शहरं
Join us  
Trending Stories
1
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
2
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
3
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
4
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
5
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
6
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
7
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
8
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
9
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
10
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
11
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
12
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
13
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
14
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
15
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
16
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
17
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
18
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
19
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
20
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या

ग्रामपंचायतीच्या कृतीला सरकारने ठरवले योग्य, जिल्ह्यातअनधिकृत बांधकामांचे पेव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2017 02:51 IST

रायगड जिल्ह्यातील विविध ग्रामपंचायतींमध्ये नागरीकरण वाढत आहे. काही ठिकाणी अनधिकृत बांधकामांचे पेव फुटले आहे. अशा बांधकामांना ग्रामपंचायतीने नियमानुसार घरपट्टी लावून त्यांच्या दप्तरी अनधिकृत बांधकाम, असा शेरा मारण्याच्या कृतीला सरकारने योग्य ठरवले आहे.

अलिबाग : रायगड जिल्ह्यातील विविध ग्रामपंचायतींमध्ये नागरीकरण वाढत आहे. काही ठिकाणी अनधिकृत बांधकामांचे पेव फुटले आहे. अशा बांधकामांना ग्रामपंचायतीने नियमानुसार घरपट्टी लावून त्यांच्या दप्तरी अनधिकृत बांधकाम, असा शेरा मारण्याच्या कृतीला सरकारने योग्य ठरवले आहे. सरकारच्या या निर्णयामुळे रायगड जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या दडपशाहीला न जुमानण्याचाच अधिकार सरकारने दिल्याचे अधोरेखित होत आहे.अलिबाग तालुक्यातील मापगाव आणि गुंजीस या ग्रामपंचायती काँग्रेसच्या ताब्यात आहेत. ग्रामपंचायतींमधील विनापरवाना बांधलेल्या बांधकामांना घरपट्टी लावली नाही तर महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५९चे कलम ३९ (१)अन्वये कारवाई करण्यात येईल. रायगड जिल्हा परिषदेची स्थायी समिती धमकावत असल्याची तक्र ार काँग्रेसचे माजी आमदार मधुकर ठाकूर यांनी सरकार दरबारी केली होती. महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम कलम १२४ व त्याअंतर्गत महाराष्ट्र ग्रामपंचायत कर व फी नियम १९६० यामधील तरतुदीनुसार, ग्रामपंचायत हद्दीतील अधिकृत, अनधिकृत इमारती, घर यांना करआकारणी करणे बंधनकारक आहे. तसा शासन निर्णय जाहीर करण्यात आला होता. त्यानुसार बोरीस गुंजीस ग्रामपंचायतीने त्यांच्या हद्दीतील अनधिकृत बांधकामांना घरपट्टी लावली होती; परंतु ती लावताना ‘नमुना ८ अ’च्या शेरेकोष्टकी अनधिकृत बांधकाम असा शेरा मारला होता. या कृतीला रायगड जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीमधील काही सदस्यांनी जोरदार आक्षेप घेतला होता. अनधिकृत बांधकाम असा मारलेला शेरा काढून टाकावा, अशी मागणी लावून धरली होती. या प्रकारानंतर काँग्रेसचे माजी आमदार मधुकर ठाकूर यांनी तसेच रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी ग्रामपंचायतीच्या ‘नमुना ८अ’ च्या शेरेकोष्टकी शेरा लिहावा, अगर कसे? याबत शासनाकडे मार्गदर्शन मागितले होते. त्यानुसार शासनाने ग्रामपंचायत हद्दीमधील बांधकामे अनधिकृत असली तरी किंवा त्यांनी बांधकाम परवानगी घेतली असली किंवा नसली, तरी त्यांना घरपट्टी लावावी असे नमूद केले आहे, तसेच हे बांधकाम अनधिकृत असल्यास शेरेकोष्टकी तसा वस्तुस्थितीदर्शक शेरा मारण्यास हरकत नाही, असे स्पष्टीकरण दिले आहे.- गाव पातळीवर अनधिकृत बांधकामांना अभय देण्याचे काम स्थानिक लोक प्रतिनिधी यांच्यामार्फतच केले जाते. व्होट बँकेसाठी चालणार हे राजकारण संविधानापेक्षा मोठे नसल्यानेच कायद्यानेच त्यांना हतबल करणे योग्य ठरते.- अनधिकृत असा शेरा मारल्यामुळे सरकारचे मिळणारे लाभ अनधिकृत बांधकाम करणाºयांना मिळणार नसल्यानेच. त्याला जनतेच्या हितासाठी विरोध करीत असल्याचे चित्र रायगड जिल्ह्यामध्ये विविध ग्रामपंचायती, नगर पंचायती, नगरपालिका क्षेत्रामध्ये उभे केले जाते. त्याला ही मोठी चपराक म्हणावी लागेल.

टॅग्स :Raigadरायगड