारण दिसून आली. सप्टेंबर  २0१७मध्ये मध्यम कुपोषित (मॅम) बालके ८४२ होती, त्यामध्ये वाढ  होऊन ऑक्टोबर २0१७ अखेर ती ९0५ झाली आहेत. सुधारणा झालेली  बालके केवळ ३.२ टक्के म्हणजे २९ आहेत. तीव्र कुपोषित (सॅम) बालके  सप्टेंबर २0१७मध्ये १७५ होती त्यामध्ये वाढ होऊन, ती ऑक्टोबर २0१७  अखेर १९६ झाली आहेत. यामधील केवळ ९.१ टक्के म्हणजे १८  बालकांमध्ये सुधारणा होऊ शकली आहे.कुपोषण मुक्तीकरिता जिल्ह्यात गाव पातळीवर अपेक्षित ‘ग्राम बाल विकास  केंद्रे’(व्हीसीडीसी) आणि प्राथमिक आरोग्य केंद्र व ग्रामीण रुग्णालय पा तळीवर अपेक्षित ‘बाल उपचार केंद्रे’(सीटीसी) ही मुळातच अपुर्‍या  प्रमाणात आहेत. तर महिला बाल कल्याण विभागातील मंजूर १0८ पदांपैकी  जिल्ह्यात १६ पदे रिक्त आहेत. रायगड जिल्हा परिषदेच्या महिला व बाल  कल्याण विभागाचे ‘उप मुख्य कार्यकारी अधिकारी’ हे कुपोषण मुक्तीच्या  दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या जबाबदार अधिकार्‍यांचे पद गेल्या अनेक महिन्यां पासून रिक्त आहे. परिणामी, जिल्हा स्तरावरून करायच्या अपेक्षित  अंमलबजावणी उपाययोजना होऊच शकत नाहीत.

आवश्यक प्रस्ताव शासनास नाहीत- चार वर्षांपासून रिक्त असलेल्या या पदांच्या बाबत शासनस्तरावर कोण त्याही प्रकारे विचार करण्यात येत नाही. - तीव्र कुपोषित बालकांच्या प्रकृतिमानात सुधारणा व्हावी, याकरिता गाव पा तळीवर ‘ग्राम बाल विकास केंद्रे’(व्हीसीडीसी) आणि प्राथमिक आरोग्य  केंद्र व ग्रामीण रुग्णालय पातळीवर ‘बाल उपचार केंद्रे’(सीटीसी) अधिक  प्रमाणात सुरू करण्याकरिता शासनस्तरावरून परवानगी आणि आवश्यक  निधीही देण्याचे नियोजन आहे. - मात्र, त्याकरिता आवश्यक ते प्रस्ताव शासनास पोहोचणे आवश्यक आहे त. ते अद्याप पोहोचत नसल्याची माहिती दिशा केंद्र या संस्थेचे प्रमुख  सामाजिक कार्यकर्ते अशोक जंगले यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.  

टॅग्स :Healthआरोग्य