शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते' खासदार कोण? महिला डॉक्टरने दोन पीएंची पोलिसांकडे केलेली लेखी तक्रार; आतेभावाचा मोठा खुलासा
2
भारतानंतर आणखी एक देश पाकिस्तानचे पाणी अडवणार, कुनार नदीवर धरण बांधण्याची तयारी सुरू
3
भारतीय नौदल चीन, पाकिसातन, तुर्की अन् चीनला धक्का देणार! तीन पावले उचलली
4
विराट कोहली दोनदा शून्यावर बाद; सुनील गावसकरांनी मांडलं सडेतोड मत, म्हणाले- दोन सामन्यात...
5
VIDEO: देसी महिलेचा धुमाकूळ! 'हुस्न तेरा तौबा' गाण्यावर इतका विचित्र डान्स कधीच पाहिला नसेल
6
मोजतानाही लागेल धाप! IPO येण्याआधीचं Jio कंपनीचं मूल्यांकन बाप रे बाप...!
7
Railway: रेल्वे ट्रॅकजवळ रील बनवणाऱ्यांची आता खैर नाही; प्रशासनानं उचललं कठोर पाऊल!
8
मुख्यमंत्री फडणवीस अन् मनोज जरांगे पहिल्यांदाच एका व्यासपीठावर येणार? चर्चांना उधाण...
9
Shraddha Walker : "श्रद्धा वालकरवर अजूनही अंत्यसंस्कार झालेच नाहीत"; आफताबने ३ वर्षांपूर्वी केलेली निर्घृण हत्या
10
Satara Crime: महिला डॉक्टरवर अत्याचार करणारा पीएसआय गोपाल बदने फरार; महिला आयोगाने घेतली दखल
11
Social Media Earning: इन्स्टाग्राम आणि युट्यूबवरून कसे कमवता येतात पैसे? तुम्हीही बनू शकता लखपती! जाणून घ्या
12
एका जाहीरातीमुळे ट्रम्प यांची सटकली, थेट ट्रेड डीलवरील चर्चाच रद्द केली, काय होतं त्या जाहीरातीत?
13
सुजात आंबेडकरांच्या नेतृत्वात छत्रपती संभाजीनगरमधील RSS कार्यालयावर वंचितचा जनआक्रोश मोर्चा
14
Womens World Cup 2025 Semi-Final Schedule : टीम इंडियासमोर कोणत्या संघाचं असेल आव्हान?
15
"अशी घाणेरडी, गलिच्छ कृती केल्यास..."; सातारा महिला डॉक्टर प्रकरणात सुप्रिया सुळेंचा संताप
16
स्वतःला संपवू नका गं… तुम्हाला त्रास देणाऱ्या नराधमांना शिक्षा झालीच पाहिजे - चित्रा वाघ
17
Phaltan Crime: संबंधित पोलिसांना निलंबित करा, महिला डॉक्टरच्या आत्महत्येप्रकरणी मुख्यमंत्र्यांचे तातडीचे आदेश
18
Mumbai Crime: लालबागमध्ये थरार! बॉयफ्रेंडपासून वाचण्यासाठी रस्त्यावर धावत सुटली तरुणी; नर्सिंग होममध्ये घुसताच...
19
भारतानेही ट्रम्प यांच्या इशाऱ्यावरून रशियन तेल खरेदी कमी केले; अमेरिकेचा पुन्हा दावा
20
१०१ वर्ष जुनी कंपनी आयपीओ आणणार, १६६७ कोटी रुपये उभारणार; 'या' दिवसापासून करता येणार गुंतवणूक

‘माझ्या धन्याचे खोल समुद्रात संरक्षण कर’, कोळी महिलांची दर्यासागराला नारळ अर्पण करून आळवणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2019 02:53 IST

नारळी पौर्णिमेनिमित्त जिल्ह्यातील विविध ४२ ठिकाणी कोळी बांधवांनी मिरवणुका काढून दर्यासागराला नारळ अर्पण केला.

अलिबाग : नारळी पौर्णिमेनिमित्त जिल्ह्यातील विविध ४२ ठिकाणी कोळी बांधवांनी मिरवणुका काढून दर्यासागराला नारळ अर्पण केला. त्यामुळे समुद्रकिनारी कोळी बांधवांनी मोठ्या संख्येने गर्दी केल्याने जत्रेचे स्वरूप आले होते. नारळी पौर्णिमेच्या दिवशी सागराला नारळ अर्पण करून कोळी बांधव आपापल्या होड्या समुद्रात मासेमारीसाठी नेतात. पावसाळ्यात दोन महिने बंद असलेला मासेमारी व्यवसाय पुन्हा सुरू होणार आहे. त्यामुळे नारळी पौर्णिमेच्या सणाला कोळी समाजात विशेष महत्त्व असते.नारळी पौर्णिमेला कोळी समाजामध्ये अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. उपजीविकेचे साधन असलेल्या समुद्राप्रति कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा सण मानला जातो. पावसाळ्यात सोसाट्यांच्या वाऱ्यांमुळे समुद्र खवळलेला असतो. तसेच या कालावधीत मत्स्यप्रजननाचाही असतो. खवळलेला समुद्र श्रावण महिन्यातील नारळी पौर्णिमेनंतर शांत होतो. त्यामुळे नारळी पौर्णिमेला समुद्राला नारळ अर्पण करून त्याची मनोभावे पूजा करून मासेमारीसाठी होड्या समुद्रात नेतात. या परंपरेमुळे तसेच खराब हवामानामुळे पावसाळ्यातील दोन महिने मासेमारी बंद असते. मात्र, नारळी पौर्णिमेनंतर पुन्हा मासळी पकडण्यास सुरुवात करतात.अलिबाग कोळीवाड्यातील खंडोबाच्या मंदिरामधून वाजत-गाजत मिरवणूक काढण्यात आली होती. शहरातून फिरल्यानंतर समुद्रकिनारी समुद्राला नारळ अर्पण करण्यात आला. दरम्यान, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी अलिबागच्या समुद्रकिनारी तीन अधिकारी, ३० कर्मचारी आणि दहा महिला कर्मचारी, बिटमार्शल, दामिनी पथकाचा समावेश होता.नारळी पौर्णिमेचा कोळीवाड्यात उत्साह१रेवदंडा : गेले १५ दिवस पावसाने साऱ्यांच्याच नाकी नऊ आणले असतानाही बुधवारी नारळी पौर्णिमेचा सण कोळीबांधवाच्या वाड्यात उत्साहात साजरा करण्यात आला. सकाळपासून गलबते, होड्या, नौका किनाºयावर सजवण्याची कामे चालू होती. महिला घरात गोडधोड पदार्थ करण्यात मग्न होत्या. साधारणत: कंरजी करण्याची प्रथा किनारपट्टीवरील कोळीवाड्यात आहे.२येथील परिसरात असलेल्या आग्राव, चुनेकाळीवाडा, थेंरोडामधील विविध कोळी पाडे, साळाव, कोरलईमधील पाड्यात या उत्सवाची लगबग जाणवत होती. काही ठिकाणी नारळ फोडीच्या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. सांयकाळी काही कोळीवाड्यांतून सजवलेले, पूजन केलेले श्रीफळ समुद्राला अर्पण करण्यासाठी मिरवणुका वाजत गाजत निघाल्या होत्या.३या वेळी पारंपरिक वेश कोळीबांधवांनी केला होता. समुद्राला नारळ अर्पण केल्यानंतर महिलांनी ‘माझ्या धन्याचे खोल समुद्रात जाताना संरक्षण कर आणि भरपूर म्हावरे मिळू दे’ अशी आळवणी दर्यासागरालाकेली.भरडखोल समुद्रकिनारी नारळी पौर्णिमा साजरीदिघी : श्रीवर्धन तालुक्यातील भरडखोल येथील कोळी समाजाकडून नारळी पौर्णिमा सण उत्साहात साजरा करण्यात आला. दर्यासागराला सोन्याचा नारळ अर्पण करताना पारंपरिक वेशभूषांमध्ये कोळी बांधवांची अलोट गर्दी पाहायला मिळाली. या उत्सवात भरडखोल येथील कोळी समाज अध्यक्ष रामचंद्र वागे, उपाध्यक्ष भास्कर चौलकर, सोपान पाटील, राजा चौलकर, सरपंच हरिओम चोगले, उपसरपंच किशोर भोईनकर, रामचंद्र पावशे आदीसह कोळी बांधव व महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.मुरुडमध्ये पारंपरिक पद्धतीने सण साजरा१आगरदांडा : समुद्रकाठी राहणाºया व प्रामुख्याने मासेमारी करणाºया कोळी समाजाचा हा महत्त्वाचा सण आहे. पावसाळ्यात समुद्र प्रचंड खवळलेला असतो. बोटी, जहाजांची वर्दळ या काळात बंद असते. समुद्राचा कोप होऊ नये, जहाजे, नौका सुरक्षित राहाव्यात, समुद्र शांत होण्यासाठी कोळी बांधव या दिवशी समुद्राची पूजा करतात.२पूजेसाठी समुद्राला यथाशक्तीप्रमाणे सोन्याचा नारळ अर्पण करण्याकरिता मुरुड कोळीवाड्यातील नवापाडावतीने परंपरेनुसार नारळी पौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी करतात. सजवलेल्या सोन्याच्या नारळाची पूजा करूनवाजत गाजत मिरवणूक काढूननारळ दर्याराजाला अर्पण करण्यात आला.३पारंपरिक कोळीगीतांवर ठेका धरून दर्यासागराला नारळ अर्पण करत जल्लोषात साजरा करतात. या मिरवणुकीत सागरकन्या सोसायटीचे चेअरमन मनोहर बैले, मनोहर मकू, कोळीबांधव व महिला उपस्थित होत्या.करंजा येथे पारंपरिक पद्धतीने नारळी पौर्णिमा साजरीउरण : तालुक्यात करंजा येथील रयत शिक्षण संस्थेच्या द्रोणागिरी हायस्कूल येथे नारळी पौर्णिमा उत्सव कोळी बांधवांकडून जल्लोषात साजरा करण्यात आला. द्रोणागिरी हायस्कूल करंजा येथील विद्यार्थ्यांनीही पारंपरिक सण साजरा केला. त्यात त्यांनी प्रतिकात्मक सोनेरी नारळ तयार केला होता. सजविलेल्या गाडीमध्ये तो नारळ मिरवणुकीने समुद्रकिनारी नेण्यात आला. तिथे पूजा करून होडीने खोल समुद्रात नेऊन अर्पण केला. या वेळी विद्यार्थ्यांनी पारंपरिक कोळ्याचा पोषाख परिधान केला होता. त्या वेळी वृक्षांना राख्या बांधण्यात आल्या. तसेच समुद्रकिनारी तयार केलेल्या स्टेजवर विद्यार्थ्यांनी कोळीनृत्यही सादर केले.काळाप्रमाणे या सणामध्येही जुन्या कोळीगीतांसह आधुनिक गीतांचा आवाज घुमू लागला आहे. पारंपरिक वाद्यांच्या जागा डॉल्बी सिस्टीमने घेतली आहे; पण उत्साहाची कुठेच कमतरता भासत नाही. खवळलेल्या समुद्राला शांत करण्यासाठी करंजा येथील विद्यार्थ्यांनीही श्रीफळ अर्पण के ले. नारळी पौर्णिमेच्या या कार्यक्रमाला नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.नांदगावमध्ये नारळफोडीत रमाकांत खोत विजयीमुरुड : मुरुड तालुक्यातील नांदगावच्या श्री सिद्धिविनायक क्रीडा मंडळातर्फे नारळी पौर्णिमेनिमित्त आयोजित नारळफोडी सामन्यात नांदगावच्याच रमाकांत खोत यांनी अंतिम फेरीतील चुरशीच्या लढतीत अलिबाग तालुक्यातील आक्षी येथील भावार्थ सारंग याचा केवळ एक नारळ शिल्लक ठेवत पराभव केला व ही स्पर्धा जिंकली.यशवंतनगर पंचक्रोशीतील नांदगावच्या सिद्धिविनायक मंडळाच्या या प्रसिद्ध स्पर्धेचे २६ वे वर्ष असून, ती दरवर्षी श्री सिद्धिविनायक मंदिराच्या भव्य पटांगणात खेळवली जाते. या वेळी स्पर्धेत अलिबाग मुरुड तालुक्यातील ३२ स्पर्धकांनी प्रत्येकी दहा अस्सल खेळी नारळ घेऊन आपला सहभाग नोंदवला होता. स्पर्धेत ३२० पैकी ३१९ नारळ फोडण्यात आले. रमाकांत खोत चार नारळ, तर भावार्थ सारंग दोन नारळ शिल्लक ठेवून अंतिम फेरीत दाखल झाले होते. खोत यांचा विजय सहज वाटत असतानाच सारंग यांचा मारेकरी प्रमोद राऊत यांनी खोत यांचे तीन नारळ फोडीत सामना बरोबरीत आणला होता; परंतु खोत यांचा मारेकरी विराज पाटील यांनी अखेरचा दणका देत विजयश्री खेचून आणली.सारंग दुसºया क्रमांकावर विजयी झाले, नांदगावच्या आराध्य मळेकर यांना तिसरा क्रमांक मिळाला, तर मुरुडच्या बाबा पालशेतकर हे चौथ्या क्रमांकाचे विजेते ठरले. स्पर्धेतील प्रमोद राऊत उत्कृष्ट मारेकरी ठरला, त्यास आकर्षक ट्रॉफी देऊन गौरवण्यात आले. पंच म्हणून विष्णू नागावकर, उमाकांत चोरघे, जयंता पुलेकर, मनोहर मोकल आदीनी काम पाहिले.

टॅग्स :Raigadरायगड