शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई विमानतळ आणि ताज हॉटेलला बॉम्बनं उडवण्याची धमकी; एअरपोर्ट पोलिसांना आला ईमेल
2
आशिष शेलार मुंबई, शिरीष बोराळकर छत्रपती संभाजीनगरचे अध्यक्ष; भाजपाकडून ८१ जिल्हाध्यक्षांची यादी जाहीर
3
मुंबईत उद्या ‘मेगा ब्लॉक डे’ मध्य, हार्बर, पश्चिम रेल्वेमार्गावर वाहतुकीत बदल
4
भारताला तुझा अभिमान आहे... पंतप्रधान मोदींनी केलं नीरज चोप्राच्या ऐतिहासिक कामगिरीचं कौतुक
5
Beed Crime News : परळीत तरुणाला बेदम मारहाण! छातीवर बसला, सभोवती कडं केलं, काठ्यांनी बेदम मारहाण, व्हिडीओ व्हायरल
6
Tarot Card: आपल्याजवळ काय नाही, त्यापेक्षा काय आहे, यावर विचार करायला लावणारा आठवडा!
7
गौप्यस्फोट! अटकेआधी संजय राऊतांचा अमित शाहांना फोन; संतापून म्हणाले, "मला अटक करा..."
8
तुर्कस्तान-अझरबैजानसोबत सर्व प्रकारचे व्यवहार संपवणार का सरकार? काय आहे तयारी
9
पाकिस्तानची तिसऱ्या देशाच्या मदतीने भारतात माल निर्यात करण्याची तयारी; सरकारने घेतली दखल
10
उर्वरित IPL 2025 ला आजपासून होणार सुरुवात; मिचेल स्टार्कसह अनेक दिग्गज स्पर्धेतून OUT
11
"भाजपाशी अनैतिक संबंध तोडावेत, जसं 'वर्षा'वर हक्कानं जाता, तसं 'मातोश्री'वर यावं" 
12
पुढच्या वर्षी बंद होणार Vodafone Idea? सरकारकडे मागितली मदत; म्हटलं, 'काम करणं कठीण...'
13
मराठा आरक्षण सुनावणी होणार जलद; हायकोर्टात विशेष पूर्णपीठ स्थापन; SCच्या आदेशानंतर पाऊल
14
आयुष्याचं ‘सुरक्षा चक्र' आहेत या ३ स्कीम्स, कठीण काळात साथ; कमी कमाई असणारेही करू शकतात गुंतवणूक
15
भारताच्या हल्ल्यात नूर खानसह अनेक एअरबेस उद्ध्वस्त; पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांचा कबुलीनामा
16
अफगाणिस्तानला भारताचा मदतीचा हात! अटारी मार्गे केली विशेष मदत; पाकिस्तानला दाखवून दिले
17
आजचे राशीभविष्य १७ मे २०२५ : नोकरदारांना नोकरीत लाभ होईल, जाणून घ्या, कसा असेल आजचा दिवस
18
सुटीत गावी आलेल्या न्यायाधीशांनी स्वत: कापले गावातील मुलांचे केस; नेमकं घडलं काय?
19
भारताला हवेत हाफिज सईद, मसूद अझहर, दाऊद इब्राहिम; मोस्ट वाँटेडची यादी पाकला सोपवणार
20
‘सेलेबी’ला काम नको; आयबीचा होता इशारा, सुरक्षेविषयी नवीन प्रश्न निर्माण होण्याची भीती

बाळगंगा प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2019 23:28 IST

जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांचा पाहणी दौरा

पेण : तब्बल नऊ वर्षांच्या कालावधीनंतर बाळगंगा प्रकल्पगस्तांच्या पुनर्वसनासाठी राज्य सरकारला जाग आली असून, बाधितांचे पुनर्वसन ज्या जागेवर होणार आहे, त्या वाशिवली, वरसई, गागोदे खुर्द या गावठाणातील जागांची पाहणी, घरांची झालेली मोजणी व मूल्यांकन नोंदी व बाळगंगा मध्यम धरण प्रकल्पाच्या ठिकाणी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी प्रत्यक्ष भेट देऊन बाधितांच्या पुनर्वसनाची कामे लवकरच करण्याचे आदेश संबंधित शासकीय अधिकारी व जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले आहेत.

पेण वरसई व जावळी निफाड खोºयातील बाळगंगा नदी तटावरील ९ महसुली गावे १३ वाड्यावरील ३३४० कुटुंबे बाळगंगा मध्यम प्रकल्पामुळे बाधित झाली आहेत. या विस्थापितांचे पुनर्वसन व्हावे, यासाठी अनेकदा पाहणी दौरे झाले आहेत. नऊ वर्षांत जमिनीला योग्य मोबदला व प्रकल्पगस्तांचे पुनर्वसन यासाठी रस्त्यावर व कायदेशीर मार्गाने आंदोलने झाली आहेत. मुंबई-गोवा महामार्गावर रास्ता रोको हे आंदोलन करण्यात आले. आंदोलकांवर खटलेही दाखल झाले. मात्र, बाळगंगा प्रकल्पग्रस्तांनी माघार घेतली नाही. अखेर बुधवारी रायगड जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी सिडकोचे अधिकारी, जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांसह महसूल व पुनर्वसन अधिकारी-कर्मचाºयांसह बाळगंगा धरण प्रकल्पच्या ठिकाणी पाहणी केली. त्याबरोबरच वाशिवली, वरसई, व गागोदे खुर्द गावातील गावठाणातील जागांची पाहणी केली आहे.

पाहणी दौºयाप्रसंगी अतिरिक्त जिल्हाधिकारी शितोळे, जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता मिसाळ, कार्यकारी अभियंता राजभोरा मॅडम, सिडकोचे अधिकारी काळे, पेण तहसीलदार डॉ. सुवर्णा जाधव, प्रांत कार्यालयाचे नायब तहसीलदार, यांच्यासह बाळगंगा संघर्ष समिती अध्यक्ष अविनाश पाटील, गागोदे सरपंच शिवाजी पाटील, भरत कदम, बी. बी. पाटील, जयंत नारकर, वरसई सरपंच जयश्री भेसरे आदी उपस्थित होते. बाळगंगा प्रकल्पगस्तांच्या पुनर्वसनासाठी जिल्हाधिकारी स्वत: लक्ष केंद्रित करीत आहेत. त्यामुळे नवीन वर्षात बाळगंगा मध्यम प्रकल्प पूर्ण करण्याबरोबरच बाधितांचे नव्या जागेत स्थलांतर व पुनर्वसन होण्याची शक्यता आहे.

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रRaigadरायगड