शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना ‘दाखल्यां’ची प्रतीक्षा,आरसीएफ प्रकल्पातील रेल्वे मार्गासाठी दिली जमीन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2018 05:17 IST

आरसीएफ थळ रेल्वेलाइनकरिता अलिबाग तालुक्यातील चरी गावामधील जमीन संपादित करण्यात आली. मात्र बाधित शेतक-यांना पुनर्वसन अधिनियन १९९९ नुसार ‘प्रकल्पबाधित’ वा ‘प्रकल्पग्रस्त’ असे दाखले, तसेच आश्वासन दिल्याप्रमाणे नोकरी दिली गेली नाही.

 - जयंत धुळपअलिबाग : आरसीएफ थळ रेल्वेलाइनकरिता अलिबाग तालुक्यातील चरी गावामधील जमीन संपादित करण्यात आली. मात्र बाधित शेतक-यांना पुनर्वसन अधिनियन १९९९ नुसार ‘प्रकल्पबाधित’ वा ‘प्रकल्पग्रस्त’ असे दाखले, तसेच आश्वासन दिल्याप्रमाणे नोकरी दिली गेली नाही. वर्षानुवर्षे आश्वासनपूर्तीच्या प्रतीक्षेत असलेल्या या शेतकºयांना १९८२ पासून झालेली आर्थिक नुकसानभरपाई मिळावी, या मागणीकरिता चरी गावातील आरसीएफ थळ रेल्वेलाइन बाधित हिराजी दामोदर थळे, नागू रामजी ठाकूर, इंदुबाई दत्तात्रेय थळे,अरविंद कृष्णाजी ठाकूर आदी २९ शेतकºयांनी आपला अर्ज अलिबाग उपविभागीय महसूल अधिकारी सर्जेराव सोनावणे यांच्याकडे दाखल केले आहेत.आरसीएफ थळ रेल्वेलाइनमधील बाधित शेतकºयाचे नाव, वय, जमीन सर्व्हे नंबर, ज्याच्या नावे प्रकल्पबाधित वा प्रकल्पग्रस्ततेचा दाखला पाहिजे त्याचे नाव, गाव, जन्मतारीख व शिक्षण असा सर्व तपशील या अर्जात नमूद करण्यात आला आहे.अर्जात माझी व माझ्या कुटुंबीयांची जमीन आरसीएफ रेल्वे लाइनकरिता संपादित झाली असून त्यास महाराष्ट्र पुनर्वसन अधिनियम १९९९ लागू करणे कायद्यास अभिप्रेत असल्याचे नमूद करण्यात आले आहे. जमीन संपादनाच्या वेळी आरसीएफ थळ कंपनीत नोकरी मिळेल, असे आश्वासन भूमी संपादन अधिकाºयांनी दिले होते. त्यानुसार कुटुंबातील सक्षम व्यक्तीस नोकरी मिळेल असे गृहीत होते. परंतु नोकरी दिली नसल्याने १९८२ ते २०१८ अशा गेल्या ३६ वर्षांचे दरमहा किमान १० हजार रुपये याप्रमाणे ४ कोटी ३२ लाख रुपयांचे उत्पन्न बुडाले असून शासनाने घोर फसवणूक केल्याचे अर्जदारांनी नमूद केले आहे.शासनाकडून झालेल्या फसवणुकीच्या पार्श्वभूमीवर शेतकºयांनी एकूण तीन मागण्या केल्या आहेत. त्यामध्ये, नोकरी न दिल्याने झालेले आर्थिक नुकसान आम्हास आरसीएफ कंपनीच्या सामाजिक उत्तरदायित्व निधीमधून द्यावे, अशी पहिली मागणी आहे. बाधित शेतकºयांच्या सक्षम वारसास वा प्रतिनिधीस प्रकल्पग्रस्ततेचा दाखला मिळणे अपेक्षित आहे. या दाखल्याच्या आधारे वारसास शासनाच्या नोकरभरतीमध्ये आरक्षण मिळू शकते. तरी संबंधित अर्ज स्वीकारून कार्यवाही करावी. संपादन प्रक्रियेचा भाग म्हणून पुनर्वसन कायद्याच्या कलमान्वये कार्यवाही करावी तसेच प्रकल्पग्रस्ततेचा दाखला मिळावा, अशी दुसरी मागणी आहे. अर्जदार शेतकरी श्रमिक मुक्ती दलाचे सदस्य असून अर्जाबाबत योग्य निर्णय घेताना शासकीय बैठकांसाठी श्रमिक मुक्ती दलाच्या गाव समितीशीही विचारविनिमय करावे, असे अर्जात अखेरीस नमूद करण्यात आले आहे.थळ येथील आरसीएफच्या रेल्वेमार्गासाठी ३६ वर्षांपूर्वी भूमिसंपादन झाले आहे. आता त्यास बराच काळ लोटला आहे. प्रकल्पग्रस्तांना दाखले देणे हे पुनर्वसन विभागाचे काम आहे. तरी सुद्धा या प्रकरणी उपविभागीय महसूल कार्यालयातील नोंदी तपासून पाहिल्या जातील.- सर्जेराव सोनावणे, अलिबाग उपविभागीय महसूल अधिकारी.आरसीएफ थळ कंपनीत नोकरीचे भूमी संपादन अधिकाºयांचे आश्वासन फोलआरसीएफच्या सामाजिक उत्तरदायित्व निधीतून आर्थिक नुकसानभरपाई मिळावी

टॅग्स :FarmerशेतकरीRaigadरायगडnewsबातम्या