शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

पेणच्या हमीभाव केंद्रावर तब्बल २३ हजार क्विंटल भाताची खरेदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2021 04:39 IST

बँक खात्यात पैसे जमा झाल्याने शेतकरी आनंदित

पेण : पेणमधील खरेदी-विक्री संघामार्फत पेण, वडखळ,वरसई या ठिकाणी हमी भाव केंद्रावर शेतकऱ्यांनी विक्री केलेला सुमारे २३ हजार क्विंटल पेक्षाही जास्त प्रमाणात भात शासनाकडून खरेदी करण्यात आल्याचे खरेदी- विक्री संघाचे चेअरमन रघुनाथ तथा बापू दळवी यांनी सांगितले आहे.डिसेंबर महिन्यापासून पेण खरेदी- विक्री संघाने प्रथम वरसई, त्यानंतर पेण शहरात व वडखळ या ठिकाणी भात हमीभाव आधारभूत किमतीने शासनाच्या आदेशानुसार केंद्र सुरू केले होते. अवघ्या दोन महिन्यांत या हमीभाव केंद्रावर शेतकऱ्यांकडून चांगला प्रतिसाद मिळालेला आहे. आजपर्यंत या तीन केंद्रातील खरेदी केलेल्या भाताची आवक २३ हजार क्विंटलपेक्षाही जास्त प्रमाणात झाली आहे. फेडरेशन अधिकारी यांनी यावर्षी खरेदी केलेल्या भाताचे चुकारे वेळेतच शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात जमा झाल्याने शेतकरी समाधानी दिसत आहे. यासाठी जिल्हा फेडरेशनच्या अधिकाऱ्यांचे मनापासून आभार मानले आहेत. नुकतीच वाशी विभागातील शेतकऱ्यांसाठी पेण-वाशी रस्त्यावर आधारभूत भात हमीभाव केंद्र सुरू करण्यात आले असून या विभागातील शेतकऱ्यांना या ठिकाणी आपला हात नेण्यासाठी सुलभ ठरणार आहे. खरीप हंगामात उत्पादन केलेल्या प्रत्येक शेतकऱ्यांचा भात शेवटपर्यंत हमीभाव आधारभूत केंद्रावर खरेदी करण्यात येणार असल्याचे खरेदी-विक्री संघाचे चेअरमन रघुनाथ तथा बापू दळवी यांनी सांगितले.भाताचे गोडाऊन पूर्ण क्षमतेने भरलेशेतकरी हाच केंद्रबिंदू मानून शासनाने आधारभूत हमीभाव केंद्र सुरू केले आहेत. सध्या पेण शहरातील खरेदी- विक्री संघाच्या गोडाऊनमध्ये खरेदी केलेल्या भाताने गोडाऊन पूर्ण क्षमतेने भरले आहे. सोमवारपासून याची उचल करण्यात येणार आहे. त्यानंतर लगेच पेण, वडखळ येथील केंद्रावर शेतकरी बांधवांचा भात खरेदी केला जाईल, असे खरेदी विक्री संघाचे सूत्रांनी माहिती देताना सांगितले.