शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

वाहतूककोंडी टाळण्यासाठी महामार्गावर फौजफाटा सज्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2018 02:52 IST

पाच दिवसांच्या बाप्पाच्या विसर्जनानंतर मुंबई-गोवा महामार्गावरील तब्बल ६५ टक्के वाहतूक कमी झाली आहे.

अलिबाग : पाच दिवसांच्या बाप्पाच्या विसर्जनानंतर मुंबई-गोवा महामार्गावरील तब्बल ६५ टक्के वाहतूक कमी झाली आहे. त्यामुळे अनंत चर्तुदशीच्या दिवशी दहा दिवसांच्या बाप्पाला निरोप देताना महामार्गावर वाहनांची वर्दळ तुलनेने कमी राहण्याची शक्यता आहे. परिणामी चालकांसह प्रवाशांना वाहतूककोंडीचा सामना करावा लागणार नाही.पोलिसांचा भार काही अंशी कमी होणार असला तरी सुमारे ३०० अधिकारी आणि कर्मचारी यांचा फौजफाटा वाहतुकीच्या नियोजनासाठी रस्त्यावर उतरणार आहे. पोलीस विभागाकडून वाहतूककोंडी टाळण्यासाठी काही पर्यायी मार्ग सुचवण्यात आले आहेत. तसेच २३ सप्टेंबर ते २४ सप्टेंबर या कालावधीत अवजड वाहनांना या मार्गावरून जाण्यास बंदी घालण्यात आली आहे.गणेशोत्सव कोकणात मोठ्या जल्लोषात साजरा करण्याची परंपरा आहे. बाप्पाचा हा भक्तिमय उत्सव उत्साहात साजरा करण्यासाठी मोठ्या संख्येने चाकरमानी मुंबई, ठाणे आणि पुणे जिल्ह्यातून कोकणाकडे प्रस्थान करतात. त्यांची संख्या प्रचंड असल्याने या महामार्गावर वाहतूककोंडीची समस्या नित्याची झाली होती. पोलिसांनी वाहतुकीचे योग्य नियोजन केल्यामुळे यंदा वाहतुकीची समस्या फारशी जाणवली नाही. मात्र महामार्ग चौपदरीकरणाचे काम सुरू असल्याने वाहतूककोंडीचा सामना करावा लागत आहे. यातूनही सुटका करण्याचा प्रयत्न वाहतूक विभागाकडून सुरू आहे.बाप्पासह गौराईला निरोप देऊन बहुतांश चाकरमानी परतले आहेत. त्यामुळे मुंबई-गोवा महामार्गावरील ६५ टक्के वाहतूक कमी झाल्याने दहा दिवसांच्या बाप्पाला निरोप दिल्यानंतर परतणाऱ्या भाविकांना वाहतूककोंडीचा त्रास होणार नसल्याचे दिसत आहे. त्यातही कोणत्याही कारणाने भाविकांच्या परतीच्या प्रवासात कोणतेच विघ्न येऊ नये यासाठी रायगडच्या वाहतूक विभागाने नियोजन केले असल्याची माहिती रायगड जिल्हा वाहतूक विभागाचे प्रमुख पोलीस निरीक्षक सुरेश वराडे यांनी दिली.>महामार्गावर मोठ्या संख्येने अवजड वाहने येत असल्याने वाहतुकीला अडथळा होऊन प्रवाशांना तासनतास ताटकळत राहावे लागायचे. अलीकडे त्यांनाही महामार्गावर येण्यास बंदी घालण्यात आली आहे. २३ सप्टेंबरच्या सकाळी आठ वाजल्यापासून ते २४ सप्टेंबरच्या रात्री आठ वाजेपर्यंत अवजड वाहने मुंबई-गोवा महामार्गावर धावणार नाहीत.बंदीच्या कालावधीत महामार्गावरून अवजड वाहने धावल्यास त्यांच्यावर कायद्याचे उल्लंघन केल्याचा गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. त्यामुळे या कालावधीत अवजड वाहने महामार्गावर उतरवू नयेत, असे आवाहन वराडे यांनी केले आहे. अवजड वाहनांनी बंदीच्या कालावधीत पेट्रोल पंप, हॉटेल, धाबे तसेच सुरक्षितपणे रस्त्याच्या बाजूला वाहने पार्किंग करून ठेवणे गरजेचे आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूककोंडी टाळण्यासाठी रस्त्याच्या मध्ये दुभाजक लावण्यात आले आहेत. जेणेकरून वाहने एकामागून एक अशी रांगेमध्ये जातील. त्यामध्ये प्रामुख्याने पेण, हमरापूर, वडखळ, कोलाड, माणगाव, निजामपूर, महाड, पोलादपूर येथील पॉइंटचा समावेश आहे.कोकणातून येणारी छोटीवाहने ही माणगाव येथीलढालघर फाटा, निजामपूर, पाली अशी वळवण्यात येणार आहेत. त्यामुळे या वाहनांना पुढील वाहतूककोंडीचा सामना करावा लागणार नाही, तसेच याच वाहनांमुळे वाहतूककोंडीही टाळता येणार आहे.पोलिसांनी गर्दीची ठिकाणे शोधली आहेत. त्यामध्ये माणगावमधील मोर्बा नाका, निजामपूर नाका येथे बॅरिगेट्स लावण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे पोलीस बंदोबस्तामध्येही वाढ करण्यात आली आहे.पेण तालुक्यातील वडखळ, हमरापूर, रामवाडी, पेण रेल्वे स्टेशन येथेही गर्दी नित्याची झाली आहे. त्यामुळे या ठिकाणीही बॅरिगेट्स उभारण्यात आले आहेत. गर्दीच्या ठिकाणी सातत्याने पेट्रोलिंग करण्यात येणार आहे.वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्यासाठी आठ पोलीस अधिकारी, १५० पोलीस, होमगार्ड तैनात करण्यात आले आहेत. वाहतूककोंडी होऊ नये यासाठी १५० स्वयंसेवक पोलिसांच्या मदतीला राहणार आहेत. गणेशोत्सव कालावधीत या स्वयंसेवकांनी पोलिसांना चांगल्या पद्धतीने सहकार्य केले आहे.

टॅग्स :Ganesh Chaturthi 2018गणेश चतुर्थी २०१८Ganpati Festivalगणेशोत्सवGanesh Visarjanगणेश विसर्जन