शहरं
Join us  
Trending Stories
1
ISI नं का घडवला मुंबईवर हल्ला?; पाकिस्तानी राष्ट्रपती जरदारीच्या प्रवक्त्याचा मोठा दावा
2
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला
3
मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या...
4
फक्त २९ पैशांचा शेअर थेट १०० रुपयांवर! १ लाखाच्या गुंतवणुकीतून झाला '३.४४ कोटींचा' नफा
5
जगातील अवघ्या ३ लोकांकडे आहे 'ही' कार! डिझाईन पाहून प्रेमात पडाल अन् किंमत ऐकून हैराण व्हाल!
6
१७ वर्षे एकाच कंपनीत काम केले, अचानक काढून टाकले, कर्मचाऱ्याने लाखमोलाचा दिला सल्ला, पोस्ट व्हायरल
7
मोदी सरकारचा मोठा निर्णय; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिल्यांदाच पाकिस्तानात गेले 2100 भारतीय, कारण काय?
8
भाजी विक्रेत्याने जिंकली तब्बल ११ कोटींची लॉटरी; टॅक्स भरून हातात किती पैसे येणार?
9
चेज मास्टर विराट कोहलीचे व्यवसायिक साम्राज्य माहितीये का? क्रिकेटपेक्षा इथून करतो सर्वाधिक कमाई
10
Student Death: स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या सागरने आईच्या साडीनेच संपवले आयुष्य; एका तरुणीमुळे...
11
गुगल क्रोम वापरणाऱ्यांना मोठा धोका; हॅकर्सचं लक्ष तुमच्यावरच! सुरक्षित राहण्यासाठी 'ही' गोष्ट आताच करा
12
Shocking: गंमत म्हणून विवाहित महिलेनं डीएनए चाचणी केली, सासराच निघाला बाप!
13
देव तारी त्याला कोण मारी! भीषण रेल्वे अपघातात ढिगाऱ्याजवळ जिवंत सापडला चिमुकला, पण...
14
भाजपाची महिला पदाधिकारी, नेत्यांना पुरवायची मुली; बिहार निवडणुकीत वरिष्ठांनी दिली जबाबदारी
15
श्रीदेवीचा सुपरहिट सिनेमा 'मॉम'च्या सीक्वेलमध्ये दिसणार 'ही' अभिनेत्री, सेटवरील फोटो लीक
16
लाडकी बहीण अन् काय काय...! वर्षात १२ राज्यांनी महिलांना वाटले तब्बल १.६८ लाख कोटी रुपये
17
तो, ती आणि प्रेमाची बहार! पांड्यानं शेअर केला गर्लफ्रेंडसोबतचा खास व्हिडिओ
18
क्या बात! रितेश देशमुखच्या आईसाहेबांनी बल्बच्या प्रकाशात घेतलं ड्रॅगन फ्रूटचं पीक; सूनबाईंना कौतुक, शेअर केला व्हिडीओ
19
सोनाराच्या दुकानात ४ वर्ष काम केलं, रोज थोडं थोडं करून २.५ कोटींचं सोनं गायब केलं! कशी पकडली गेली चोरी?
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

उरण परिसरात रब्बी पिकांचा बहर, कडधान्ये पिकातून चांगलं उत्पादन मिळण्याचा शेतकऱ्यांना विश्वास

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2023 20:53 IST

Raigad News: उरण परिसरातील शेतकऱ्यांनी शेतात वाल, चवळी, हरभरा,राई,मूग, मटकी,तूर,पावटा,घेवडा, चवळी, मूग व मटकीची आदी कडधान्ये व रब्बीची  पिके जोमाने तयार होऊ लागली आहेत‌.या बहरलेल्या रब्बी पिकांनी शेतकरी सुखावला आहे.

- मधुकर ठाकूरउरण - उरण परिसरातील शेतकऱ्यांनी शेतात वाल, चवळी, हरभरा,राई,मूग, मटकी,तूर,पावटा,घेवडा, चवळी, मूग व मटकीची आदी कडधान्ये व रब्बीची  पिके जोमाने तयार होऊ लागली आहेत‌.या बहरलेल्या रब्बी पिकांनी शेतकरी सुखावला आहे.

पावसाळ्यात भात पीक घेतल्यानंतर जमिनी ओसाड ठेवण्यापेक्षा आणि नाहक वेळ वाया घालविण्यापेक्षा रब्बी हंगामातील पिके घेण्यावर शेतकऱ्यांनी भर दिला आहे.पावसाचा हंगामातील भातपीक हाती आल्यानंतर व  पाऊस थांबल्यावर आता शेतकऱ्यांनी शेतात वाल, चवळी, हरभरा,राई,मूग, मटकी,तूर, पावटा, घेवडा, चवळी, मूग व मटकीची आदी कडधान्यांच्या पीकांची लागवड केली आहे.परतीच्या पावसाचा मुक्काम वाढल्याने कडधान्य लागवडीस थोडासा विलंब झाला होता.त्यामुळे रब्बीच्या सुरू असलेल्या हंगामात कडधान्य पिकांबाबत शेतकऱ्यांमध्ये थोडीशी साशंकताच निर्माण झाली होती.मात्र आता शेतात लागवड केलेल्या कडधान्य पिकांना चांगलाच बहर आल्याने दिसून येत आहे.

तर अधून-मधून पडणारे दाट धुकेही पिकांच्या लागवडीस पोषक ठरते आहे. पुढील काही दिवसांनी सर्वच कडधान्य पिके तयार होतील.मात्र ढगाळ वातावरण व कीड रोगाचा प्रादुर्भाव झाला नाही तर अखेरच्या मोसमापर्यंत सर्वच पिकातून चांगले उत्पादन मिळेल असा विश्वास  विभागातील शेतकरी कृष्णा म्हात्रे, प्रफुल्ल खारपाटील, हरिश्चंद्र गोंधळी यांनी व्यक्त केला असुन येथील शेतकरी वर्गातून समाधानही व्यक्त केले जात आहे.

टॅग्स :RaigadरायगडFarmerशेतकरी