शहरं
Join us  
Trending Stories
1
APMC निवडणूक घ्या, प्रशासक नियुक्ती रद्द; उच्च न्यायालयाने राज्य सरकारला फटकारले
2
नवी मुंबईत ‘गाेल्डन मेट्रो’चे पुढचे पाऊल; डीपीआरचे पुनरावलोकन, ३० मिनिटांत गाठा विमानतळे
3
सोनम वांगचुक यांनीच लोकांना भडकावले; लेहमधील हिंसाचारासाठी गृहमंत्रालयाने धरले जबाबदार
4
"अक्खी दुनिया एक तरफ, मेरा बुमराह एक तरफ"; अभिनेत्याची फरमाईश अन् संजनाची डायलॉगबाजी (VIDEO)
5
कुजबुज! आता पवार कुटुंब एकत्र दिसणार का?; ‘झालं गेलं गंगेला मिळू द्या, महाराष्ट्र हितासाठी...'
6
मंत्रिमंडळाऐवजी पायाभूत समितीला अंतिम अधिकार; फडणवीस सरकारनं हा निर्णय का घेतला?
7
मुंबईत दुहेरी हत्याकांड! २३ वर्षीय तरुणाने वडील, आजोबांची केली हत्या; काकांवरही केला चाकू हल्ला
8
विरोधात लिहिले की पत्रकारांचा छळ सुरू होतो; हायकाेर्टानं नोंदवलं महत्त्वपूर्ण निरीक्षण
9
बोलघेवड्याचा बोलाचा भात...! रशिया-युक्रेन युद्धाला डोनाल्ड ट्रम्प यांच्या विधानानं नवं वळण?
10
मायबाप सरकार, फक्त कागदावर नको, बांधांवर या! निकष बाजूला सारून मदतीचा हात पुढे केला पाहिजे
11
विमानाच्या चाकातील 'त्याच्या' प्रवासाचा जीवघेणा थरार! हृदयाचा थरकाप उडवणारी एक कहाणी
12
मैदानावर क्रिकेट खेळा, खुन्नस कसली काढता?; राजकीय ‘आकां’ना आपण जाब विचारला पाहिजे
13
एकीकडे डोनाल्ड ट्रम्प यांची 'बोंबाबोंब', दुसरीकडे रशियाने मात्र थेट इराणसोबत केला अणू करार
14
राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान
15
“शेतकऱ्यांना सर्व प्रकारची मदत, ड्रोनने केलेले पंचनामे मान्य करणार”; CM फडणवीसांची ग्वाही
16
त्याला अजून फाशी का दिली नाही? मुख्यमंत्र्यांची हत्या करणाऱ्या आरोपीच्या याचिकेवर कोर्टाने सरकारला फटकारलं
17
सरकार शेतकऱ्यांचे आहे, चिंता करू नका! एकनाथ शिंदे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिला धीर
18
वायरल 'बाल्कनी' हिमनगाचे केवळ टोक? ९९८ कोटींचा इंडोरा–दिगोरी उड्डाणपूलामुळे प्रभावित मालमत्तांची यादी तयार करण्याचे आदेश
19
“पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला १० किलो गहू-तांदूळ, केंद्राची मदत १०० टक्के येईल”: छगन भुजबळ
20
"प्रत्येकाला स्वाभिमान असतो, त्याने..."; शाहीन शाह आफ्रिदीकडून हॅरिस रौफच्या कृतीचे समर्थन

महामार्गावरील खड्ड्यांवरून आमसभेत खडाजंगी

By admin | Updated: June 22, 2017 01:07 IST

भाजप-कॉँग्रेस पदाधिकाऱ्यांत शाब्दिक चकमक

लोकमत न्यूज नेटवर्क कुडाळ : आमसभेत जनतेच्या आलेल्या प्रश्नांबाबत महिनाभरात आढावा बैठक आयोजित करून हे प्रश्न तत्काळ सोडविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही कुडाळ तालुक्याच्या आमसभेत बोलताना आमदार वैभव नाईक यांनी दिली. या सभेत महामार्गावर पडलेले खड्डे मंत्र्यांच्या दौऱ्यामुळे बुजविण्यात येत असल्याच्या मुद्द्यावरून भाजपचे पदाधिकारी व काँग्रेसचे पदाधिकारी यांच्यात जोरदार खडाजंगी झाल्याने वातावरण काहीकाळ तंग होते. मात्र, ही आमसभा खेळीमेळीत पार पडली. कुडाळ पंचायत समितीच्यावतीने कुडाळ तालुक्याची आमसभा आमदार वैभव नाईक यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी सकाळी येथील महालक्ष्मी सभागृहात झाली. या सभेला जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष रणजित देसाई, जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत, जिल्हा परिषदेचे सदस्य अंकुश जाधव, पंचायत समितीचे सभापती राजन जाधव, उपसभापती श्रेया परब, तहसीलदार अजय घोळवे, गटविकास अधिकारी विजय चव्हाण, सहायक गटविकास अधिकारी वासुदेव नाईक, जिल्हा परिषदेचे सदस्य संजय पडते, अमरसेन सावंत, वर्षा कुडाळकर, उपनगराध्यक्ष आबा धडाम, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष काका कुडाळकर, विकास कुडाळकर व जिल्हा परिषद तसेच पंचायत समितीचे सदस्य उपस्थित होते. (पान १० वर) सभेच्या सुरुवातीला दिवंगत मान्यवरांना श्रद्धांजली वाहण्यात आली, तर तालुक्यातील पुरस्कारप्राप्त पत्रकार चंद्रकांत सामंत, दशावतार कलाकार सुधीर कलिंगण तसेच आंदुर्ले, हुमरमळा व वालावल ग्रामपंचायतींच्या आणि जिल्हा परिषदेच्या अभिनंदनाचा ठराव घेण्यात आला. आमसभेला उपस्थित नागरिकांपैकी रांगणा तुळसुली येथील नागेश आईर यांनी या बैठकीत सविस्तर उत्तरे देण्याची मागणी केली. कारण रस्ते थोडे होतात आणि पूर्ण झाल्याचे सांगितले जाते तसे होऊ नये, अशी मागणी केली. यावर टप्प्याटप्प्याने रस्ते पूर्ण करू, एकाचवेळी पूर्ण होणार नसले तरी जास्तीत जास्त पूर्ण करू, असे आश्वासन आमदार नाईक यांनी दिले. वालावल सरपंच राजा प्रभू यांनीदेखील रस्त्यांच्या दुरवस्थेकडे लक्ष वेधले. तसेच जिल्हा परिषदेकडे निधी तुटपुंजा असतो. काही रस्त्यांवर वारंवार निधी खर्ची घातला जातो, याकडे लक्ष वेधले. महामार्गाचे खड्डे रात्रीच्यावेळी बुजविले जात आहेत. मंत्र्यांसाठी खड्डे बुजवू नका. त्यांना खड्ड्यांतूनच येऊ द्या. गेल्यावर्षी कोणत्या एजन्सीने खड्डे भरले त्याची चौकशी करण्याची मागणी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष रणजित देसाई यांनी केली. यावेळी भाजपचे राजू राऊळ बोलत असताना वादंग झाला. जुने काय झाले ते नको, आताचे काय ते बोला, असे सांगत काँगे्रस कार्यकर्ते आक्रमक झाले. यामध्ये हस्तक्षेप करीत एजन्सीने नीट काम न केल्यास कारवाई करण्याचे आश्वासन आमदार नाईक यांनी दिले, तर सतीश सावंत यांनी २४ जूननंतरच खड्डे भरा, असा टोला हाणला. योजनांचे टार्गेट द्या वर्दे येथील दिलीप सावंत यांनी तलाठ्यांना पेन्शनसारख्या योजनांची टार्गेट द्या. या योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहोचत नसल्याचा आरोप केला. रोजगार हमी योजनेशिवाय शेतकऱ्यांना विहीर मिळत नाही ती मिळावी, अशी मागणी केली. तहसीलदारांना लोकांच्या भेटीसाठी वेळ देण्याचे आदेश आमदार नाईक यांनी यावेळी दिले.