शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचे लाड सुरूच! अमेरिकेचा आणखी एक धक्का, 'या' संघटनेवर मारला दहशवादाचा शिक्का
2
Indian Embassy in Pakistan :'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान घाबरला! इस्लामाबादमधील भारतीय राजदूतांना पाणी, गॅस पुरवठा थांबवला, वर्तमानपत्रांवरही बंदी
3
शिवाजी विद्यापीठात विद्यार्थीनीने वसतिगृहात टोकाचे पाऊल उचलले; नेमके कारण काय?
4
कबुतरखान्यांबद्दल 'सर्वोच्च' निर्णय आला, आता सरकार काय करणार? CM फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
5
'एसआयआर'वरून विरोधकांच्या गदारोळावर निवडणूक आयोगाचा मोठा खुलासा; पुरावा म्हणून व्हिडीओ जारी; काँग्रेस बॅकफूटवर
6
PM Modi and Zelenskyy phone Call : युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी PM मोदींशी चर्चा केली; लवकरच भारत दौऱ्यावर येऊ शकतात
7
Donald Trump's Tariffs : मोठी तयारी! कर लादणाऱ्या अमेरिकेला धक्का बसणार! भारत या शस्त्राचा वापर करणार
8
ट्रेनिंगमध्ये जुळले सूत, स्वीटीसोबत लग्नानंतरही शरीरसंबंध; आता आयुष्यातूनच उठला, पोलीस उपनिरीक्षक महिलेला अटक
9
नाशिकमध्ये शिंदेसेनेच्या बैठकीत अहिल्यानगरचे दोन गट भिडले; शरद पवार गटाचा पदाधिकारी बैठकीत शिरल्याचा दावा
10
Bank Job: बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न पूर्ण होणार; आयओबीमध्ये भरती, महाराष्ट्रासाठी 'इतक्या' जागा राखीव
11
टी-२० आशिया कपमध्ये सर्वात मोठी खेळी करणारे टॉप-५ फलंदाज!
12
Dadar Kabutarkhana Ban : मोठी बातमी! कबुतरखान्यांवरील बंदीबाबत सुप्रीम कोर्टाने दिला महत्वाचा निर्णय
13
Ramdas Athawale : Video - "राहुल गांधी निवडणूक आयोगाला घाबरतात, म्हणूनच ते..."; रामदास आठवलेंचा हल्लाबोल
14
अरेरेरे! तीन वर्षांच्या लेकीलाच बापाने खाऊ खातले विषारी बिस्किट; पत्नीचा पतीवर गंभीर आरोप
15
सोन्याचं नक्षीकाम, एकधारी पातं, मुल्हेरी मूठ... महाराष्ट्राने लिलावात जिंकली 'फिरंग' तलवार (PHOTOS)
16
Rahul Gandhi's Allegations Against Election Commission : 'मी सही करणार नाही, हा निवडणूक आयोगाचा डेटा..', राहुल गांधींचे प्रत्युत्तर, म्हणाले- निवडणूक आयोग दिशाभूल करतेय
17
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर
18
ट्रेनच्या फूटबोर्डवर बसताच गर्दुल्ल्याचा हल्ला; तोल जाऊन खाली पडलेल्या प्रवाशाने पाय गमावला, आरोपीला अटक
19
ChatGPT चा सल्ला घेणं बेतलं जीवावर, मिठाऐवजी खाल्लं 'विष', नेमकं काय आहे हे प्रकरण?
20
शेकडो वाहनांचा ताफा, फुलांचा वर्षाव, इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या आकाश दीपचं घरी जंगी स्वागत

भिवपुरी रोड रेल्वे स्थानकात समस्या; मध्य रेल्वे प्रशासनाला निवेदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2020 22:49 IST

प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्याची प्रवासी संघटनेची मागणी

नेरळ : मध्य रेल्वेच्या मेनलाइनवरील कर्जत दिशेकडील भिवपुरी रोड हे रेल्वे स्थानक आज महत्त्वाचे रेल्वे स्थानक बनले आहे. त्या स्थानकातील प्रवाशांना भेडसावणाºया बाबींवर तेथील प्रवासी संघटनेने मध्य रेल्वे प्रशासनाचे लक्ष वेधले आहे. या स्थानकातील समस्यांबाबत येथील रेल्वे प्रवासी संघटनेने मुंबईत जाऊन निवेदन दिले आहे. कर्जत दिशेकडील भिवपुरी रोड रेल्वे स्थानकाला मोठा इतिहास आहे. त्या स्थानकात मध्य रेल्वे प्रशासनाकडून मागील काही वर्षांत सातत्याने विकासकामांकडे लक्ष दिल्याचे दिसून येत आहे.

या स्थानकात मध्य रेल्वे प्रशासनाने पादचारी पूल बांधला आहे, त्याबाबत निर्माण झालेल्या समस्या आणि तेथे पावसाळ्यातील पाणी वाहून नेण्यासाठी असलेल्या नाल्यांचा मार्ग कमी करण्याचा झालेला प्रयत्न यामुळे निर्माण झालेल्या समस्यांबाबत भिवपुरी रोड रेल्वे प्रवासी संघटना यांच्याकडून मध्य रेल्वेच्या मुंबई विभागीय महाव्यवस्थापक गोयल यांची भेट घेऊन समस्या मांडल्या. त्या वेळी प्रवासी संघटनेचे अध्यक्ष किशोर गायकवाड, कार्याध्यक्ष गणेश मते, सचिव विनोद बार्नेकर, उपाध्यक्ष भरत कांबरी, राजेश विरले, खजिनदार महेश कडव आणि काही कार्यकारिणी सदस्य उपस्थित होते.

भिवपुरी रोड रेल्वे स्थानकात कर्जत दिशेकडे बनविण्यात आलेला पादचारी पुलावरून दोन्ही दिशेला जाण्यासाठी रस्ते बनवले आहेत. मात्र, ते दोन्ही रस्ते हे अर्धवट आहेत. त्यात पूर्व दिशेकडे असलेल्या बार्डी गावाकडे जाणाºया रस्त्यापर्यंत म्हणजे जिल्हा परिषदेने बनविलेल्या रस्त्यापर्यंत तो रस्ता जोडला जावा. त्याच वेळी पश्चिम दिशेकडे असलेल्या डिकसळ गावाकडे असलेल्या रस्त्याचा भाग हा डायमंड रेसिडेन्सीपर्यंत जोडला जावा, अशी मागणी प्रवासी संघटनेने केली आहे.

तर त्याच भागात डिकसळ भागातील पाणी वाहून नेणारी पाइपमोरी होती, ती पाइपमोरी तेथील बांधकाम व्यवसाय करणाºया व्यावसायिकाने कमी आकाराचा नाला बांधून निमुळती केली आहे. त्यामुळे त्या भागातील पाणी पूर्वीसारखे पलीकडे वाहून जात नाही. यामुळे येथे पाऊस पडल्यानंतर पाणी साचून राहत आहे. यामुळे प्रवाशांची गैरसोय होते. दोन तास सलग पाऊस सुरू राहिल्यास तेथील रेल्वेमार्गात पाणी साचून त्याचा परिणाम वाहतुकीवर अनेकदा होताना दिसला आहे. त्या भागात पाणी वाहून नेण्यासाठी मोठ्या आकाराची पाइपमोरी टाकण्यात यावी, अशी मागणी प्रवासी संघटनेने केली आहे.

टॅग्स :railwayरेल्वेMaharashtraमहाराष्ट्र