शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
2
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
3
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
4
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
5
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
6
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स ३४० अकांनी तर निफ्टी ११५ अंकांनी वधारला; IT Stocks सुस्साट
7
देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया
8
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
9
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
10
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
11
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
12
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
13
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
14
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
15
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
16
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
17
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
18
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
19
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
20
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
Daily Top 2Weekly Top 5

'भांडवलधार्जिण्या भाजपा सरकारला सत्तेतून खाली खेचा'

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2019 00:22 IST

आशिया खंडात खतनिर्मितीमध्ये अग्रेसर असणाऱ्या थळ-अलिबाग येथील प्रकल्पाचा खासगीकरण करण्याचा घाट भाजप सरकारने घातला आहे.

अलिबाग : आशिया खंडात खतनिर्मितीमध्ये अग्रेसर असणाऱ्या थळ-अलिबाग येथील प्रकल्पाचा खासगीकरण करण्याचा घाट भाजप सरकारने घातला आहे. खासगीकरणाच्या नावाखाली हाच प्रकल्प अंबानीसारख्या भांडवलदाराच्या घशात घालण्याची तयारी मोदी सरकारने सुरू केल्याचा गौप्यस्फोट शेकापचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांनी केला. भांडवलधार्जिण्या भाजप सरकारला सत्तेतून खाली खेचा आणि आघाडीच्या उमेदवारांना निवडून आणा, असे आवाहनही त्यांनी केले.अलिबाग विधानसभा मतदारसंघात सोमवारी आघाडीचे उमेदवार सुनील तटकरे यांच्या प्रचारासाठी रामराज, नागाव, अलिबाग-खडताळपूल, धोकवडे, फोपेरी, वेश्वी आणि कुसुंबळे येथे विविध प्रचार सभांचा कार्यक्रम होता. वेश्वी येथील सभेत आमदार पाटील बोलत होते.भाजपचे मोदी सरकार पुन्हा सत्तेवर आले तर देशाचे संविधान बदलून देशाचे तुकडे पाडले जातील. त्यामुळे मोदी सरकारला सत्तेपासून रोखले पाहिजे. यासाठीच आघाडीच्या उमेदवारांना निवडून दिले पाहिजे, असे आवाहनही पाटील यांनी केले.आरसीएफच्या प्रकल्पाचे खासगीकरण करून तो प्रकल्प अंबानींच्या घशात घालण्याच्या हालचाली सुरू आहेत. त्यामुळेच थळ प्रकल्पाचे टप्पा तीनमधील विस्तारीकरण भाजप सरकारने जाणूनबुजून रखडवले आहे. त्यामुळे १४१ प्रकल्पग्रस्तांच्या नोकरीचा प्रश्न बिकट झाल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी भारत देशाला अतिशय मजबूत असे संविधान दिले आहे. संविधानामुळे सर्व जातींना अधिकार मिळाले आहेत. तेच संविधान बदलून बहुजन समाजाचा शिक्षणाचा हक्क काढण्यासाठी अनुदानित शाळा बंद करण्याची तयारी भाजप सरकारने केली आहे असेही पाटील यांनी स्पष्ट करून तटकरे यांना मोठ्या मताधिक्क्याने विजयी करण्याचे आवाहन केले.

शिक्षणाचे खासगीकरण करून बहुजनांच्या शिक्षणाचा हक्क हिरावून घेणाºया भाजप सरकारला जनतेने धडा शिकवावा.आरसीएफच्या खासगीकरणाचा डाव लवकरच उलटून टाकू आणि टप्पा क्रमांक-३ चे काम सुरू करून त्यामध्ये स्थानिक भूमिपुत्रांना रोजगारामध्ये प्राधान्य देण्यात येईल असेही त्यांनी स्पष्ट केले. याप्रसंगी माजी राज्यमंत्री मीनाक्षी पाटील, जिल्हा परिषद उपाध्यक्ष आस्वाद पाटील यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते.>आरसीएफ प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न सोडवणारभाजपची सत्ता उलथवून लावण्यासाठी आघाडीच्या उमेदवारांना मतदारांनी निवडून आणले पाहिजे. तसेच झाले तरच देशाचे संविधान आणि देश वाचेल, असे आवाहन आघाडीचे उमेदवार सुनील तटकरे यांनी केले. निवडून आल्यावर सर्वप्रथम आरसीएफच्या प्रकल्पग्रस्तांचा प्रश्न प्रामुख्याने सोडवण्यात येईल असे आश्वासनही तटकरे यांनी दिले.रेवस-रेड्डी सागरी महामार्गाचेही काम मार्गी लावण्यात येणार आहे. मुंबई-गोवा या राष्ट्रीय महामार्गावर टोल बसवण्यात येणार असल्याचे मध्यंतरी गीते यांनी म्हटले होते. टोलमुक्तीचा नारा यांनीच दिला होता आणि तेच आता जनतेच्या माथी टोल मारत आहेत. मात्र निवडून येताच मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील टोल रद्द केला जाईल असेही तटकरे यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :Maharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019raigad-pcरायगडsunil tatkareसुनील तटकरे