शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
3
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
4
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
5
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
6
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
7
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
8
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
9
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
10
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
11
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
12
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
13
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
14
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
15
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
16
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
17
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
18
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
19
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
Daily Top 2Weekly Top 5

भाजीपाला-डाळींचे दर उसळले, किचन बजेट पडले

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2020 00:37 IST

गृहिणींना आर्थिक फटका; डाळी-पालेभाज्या पोहोचल्या शंभरी पार

- निखिल म्हात्रेअलिबाग : अनलॉकनंतर सर्वच व्यवहार आता पूर्वपदावर येत आहेत. गेल्या तीन महिन्यांपासून पालेभाज्या आणि डाळींच्या दराने चांगलीच उसळी घेतली आहे. त्यामुळे गृहिणींचे ‘किचन बजेट’ कोलमडून पडले आहे.सध्या भाजीपाल्याची आवक कमी मात्र, मागणी जास्त असल्याने त्याच्या किमतीमध्ये वाढ झाली आहे. आॅगस्ट, सप्टेंबर आणि आॅक्टोबर हे तीन महिने उपवासाचे असल्याने नागरिकांचा ओढा शाकाहाराकडे अधिक आहे. त्यामुळे पालेभाज्या आणि डाळींना मागणी अधिक आहे. त्यामुळे किमतीत वाढ झाली असल्याचे दिसून येते.जिल्ह्यात अनलॉक-५ची सुरुवात झाली आहे. अद्याप वाहतूक सेवा सुरळीत झाली नसल्याने भाजीपाल्याच्या गाड्या दररोज येत नाहीत. त्यामुळे पुरवठा कमी आणि मागणी जास्त, अशी अवस्था सध्या बाजारपेठांमध्ये झाली आहे. अचानक वाढलेल्या भाजीपाल्याच्या किमतींमुळे गृहिणींचे बजेट कोलमडले आहे. साधी कोथिंबिरीची जुडी घेताना महिला विचार करत आहेत. लसूण-मिरचीच्या किमती वाढल्याने, वरणाच्या फोडणीचा चांगलाच ठसका महिला वर्गाला लागत आहे. दुसरीकडे कांदाही सर्वांनाच रडवत आहे.कोरोनाच्या काळात टाळेबंदी झाल्याने अचानक सर्वच गोष्टींचा भाव वाढला. त्यामध्ये भाजीपाल्याच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. तरीही दैनंदिन जीवनाची भाजीपाला ही गरज असल्याने खरेदी करताना तारेवरची कसरत करावी लागत आहे.- आनंद पवार, ग्राहककोरोनाच्या कालावधीत शेतकरी शेतामध्ये भाजीपाल्याचे पीक घेण्यास घाबरत होते. लॉकडाऊनमुळे वाहतुकीवर बंधने आली होती. त्यातच भाजीपाल्याला अचानक मागणी वाढली आणि पुरवठा कमी झाला. त्यामुळे भाजीपाल्याच्या किमती वाढल्या आहेत.-हर्ष ढवळे, भाजी विक्रेतेकोरोना कालवधीत धोका पत्करून कुटुंबाचा भार पेलविण्यासाठी शेतीकडे वळलो. शेतात पिकविलेल्या भाजीपाल्यातून उत्पादन मिळाले. मात्र, उत्पादन घेण्यासाठी बी-बियाण्यांवर मोठ्या प्रमाणावर खर्च झाला आहे.-प्रवीण लोंढे, भाजीपाला उत्पादक शेतकरीभाजीपाला-डाळी महागण्याची कारणेमागील तीन महिने शाकाहाराचे असल्याने, भाजीपाल्यासह डाळींना अधिक मागणी आहे. टाळेबंदी काळात वाहतूक सेवा काही काळ बंद होती. वेळेमध्ये वस्तुंचा पुरवठा होत नसल्याने किमती वाढल्या आहेत.

टॅग्स :vegetableभाज्या