शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
2
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
3
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
4
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
5
Asia Cup 2025: जो मॅटर गाजला तोच पॅटर्न! IND vs PAK हायहोल्टेज सामन्यासंदर्भात मोठा निर्णय
6
अवघ्या युरोपच्या विमानतळांवर मोठा सायबर हल्ला; विमाने अडकली, प्रवाशांच्या गर्दीने एअरपोर्ट खचाखच भरले...
7
याला म्हणतात धमाका शेअर...! केवळ 2 वर्षांत दिला 900 टक्के परतावा, आजही करतोय मालामाल; तुमच्याकडे आहे का?
8
सचिन तेंडुलकरसोबत अफेअरची चर्चा, आता अनेक वर्षांनंतर शिल्पा शिरोडकर सोडलं मौन, म्हणाली...
9
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
10
पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यासाठी कर्णधार सूर्याने टीम इंडियाला दिला असा सल्ला, म्हणाला फोन बंद करा आणि...  
11
Scuba Diving : १०, २० की ३० मीटर? पाण्यात नेमके किती खोलवर जातात स्कूबा डायव्हर्स?
12
Navratri 2025: नवरात्रीत का घ्यावा सात्त्विक आहार? त्यामुळे शरीराला कोणते लाभ होतात?
13
VIDEO: माकडाने अचानक महिलेच्या डोक्यावरून हिसकावला गॉगल.. पुढे जे झालं ते पाहून व्हाल थक्क
14
"मी पुन्हा सांगतो, भारताकडे एक कमकुवत पंतप्रधान", H-1B व्हिसा प्रकरणावरून राहुल गांधींचा हल्लाबोल
15
MSRTC: एसटी महामंडळात १७ हजारांहून अधिक पदांची भरती; चालक आणि सहाय्यक नेमणार, 'इतका' पगार!
16
डोनाल्ड ट्रम्प यांचा H-1B व्हिसा बॉम्ब होणार बॅकफायर, अमेरिकेचंच होणार नुकसान, तर भारताचा...
17
सर्वपित्री अमावास्या २०२५: पूर्वज स्मरणासह ‘ही’ कामे अवश्य कराच; पुण्य-वरदान-कृपा लाभेल!
18
तुमचा पुण्यातील रोजचा प्रवास ३५ किमी आहे, तर तुम्ही कोणती स्कूटर, मोटरसायकल घ्यावी? 
19
Navratri 2025: नवरात्रीत घट बसवण्याआधी देवघरात 'हे' बदल केले का? नसेल तर आजच करा
20
परदेशात फिरायला जाणाऱ्या प्रवाशांनी शोधली 'ही' नवीन युक्ती; नेमका काय आहे 'फ्लाइंग नेकेड ट्रेंड'?

रायगड जिल्ह्यात मत्स्य व्यवसाय विकासावर भर, किनारी सुरक्षेसाठी जिल्हाधिकारी पाठवणार प्रस्ताव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2017 02:57 IST

रायगड जिल्ह्यात मत्स्य व्यवसाय विभागाद्वारे निमखाºया जलक्षेत्रात मत्स्य संवर्धन करून मत्स्य उत्पादन वाढविण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येत आहेत.

जयंत धुळपअलिबाग : रायगड जिल्ह्यात मत्स्य व्यवसाय विभागाद्वारे निमखाºया जलक्षेत्रात मत्स्य संवर्धन करून मत्स्य उत्पादन वाढविण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येत आहेत. मत्स्य व्यवसायाद्वारे आधुनिक काळात मोठ्या प्रमाणात परकीय चलन देशाला प्राप्त होत आहे. राष्ट्रीय सहकार विकास निगम योजनेंतर्गत जिल्ह्यात एकूण १६९ लाभार्थी गटांना मच्छीमार नौका बांधणीसाठी १४.१३ कोटी रुपये अर्थसाहाय्य वाटप करण्यात आले आहे. तर मासेमारी साधनांच्या खरेदीवर अर्थसाहाय्य या योजनेंतर्गत बिगरतांत्रिक नौका बांधणीसाठी ३२ लाभार्थ्यांना ३२ लाख रुपये अनुदान वाटप करण्यात आले आहे. डिझेल इंधनावरील विक्री कराची प्रतिपूर्ती या योजनेंतर्गत मागील तीन वर्षांत ६५.७४ कोटी रुपये वितरीत करण्यात आल्याची माहिती मत्स्य विभागाचे उपायुक्त अविनाश नाखवा यांनी दिली.केंद्र सरकारच्या तीन वर्षांच्या कारकिर्दपूर्ती निमित्ताने जिल्हाधिकारी डॉ. सूर्यवंशी यांच्या प्रमुख उपस्थितीत राज्याच्या माहिती व जनसंपर्क विभागाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित माध्यम प्रतिनिधींच्या विकास संवाद कार्यशाळेत ते बोलत होते. रायगड जिल्ह्याला २४० कि.मी. लांबीचा सागरकिनारा लाभला असून, २१ हजार चौरस कि.मी. सागरी क्षेत्र मासेमारीसाठी उपलब्ध आहे. समुद्र आणि खाड्याच्या लगतची १०३ मच्छीमार गावे या व्यवसायात गुंतलेली आहेत. सोनकोळी, महादेव कोळी, खारवी, गाबित, भोई व दालदी मुस्लीम बांधव या व्यवसायात आहेत. मोरा-करंजा, अलिबाग-साखर, रेवदंडा, मुरुड आणि श्रीवर्धन हे प्रमुख मच्छीमार विभाग जिल्ह्यात आहेत. या जिल्ह्याच्या एकूण मासेमारीपैकी ६० टक्के व्यवसाय या विभागात होतो. ब्रिटिश राजवटीत रोहा, पेण, पनवेल आणि नागोठणे येथून देशावर तर अलिबागसह अलिबाग तालुक्यातील रेवस, वरसोली, थळ व मांडवा येथून मुंबईस सुकी मच्छी पाठविण्यात येत असे. इ.स. १८०० च्या सुमारास महाड हे सुक्या मासळीचे मोठे व्यापारी केंद्र होते. येथून दक्षिणेस मोठ्या प्रमाणात मासळी पाठविली जात असे.उरण तालुक्यातील करंजा येथे १५२ कोटी रुपये मंजूर निधीतून आधुनिक मत्स्य बंदर उभारणीचे काम सुरू आहे. राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत रायगड जिल्ह्यातील वरसोली, चाळमळा (थळ), मुरुड, बोर्ली मांडला आणि कोंढरीपाडा (करंजा) या ठिकाणी १३.३१ कोटी रुपये निधी खर्च करून मच्छीमारीसाठी जेट्टी, लिलावगृह, जाळी विणण्याच्या शेड आदी कामे पूर्ण करण्यात आली असल्याचे नाखवा यांनी सांगितले. नाबार्डच्या योजनेंतर्गत २०१६-१७ मध्ये थेरोंडा(अलिबाग), एकदरा (मुरुड) व नवापाडा (करंजा) येथे बंदर विकासाकरिता ६७ कोटी रुपये, खोपोली येथे शासकीय मत्स्यबीज उत्पादन केंद्रातून शासकीय दराने ८ लाख मत्स्यबीज विक्री यशस्वी, सन २०१६-१७ मध्ये मत्स्य व्यवसाय प्रशिक्षण केंद्रासाठी १ कोटी ६ लाख रुपये खर्च करून ‘मत्स्य प्रबोधिनी’ मत्स्य प्रशिक्षण नौका बांधली. मच्छीमारांसाठी मासे सुकवण्याचे ४० ओट्यांचे काम पूर्ण केले आहे.>‘लोकमत’ने मांडला प्रस्तावकोळी बांधवांचे जन्मत:च समुद्राशी नाते जोडले गेलेले असते. त्यामुळे सागरी वादळाला भिडण्याचा गुण त्यांच्या अंगी उपजतच असतो. त्यामुळे कोळी बांधवांना सुरक्षेचे धडे दिल्यास समुद्र किनाºयावरील सुरक्षेचा प्रश्न सुटेल.त्यामुळे ज्याप्रमाणे लष्करातील मराठा रेजिमेंट, गुरखा रेजिमेंट आहेत, त्याचप्रमाणे सागरी सुरक्षेकरिता ‘कोळी रेजिमेंट’तयार करण्याकरिता शासनास प्रस्ताव सादर करण्याचा निर्णय रायगडचे जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी घेतला आहे.सागरी सुरक्षेचा हा प्रस्ताव सर्वात आधी ‘लोकमत’च्या माध्यमातून मांडण्यात आला होता. मच्छीमार सहकारी संस्थांचा विकास योजनेंतर्गत एकूण १० मच्छीमार सहकारी संस्थांना मासे खरेदी-विक्रीकरिता १९४.७२ लाख मार्केटिंग भागभांडवल वितरीत करण्यात आले आहे. तर सन २०१६-१७मध्ये राष्ट्रीय सहकार विकास निगम योजनेंतर्गत तीन मच्छीमार सहकारी संस्थांना ट्रक-टेम्पो खरेदीसाठी एकूण १८.९२ लाख रुपये अर्थसाहाय्य देण्यात आले असल्याचे नाखवा यांनी अखेरीस सांगितले.